शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद पेठ ते नगरपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 12:11 IST

मुक्ताईनगर ग्रा.पं.ला साडेनऊ दशकांचा इतिहास. पहिले सरपंच विष्णू देशमुख

ठळक मुद्देग्रामपंचायतचे पहिले सरपंचपद विष्णू देशमुखपहिल्या ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या होती सात१९८८ ते १९९३ दरम्यान होती प्रशासकाची नियुक्ती

मतीन शेखमुक्ताईनगर,दि.६ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पूर्वीचे एदलाबाद पेठ ते नगरपंचायत असा तब्बल साडेनऊ दशकांचा ग्रामपंचायतीचा इतिहास आहे. या ग्रा.पं.चे पहिले सरपंच म्हणून विष्णू देशमुख यांच्या नावाची नोंद जुन्या कागदपत्रांमध्ये सापडली आहे.पहिले ग्रामसेवकपद भिकाजी कासार यांनी सांभाळले आहे.साडेनऊ दशकांपासून अस्तित्वात आलेल्या या ग्रामपंचायतीच्या जुन्या दप्तरातील कागदपत्र पडताळणीत एदलाबाद ग्रामपंचायत १९२२ ला अस्तित्वात आल्याचे नमूद असलेली १९२५ पासूनची कागदपत्र आढळून आलीत. यात सर्वात जुन्या प्रोसेडिंग पुस्तकातील काही पाने आढळतात. ज्यामध्ये १९२५ मध्ये विष्णू दाजी देशमुख हे सरपंच असल्याचा पुरावा सापडतो.त्यांच्या अगोदर कोणतीही कागदपत्रे नसल्याने १९२२ ला स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतचे पहिले सरपंचपद विष्णू देशमुख यांच्या नावावर आहे. तर ग्रामपंचायतचे पहिले ग्रामसेवक (सेक्रेटरी) म्हणून भिकाजी जयराम कासार होते.या काळात गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात होती. सदस्य संख्या ७ इतकी होती आणि पंचायत कार्यालय जुने गाव चावडीलगत होते. १९७२ मध्ये हतनूर प्रकल्पांतर्गत गावाचे पुनर्वसन झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीस नवीन गाव परिसरात स्थलांतरित करण्यात आले. नवीन इमारत नसल्याने तेव्हा याच भागात जि.प. शाळेच्या खोलीतून कारभार चालविला जात होता. १८८४ मध्ये नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले व दीड वर्षात ग्रा.पं.ला स्वत:ची नवीन इमारत मिळाली. आता नगरपंचायत झाल्याने ग्रामपंचायत हा इतिहास ठरणार आहे. आॅगस्ट १९८८ ते १९९३ दरम्यान प्रशासक नियुक्ती वगळता स्थापनेपासून आजअखेर ३९ सरपंच व ३९ ग्रामसेवकांच्या यादीत शेवटचे सरपंच म्हणून ललित महाजन, तर ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे अंतिम कार्यवाहक म्हणून नोंद राहील.१९६२ मध्ये झाली तालुका निर्मितीएकेकाळचा एदलाबाद पेठ १९६२ च्या काळात एदलाबाद तालुका झाला. त्यानंतर १९९७ मध्ये मुक्ताईनगर असे नामकरण झाले. इकडे सात सदस्य संख्येची ग्रामपंचायत १७ सदस्य संख्येवर पोहोचली. लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढली. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या २३ हजार ९०० इतकी आहे. तर आज रोजी ३० हजार झाली आहे. नगरपंचायत होण्याचे निकष येथे कधीचेच पूर्ण झाले होते. ग्रामविकास खात्याचा निधी व कर रचनेच्या कारणास्तव येथे नगरपंचायतीचा निर्णय माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लांबणीवर टाकला होता.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगरgram panchayatग्राम पंचायत