शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

लसीकरणाचा प्रभाव की हर्ड इम्युनिटी, ५८ दिवस एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत वेगात राबविली जात असून ६० टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झाल्याचे आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत वेगात राबविली जात असून ६० टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यातच गेल्या ५८ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यू नसल्याने हा लसीकरणाचा प्रभाव असल्याची एक शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच गंभीर रुग्णांची संख्याही गेल्या दोन महिन्यांपासून कमी झाल्याने ज्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी ते पूर्ण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. शिवाय लस पुरेशी उपलब्ध झाल्यास पुढील पंधरा दिवसांत जिल्हा सुरक्षित होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.

१६ जुलै रोजी मृतांची संख्या २५६५ होती. ती गेल्या ५८ दिवसांपासून स्थिर आहे. शिवाय तेव्हापासूनच रुग्णसंख्या ही एका दिवसाला आता दहापेक्षा कमी आढळून येत आहे. शिवाय लसीकरणाचा वेग वाढला आहे. शनिवारी शहरात ५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण झाले. जिल्हाभरात आता एका दिवसाला सव्वा लाखांपर्यंत लसीकरण होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा कालावधीही पुढे जात असल्याचेही सांगितले जात आहे.

काय होते लसीकरणाने

लसीकरणानंतर चौदा दिवसांनी तुमच्या शरीरात ॲन्टीबॉडिज तयार होतात. या अॅन्टीबॉडिज दुसऱ्या डोसनंतर सहा महिने ते एक वर्षापर्यंत तुम्हाला सुरक्षित करू शकतात. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुम्हाला बाधा झाली तरी आजार गंभीर रूप धारण करणार नाही, त्याचाच परिणाम की काय जिल्ह्यातील कोविड बाधित रुग्णांमध्ये गंभीर होण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. त्यामुळे मृत्यू नसणे हा लसीकरणाचा प्रभाव असू शकतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी म्हटले आहे.

लवकरच १२ वर्षांपुढे लस

१२ ते १८ वयोगटासाठी लवकरच लस उपलब्ध होणार असून येत्या पंधरा दिवसांत या वयोगटाचे लसीकरण सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. जळगावात लसीचा प्रभाव किंवा हर्ड इम्युनिटी या दोन शक्यतांमुळे मृत्यू थांबले असू शकतात, असेही ते म्हणाले. लस उपलब्ध झाल्यास पुढील पंधराच दिवसात संपूर्ण २८ लाख जनता सुरक्षित होईल, असेही त्यांनी सांगितले.

सद्यस्थिती काय

सक्रिय रुग्ण २५

लक्षणे असलेले रुग्ण ३

लक्षणे नसलेले रुग्ण २२

ऑक्सिजन पुरवठा करावा लागणारे रुग्ण १

अतिदक्षता विभागातील रुग्ण १

मृत्यूदर : १.८० टक्के

गृहविलगीकरणात २२