शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद पेठ ते नगरपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 12:11 IST

मुक्ताईनगर ग्रा.पं.ला साडेनऊ दशकांचा इतिहास. पहिले सरपंच विष्णू देशमुख

ठळक मुद्देग्रामपंचायतचे पहिले सरपंचपद विष्णू देशमुखपहिल्या ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या होती सात१९८८ ते १९९३ दरम्यान होती प्रशासकाची नियुक्ती

मतीन शेखमुक्ताईनगर,दि.६ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पूर्वीचे एदलाबाद पेठ ते नगरपंचायत असा तब्बल साडेनऊ दशकांचा ग्रामपंचायतीचा इतिहास आहे. या ग्रा.पं.चे पहिले सरपंच म्हणून विष्णू देशमुख यांच्या नावाची नोंद जुन्या कागदपत्रांमध्ये सापडली आहे.पहिले ग्रामसेवकपद भिकाजी कासार यांनी सांभाळले आहे.साडेनऊ दशकांपासून अस्तित्वात आलेल्या या ग्रामपंचायतीच्या जुन्या दप्तरातील कागदपत्र पडताळणीत एदलाबाद ग्रामपंचायत १९२२ ला अस्तित्वात आल्याचे नमूद असलेली १९२५ पासूनची कागदपत्र आढळून आलीत. यात सर्वात जुन्या प्रोसेडिंग पुस्तकातील काही पाने आढळतात. ज्यामध्ये १९२५ मध्ये विष्णू दाजी देशमुख हे सरपंच असल्याचा पुरावा सापडतो.त्यांच्या अगोदर कोणतीही कागदपत्रे नसल्याने १९२२ ला स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतचे पहिले सरपंचपद विष्णू देशमुख यांच्या नावावर आहे. तर ग्रामपंचायतचे पहिले ग्रामसेवक (सेक्रेटरी) म्हणून भिकाजी जयराम कासार होते.या काळात गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात होती. सदस्य संख्या ७ इतकी होती आणि पंचायत कार्यालय जुने गाव चावडीलगत होते. १९७२ मध्ये हतनूर प्रकल्पांतर्गत गावाचे पुनर्वसन झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीस नवीन गाव परिसरात स्थलांतरित करण्यात आले. नवीन इमारत नसल्याने तेव्हा याच भागात जि.प. शाळेच्या खोलीतून कारभार चालविला जात होता. १८८४ मध्ये नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले व दीड वर्षात ग्रा.पं.ला स्वत:ची नवीन इमारत मिळाली. आता नगरपंचायत झाल्याने ग्रामपंचायत हा इतिहास ठरणार आहे. आॅगस्ट १९८८ ते १९९३ दरम्यान प्रशासक नियुक्ती वगळता स्थापनेपासून आजअखेर ३९ सरपंच व ३९ ग्रामसेवकांच्या यादीत शेवटचे सरपंच म्हणून ललित महाजन, तर ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे अंतिम कार्यवाहक म्हणून नोंद राहील.१९६२ मध्ये झाली तालुका निर्मितीएकेकाळचा एदलाबाद पेठ १९६२ च्या काळात एदलाबाद तालुका झाला. त्यानंतर १९९७ मध्ये मुक्ताईनगर असे नामकरण झाले. इकडे सात सदस्य संख्येची ग्रामपंचायत १७ सदस्य संख्येवर पोहोचली. लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढली. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या २३ हजार ९०० इतकी आहे. तर आज रोजी ३० हजार झाली आहे. नगरपंचायत होण्याचे निकष येथे कधीचेच पूर्ण झाले होते. ग्रामविकास खात्याचा निधी व कर रचनेच्या कारणास्तव येथे नगरपंचायतीचा निर्णय माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लांबणीवर टाकला होता.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगरgram panchayatग्राम पंचायत