शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल शहराचा पाणीप्रश्न होणार बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 12:37 IST

जानेवारीअखेर संपणार अंजनीतील साठा

ठळक मुद्दे तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्तावच नाहीच

जळगाव : यंदा अंजनी मध्यम प्रकल्पात जिवंत पाणीसाठा झालेलाच नसल्याने व मृतसाठा हा फेब्रुवारी २०१९ अखेर संपत असल्याने एरंडोल शहराचा पाणीप्रश्न बिकट होणार आहे. गिरणावरील दहिगाव व लमांजन बंधाऱ्यापासून एरंडोल नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेण्यास मंजुरी देण्यात येणार आहे. मात्र अद्याप मजिप्राकडून याबाबतचा प्रस्तावच सादर झालेला नाही.निधीसाठी गेलाय प्रस्तावमार्च २०१९ अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांकरीता ११.८५ कोटी रूपयांचे अनुदान मिळण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. मात्र हा निधी मिळाल्यानंतर या उपाययोजनेचे काम सुरू होणार आहे. दरम्यान जिल्हाधिकाºयांनी या एरंडोल शहरासाठी तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेण्यासंदर्भात सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश कार्यकारी अभियंता, महाराष्टÑ जीवन प्राधीकरण, जळगाव व मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल यांना दिले आहेत. जेणेकरून वित्तीय मर्यादेनुसार प्रस्ताव शासनाकडून मंजूर होऊन जानेवारी २०१९ अ‍ेखर योजना कार्यान्वित होऊ शकेल. मात्र जानेवारीचे दोन आठवडे संपले तरीही योजनेचा प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडेच सादर झालेला नाही.चोपड्यासाठी पाणी सोडण्यात अडचणमुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांनी चोपडा शहरासाठी गूळ धरणात राखीव पाणीसाठ्यातून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. मात्र त्याबाबत कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.१ यांना अभिप्राय मागितला असता धरणगाव नगरपालिकेसाठी स्वतंत्र पाणी सोडण्यात येणार नाही. चोपडा नगरपरिषदेसाठी पाणी सोडू तेव्हाच धरणगावसाठीही पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल, असे कळविले.तर धरणगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांनी मात्र सध्या धरणगाव शहरासाठी तापी नदी धावडा डोहातून पाणी पुरवठा होत असून सध्या हा डोह भरलेला आहे. त्यामुळे सध्या पाणी आवर्तनाची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे चोपडा नगरपालिकेला गूळ धरणातून आवर्तन सोडण्यास अडचण निर्माण झाली आहे.तर टँकरने पाणी पुरवण्याची वेळमजिप्राकडून प्रस्ताव आल्यानंतर शासनाकडून निधी मंजूर झाला की, त्यासाठी निविदा प्रक्रिया होऊन नंतर योजनेचे काम केले जाईल. ते पूर्ण होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत किमान दीड महिन्याचा कालावधी जाणार आहे. अंजनी धरणातील मृतसाठा जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारीअखेरच संपणार असला तरीही प्रशासनाच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे. मात्र योजनेच्या कामास काही कारणाने विलंब झाल्यास अथवा बाष्पीभवनामुळे पाणी लवकर संपल्यास पूर्ण एरंडोल शहराला टँकरने पाणीपुरवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.