शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

एरंडोल येथे पुरात १५ झोपड्या गेल्या वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 4:12 PM

पुरात अडकलेले ५ जण बचावले : हनुमंतखेडे व मजरे गावात शिरले होते पूराचे पाणी

एरंडोल - बुधवारी दुपारपासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी धरण ओव्हरफ्लो झाले. हे धरण ८० टक्के भरत असतांना अंजनी नदी काठावरील हनुमंतखेडे व मजरे या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले.तसेच एरंडोल येथे शासकीय विश्रामगृहासमोरील आदिवासींच्या झोपड्या वाहून गेल्याने सुमारे १५ परिवार निराधार झाले आहे. यावेळी एका परिवारातील पावरा समाजतील ५ जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना दोराच्या सहाय्याने वाचविण्यात आले.प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस व पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य त्या उपाय योजना केल्या. अंजनी धरण ८० टक्के भरले असतांना रात्री साडे अकरा वाजता अंजनी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. पहाटे चार वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरु होता.कासोदा परिसरात अतिवृष्टीकासोदा परिसरात १०२ मि.मी.अर्थात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. धुंवाधार पाऊस अंजनी नदीला आलेला पुर व अंजनी धरणाचा पाण्याचा विसर्ग यामुळे हनमंत खेडे,मजरे,सोनबर्डी, नांदखुर्द बु.,नांदखुर्द खु.,एरंडोल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली असुन पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.याशिवाय अंजनी धरणाच्या परिसरातील नदी काठा लगतच्या भागात कासोदा, आडगाव, तळई, फरकांडे, उमरे व इतर गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अंजनी धरणाला लागुन असलेल्या काळा बांधा-या नजीकच्या शेतामध्ये पाणी प्रवाहीत झाल्यामुळे पिके उध्वस्त झाली आहे.एरंडोल येथे पाच जणांचे वाचले प्राणएरंडोल येथे शासकीय विश्रामगृहा समोरील भागात पाण्याचा प्रवाह पाहता नगर पालिकेतर्फे सतर्कतेचा इशारा देऊन या आदिवासी परिवारांना झोपड्या खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. नंतर झोपड्या वाहुन गेल्या. यात प्रेमराज रामसिंग बारेला यांचे कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले. त्या परिवारातील पाच जणांनी तीन ते चार तास एका काटेरी झाडाचा आधार घेतला.त्यांना दोर टाकुन बाहेर सुरक्षित काढण्यात आले.यावेळी काही युवकांनी व नगर पालिकेच्या कर्मचा-यांनी मदत कार्य केले.मुकेश प्रेमलाल बारेला, दुगार्बाई प्रेमलाल बारेला, रामाबाई बारेला, प्रेमलाल बारेला तर दुस-या झाडावर सीताराम बारेला हा जीव वाचविण्यासाठी संघर्ष करीत होता.त् यालाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.म्हसावद रस्त्यावरील जुन्या फरशीला तडे गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. स्मशानभूमीची संरक्षक भिंत, कासोदा दरवाज्या नजीकची भिंत, आठवडे बाजारा नजीकची संरक्षक भिंत अंशत: कोसळल्यामुळे हानी झाली आहे.महादेव मंदिराला पाण्याचा वेढाएरंडोल येथील आठवडे बाजार परिसरातील महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा पडला होता.आठवडे बाजार व बुधवार दरवाजा समोरचा रस्ता अंजनी नदीचा प्रवाह बनला होता.जवळपास ४० वषार्नंतर अंजनी नदीला मोठा पुर आल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती.गुरुवारी दुपारी अंजनी धरणाच्या तिन पैकी एका गेटची दुरुस्ती करण्यात आली.