शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही"

By अमित महाबळ | Updated: March 24, 2023 16:48 IST

ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते.

अमित महाब‌ळ 

जळगाव : देशाच्या सुरक्षिततेसाठी केवळ सैन्य किंवा सरकारवर जबाबदारी टाकून मोकळे होता येणार नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, असे प्रतिपादन भारताच्या गृह मंत्रालयाचे माजी सुरक्षा सल्लागार व सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाचे माजी अध्यक्ष बिग्रेडीयर संजय अग्रवाल यांनी केले. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला व मानव्यविद्या प्रशाळा अंतर्गत संरक्षणशास्त्र विभाग आणि विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘काश्मीरबाबत चीनचे धोरण’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ब्रिगेडीअर संजय अग्रवाल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा. एस.टी.इंगळे होते. मंचावर युआयसीटीचे संचालक डॉ. जे. बी. नाईक, प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. अनिल चिकाटे, समन्वयक प्रा. तुषार देशपांडे व समन्वयक सचिव डॉ. तुषार रायसिंग उपस्थित होते.    

ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, त्यावेळी नागरिकांकडून इंटरनेटची सुविधा पुरवून देशकार्याला हातभार लावला गेला. सामान्य नागरिकांच्या सहभागाने देशाच्या रणनितीची प्रतिमा तयार होत असते. तरुणांनी आपल्या बौध्दिक विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले. 

अध्यक्षीय भाषणात प्रा. एस. टी. इंगळे यांनी देशाच्या सीमेवर अस्वस्थता माजवली जाते. दहशतवादामुळे सीमेवरचे प्रश्न चिघळत असतात. काळाच्या ओघात युध्दांमध्येही आता बदल झाले आहेत. जैविक शस्त्रे वापरली जातात. या सगळ्या पार्श्वभूमीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या परिसंवादाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केले. आभार प्रा.वीणा महाजन यांनी मानले. दुपारच्या सत्रात दक्षिण कोरीयाच्या एशिया इन्स्टिट्यूट, सेऊलचे संचालक डॉ. लखविंदर सिंग, इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअरर्सच्या डॉ. अनघा गुहा रॉय, पुणे येथील शैबल बॅनर्जी यांची व्याख्याने झाली.  

चीन भूभाग वाढविण्याच्या प्रयत्नात

उद्घाटनानंतरच्या बीजभाषणात अग्रवाल यांनी काश्मीरसाठी चीनची धोरणात्मक योजना कशी आहे यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे प्रकाश टाकला. चीन भूभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर चीनने विरोध दर्शविला. कुरापती काढण्यात चीनसोबत भारताच्या शेजारी देशांचाही सहभाग आहे. भारत अत्यंत शांतपणे मात्र रणनितीने प्रत्युत्तर देत आहे. कोणाच्याही अधिपत्याखाली न जाता भारत स्वत:चे स्थान आणि अधिपत्य घडवत आहे असे ते म्हणाले. राष्ट्रीय इच्छाशक्ती, राष्ट्रीय हेतू आणि राष्ट्रीय क्षमता यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJalgaonजळगाव