शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेतून शिक्षण हाच सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र - मुनीश्री अक्षयसागरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 13:17 IST

संदेश

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, ता. जळगाव : भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असून संस्कारयुक्त र्निव्यसनी विद्यार्थीच देश घडविण्याचे काम करू शकतील. पाश्चात्य संस्कृतीमुळे संस्कार, भाषा, भाव, विचार यात आमूलाग्र बदल होत आहे. पाश्चात्य संस्कृतीने भौतिक सुख मिळते पण संस्कार, परंपरा मिळत नाही म्हणून प्रत्येकाने मातृभाषेचा व संस्काराचा अभिमान बाळगून आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे, असे आवाहन १०८ प. पू. अक्षयसागरजी महाराज यांनी केले आहे.‘लोकमत’ला दिलेल्या प्रकट मुलाखतीत ते पुढे म्हणाले की, वाढती व्यसनाधीनता ही देशासाठी घातक आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण फॅशन झाले आहे. मात्र या धकाधकीच्या जीवनात आपल्या मातृभाषेसह संस्कृतीचा विसर या तरुणाईला पडलेला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्याशी झालेली ही बातचित.प्रश्न - इंग्रजी भाषेला विरोध का?उत्तर- इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेला विरोध नाही; परंतु तेच शिक्षणाचे माध्यम म्हणून एका विषयाच्या रूपांमध्ये शिकवले गेले पाहिजे. जी भाषा तीन महिन्यात शिकली जाते, ती भाषा शिकण्यासाठी आपल्या मुलांचे बालपण हेरून घेणे हे कितपत योग्य आहे.प्रश्न - मातृभाषेतच शिक्षणाची आवश्यकता का आहे?उत्तर- नवीन शोधानुसार ज्या भाषेत माता गर्भावस्थेत गर्भातील शिशुबरोबर बोलते, विचार करतो, शिशु स्वप्न पाहतो. ज्या भाषेत जन्मापासून संवाद करण्यास शकतो जर त्याच भाषेत बालपणात व कुमारअवस्थेत शिक्षण असेल तर त्याचा मानसिक विकास इतका चांगला होतो की, उच्च शिक्षणातील सर्व विषय ग्रहण करण्यास असमर्थ होतो.जीवनात आहार-विहाराला अनन्य महत्त्व आहे. शुद्ध सात्विक आहार घ्या. फास्टफूडचे अन्न आजाराला निमंत्रण देते. संस्कारित अन्न शरीराला प्रेरणा व चैतन्य देत असते. त्यासाठी शुद्ध सात्विक आहार घ्या. मांसाहार टाळा, असे मुनीश्रींनी सांगितले.इंग्रजीचे वर्चस्वामुळे देशाचे प्रचंड नुकसानएखाद्या आधुनिक समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीत मातृभाषेची कोणती भूमिका असू शकते, याची जाणीव आमच्या नेत्यांना अजिबात नाही. ही जाणीव नसल्याने स्वातंत्र्यानंतरही आमची शिक्षणपद्धती नोकरशाही, राजकारण, प्रसिद्धीमाध्यमे, न्यायालय आणि संसदेतही इंग्रजीतच वर्चस्व आहे. इंग्रजीचे वर्चस्वामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे.मातृभाषा सोडून इतर भाषेला शिक्षणाचे माध्यम बनवले तर जास्त शक्ती आणि वेळ ती भाषा शिकण्यात खर्च होते. - मुनीश्री अक्षयसागरजी महाराज

टॅग्स :Jalgaonजळगाव