शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

एरंडोल शहराचा पाणीप्रश्न होणार बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 12:37 IST

जानेवारीअखेर संपणार अंजनीतील साठा

ठळक मुद्दे तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्तावच नाहीच

जळगाव : यंदा अंजनी मध्यम प्रकल्पात जिवंत पाणीसाठा झालेलाच नसल्याने व मृतसाठा हा फेब्रुवारी २०१९ अखेर संपत असल्याने एरंडोल शहराचा पाणीप्रश्न बिकट होणार आहे. गिरणावरील दहिगाव व लमांजन बंधाऱ्यापासून एरंडोल नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेण्यास मंजुरी देण्यात येणार आहे. मात्र अद्याप मजिप्राकडून याबाबतचा प्रस्तावच सादर झालेला नाही.निधीसाठी गेलाय प्रस्तावमार्च २०१९ अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांकरीता ११.८५ कोटी रूपयांचे अनुदान मिळण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. मात्र हा निधी मिळाल्यानंतर या उपाययोजनेचे काम सुरू होणार आहे. दरम्यान जिल्हाधिकाºयांनी या एरंडोल शहरासाठी तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेण्यासंदर्भात सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश कार्यकारी अभियंता, महाराष्टÑ जीवन प्राधीकरण, जळगाव व मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल यांना दिले आहेत. जेणेकरून वित्तीय मर्यादेनुसार प्रस्ताव शासनाकडून मंजूर होऊन जानेवारी २०१९ अ‍ेखर योजना कार्यान्वित होऊ शकेल. मात्र जानेवारीचे दोन आठवडे संपले तरीही योजनेचा प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडेच सादर झालेला नाही.चोपड्यासाठी पाणी सोडण्यात अडचणमुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांनी चोपडा शहरासाठी गूळ धरणात राखीव पाणीसाठ्यातून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. मात्र त्याबाबत कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.१ यांना अभिप्राय मागितला असता धरणगाव नगरपालिकेसाठी स्वतंत्र पाणी सोडण्यात येणार नाही. चोपडा नगरपरिषदेसाठी पाणी सोडू तेव्हाच धरणगावसाठीही पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल, असे कळविले.तर धरणगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांनी मात्र सध्या धरणगाव शहरासाठी तापी नदी धावडा डोहातून पाणी पुरवठा होत असून सध्या हा डोह भरलेला आहे. त्यामुळे सध्या पाणी आवर्तनाची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे चोपडा नगरपालिकेला गूळ धरणातून आवर्तन सोडण्यास अडचण निर्माण झाली आहे.तर टँकरने पाणी पुरवण्याची वेळमजिप्राकडून प्रस्ताव आल्यानंतर शासनाकडून निधी मंजूर झाला की, त्यासाठी निविदा प्रक्रिया होऊन नंतर योजनेचे काम केले जाईल. ते पूर्ण होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत किमान दीड महिन्याचा कालावधी जाणार आहे. अंजनी धरणातील मृतसाठा जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारीअखेरच संपणार असला तरीही प्रशासनाच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे. मात्र योजनेच्या कामास काही कारणाने विलंब झाल्यास अथवा बाष्पीभवनामुळे पाणी लवकर संपल्यास पूर्ण एरंडोल शहराला टँकरने पाणीपुरवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.