शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मातृभाषेतून शिक्षण हाच सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र - मुनीश्री अक्षयसागरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 13:17 IST

संदेश

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, ता. जळगाव : भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असून संस्कारयुक्त र्निव्यसनी विद्यार्थीच देश घडविण्याचे काम करू शकतील. पाश्चात्य संस्कृतीमुळे संस्कार, भाषा, भाव, विचार यात आमूलाग्र बदल होत आहे. पाश्चात्य संस्कृतीने भौतिक सुख मिळते पण संस्कार, परंपरा मिळत नाही म्हणून प्रत्येकाने मातृभाषेचा व संस्काराचा अभिमान बाळगून आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे, असे आवाहन १०८ प. पू. अक्षयसागरजी महाराज यांनी केले आहे.‘लोकमत’ला दिलेल्या प्रकट मुलाखतीत ते पुढे म्हणाले की, वाढती व्यसनाधीनता ही देशासाठी घातक आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण फॅशन झाले आहे. मात्र या धकाधकीच्या जीवनात आपल्या मातृभाषेसह संस्कृतीचा विसर या तरुणाईला पडलेला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्याशी झालेली ही बातचित.प्रश्न - इंग्रजी भाषेला विरोध का?उत्तर- इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेला विरोध नाही; परंतु तेच शिक्षणाचे माध्यम म्हणून एका विषयाच्या रूपांमध्ये शिकवले गेले पाहिजे. जी भाषा तीन महिन्यात शिकली जाते, ती भाषा शिकण्यासाठी आपल्या मुलांचे बालपण हेरून घेणे हे कितपत योग्य आहे.प्रश्न - मातृभाषेतच शिक्षणाची आवश्यकता का आहे?उत्तर- नवीन शोधानुसार ज्या भाषेत माता गर्भावस्थेत गर्भातील शिशुबरोबर बोलते, विचार करतो, शिशु स्वप्न पाहतो. ज्या भाषेत जन्मापासून संवाद करण्यास शकतो जर त्याच भाषेत बालपणात व कुमारअवस्थेत शिक्षण असेल तर त्याचा मानसिक विकास इतका चांगला होतो की, उच्च शिक्षणातील सर्व विषय ग्रहण करण्यास असमर्थ होतो.जीवनात आहार-विहाराला अनन्य महत्त्व आहे. शुद्ध सात्विक आहार घ्या. फास्टफूडचे अन्न आजाराला निमंत्रण देते. संस्कारित अन्न शरीराला प्रेरणा व चैतन्य देत असते. त्यासाठी शुद्ध सात्विक आहार घ्या. मांसाहार टाळा, असे मुनीश्रींनी सांगितले.इंग्रजीचे वर्चस्वामुळे देशाचे प्रचंड नुकसानएखाद्या आधुनिक समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीत मातृभाषेची कोणती भूमिका असू शकते, याची जाणीव आमच्या नेत्यांना अजिबात नाही. ही जाणीव नसल्याने स्वातंत्र्यानंतरही आमची शिक्षणपद्धती नोकरशाही, राजकारण, प्रसिद्धीमाध्यमे, न्यायालय आणि संसदेतही इंग्रजीतच वर्चस्व आहे. इंग्रजीचे वर्चस्वामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे.मातृभाषा सोडून इतर भाषेला शिक्षणाचे माध्यम बनवले तर जास्त शक्ती आणि वेळ ती भाषा शिकण्यात खर्च होते. - मुनीश्री अक्षयसागरजी महाराज

टॅग्स :Jalgaonजळगाव