शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद पेठ ते नगरपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 12:11 IST

मुक्ताईनगर ग्रा.पं.ला साडेनऊ दशकांचा इतिहास. पहिले सरपंच विष्णू देशमुख

ठळक मुद्देग्रामपंचायतचे पहिले सरपंचपद विष्णू देशमुखपहिल्या ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या होती सात१९८८ ते १९९३ दरम्यान होती प्रशासकाची नियुक्ती

मतीन शेखमुक्ताईनगर,दि.६ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पूर्वीचे एदलाबाद पेठ ते नगरपंचायत असा तब्बल साडेनऊ दशकांचा ग्रामपंचायतीचा इतिहास आहे. या ग्रा.पं.चे पहिले सरपंच म्हणून विष्णू देशमुख यांच्या नावाची नोंद जुन्या कागदपत्रांमध्ये सापडली आहे.पहिले ग्रामसेवकपद भिकाजी कासार यांनी सांभाळले आहे.साडेनऊ दशकांपासून अस्तित्वात आलेल्या या ग्रामपंचायतीच्या जुन्या दप्तरातील कागदपत्र पडताळणीत एदलाबाद ग्रामपंचायत १९२२ ला अस्तित्वात आल्याचे नमूद असलेली १९२५ पासूनची कागदपत्र आढळून आलीत. यात सर्वात जुन्या प्रोसेडिंग पुस्तकातील काही पाने आढळतात. ज्यामध्ये १९२५ मध्ये विष्णू दाजी देशमुख हे सरपंच असल्याचा पुरावा सापडतो.त्यांच्या अगोदर कोणतीही कागदपत्रे नसल्याने १९२२ ला स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतचे पहिले सरपंचपद विष्णू देशमुख यांच्या नावावर आहे. तर ग्रामपंचायतचे पहिले ग्रामसेवक (सेक्रेटरी) म्हणून भिकाजी जयराम कासार होते.या काळात गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात होती. सदस्य संख्या ७ इतकी होती आणि पंचायत कार्यालय जुने गाव चावडीलगत होते. १९७२ मध्ये हतनूर प्रकल्पांतर्गत गावाचे पुनर्वसन झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीस नवीन गाव परिसरात स्थलांतरित करण्यात आले. नवीन इमारत नसल्याने तेव्हा याच भागात जि.प. शाळेच्या खोलीतून कारभार चालविला जात होता. १८८४ मध्ये नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले व दीड वर्षात ग्रा.पं.ला स्वत:ची नवीन इमारत मिळाली. आता नगरपंचायत झाल्याने ग्रामपंचायत हा इतिहास ठरणार आहे. आॅगस्ट १९८८ ते १९९३ दरम्यान प्रशासक नियुक्ती वगळता स्थापनेपासून आजअखेर ३९ सरपंच व ३९ ग्रामसेवकांच्या यादीत शेवटचे सरपंच म्हणून ललित महाजन, तर ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे अंतिम कार्यवाहक म्हणून नोंद राहील.१९६२ मध्ये झाली तालुका निर्मितीएकेकाळचा एदलाबाद पेठ १९६२ च्या काळात एदलाबाद तालुका झाला. त्यानंतर १९९७ मध्ये मुक्ताईनगर असे नामकरण झाले. इकडे सात सदस्य संख्येची ग्रामपंचायत १७ सदस्य संख्येवर पोहोचली. लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढली. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या २३ हजार ९०० इतकी आहे. तर आज रोजी ३० हजार झाली आहे. नगरपंचायत होण्याचे निकष येथे कधीचेच पूर्ण झाले होते. ग्रामविकास खात्याचा निधी व कर रचनेच्या कारणास्तव येथे नगरपंचायतीचा निर्णय माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लांबणीवर टाकला होता.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगरgram panchayatग्राम पंचायत