शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

एरंडोल शहराचा पाणीप्रश्न होणार बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 12:37 IST

जानेवारीअखेर संपणार अंजनीतील साठा

ठळक मुद्दे तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्तावच नाहीच

जळगाव : यंदा अंजनी मध्यम प्रकल्पात जिवंत पाणीसाठा झालेलाच नसल्याने व मृतसाठा हा फेब्रुवारी २०१९ अखेर संपत असल्याने एरंडोल शहराचा पाणीप्रश्न बिकट होणार आहे. गिरणावरील दहिगाव व लमांजन बंधाऱ्यापासून एरंडोल नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेण्यास मंजुरी देण्यात येणार आहे. मात्र अद्याप मजिप्राकडून याबाबतचा प्रस्तावच सादर झालेला नाही.निधीसाठी गेलाय प्रस्तावमार्च २०१९ अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांकरीता ११.८५ कोटी रूपयांचे अनुदान मिळण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. मात्र हा निधी मिळाल्यानंतर या उपाययोजनेचे काम सुरू होणार आहे. दरम्यान जिल्हाधिकाºयांनी या एरंडोल शहरासाठी तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेण्यासंदर्भात सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश कार्यकारी अभियंता, महाराष्टÑ जीवन प्राधीकरण, जळगाव व मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल यांना दिले आहेत. जेणेकरून वित्तीय मर्यादेनुसार प्रस्ताव शासनाकडून मंजूर होऊन जानेवारी २०१९ अ‍ेखर योजना कार्यान्वित होऊ शकेल. मात्र जानेवारीचे दोन आठवडे संपले तरीही योजनेचा प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडेच सादर झालेला नाही.चोपड्यासाठी पाणी सोडण्यात अडचणमुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांनी चोपडा शहरासाठी गूळ धरणात राखीव पाणीसाठ्यातून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. मात्र त्याबाबत कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.१ यांना अभिप्राय मागितला असता धरणगाव नगरपालिकेसाठी स्वतंत्र पाणी सोडण्यात येणार नाही. चोपडा नगरपरिषदेसाठी पाणी सोडू तेव्हाच धरणगावसाठीही पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल, असे कळविले.तर धरणगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांनी मात्र सध्या धरणगाव शहरासाठी तापी नदी धावडा डोहातून पाणी पुरवठा होत असून सध्या हा डोह भरलेला आहे. त्यामुळे सध्या पाणी आवर्तनाची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे चोपडा नगरपालिकेला गूळ धरणातून आवर्तन सोडण्यास अडचण निर्माण झाली आहे.तर टँकरने पाणी पुरवण्याची वेळमजिप्राकडून प्रस्ताव आल्यानंतर शासनाकडून निधी मंजूर झाला की, त्यासाठी निविदा प्रक्रिया होऊन नंतर योजनेचे काम केले जाईल. ते पूर्ण होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत किमान दीड महिन्याचा कालावधी जाणार आहे. अंजनी धरणातील मृतसाठा जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारीअखेरच संपणार असला तरीही प्रशासनाच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे. मात्र योजनेच्या कामास काही कारणाने विलंब झाल्यास अथवा बाष्पीभवनामुळे पाणी लवकर संपल्यास पूर्ण एरंडोल शहराला टँकरने पाणीपुरवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.