शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

‘ई-पीक पाहणी’ ठरतेय ग्रामीण शेतकऱ्यांना डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क महिंदळे, ता. भडगाव : ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांची फरपट होत आहे. पीक पाहणी झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

महिंदळे, ता. भडगाव : ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांची फरपट होत आहे. पीक पाहणी झाली नाही तर आपल्याला शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही या विवंचनेत शेतकरी आहेत.

मोबाइल घेऊन आपल्या शेताच्या बांधावर शेतकरी दिसत आहेत; पण नेट प्रॉब्लेम, तर कधी ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड होत नाही आणि

शासनाने परिपत्रक काढले...१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान शेतात जा. मोबाइल काढा. त्यावर ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा. त्यात माहिती भरा. सुरुवातीला आलेला ४ अंकी ओटीपी कायमचा लक्षात ठेवा. कोणतं पीक आहे हे त्यात लिहा. पिकासोबतचा तुमचा फोटो अपलोड करा. तलाठी हे काम करणार नाही.

सगळं तुमचं तुम्हीच करा. नांगरा, कोळपा, पेरा, धान्य काढा आणि मातीमोल किमतीत बाजारात विकून या प्रत्येक गोष्टीसाठी आधारकार्ड पाहिजे, सातबारा पाहिजे, फायदा झाल्यास सरकार डंका वाजविणार आमच्या धोरणाचं यश. तोटा झाल्यास निसर्गावर ढकलणार किंवा शेतकरी व्यसनी असतात म्हणणार, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

शेतकरी पीक पेरा लावण्यासाठी मोबाइलवर ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करू लागले आहेत आणि ओटीपी लक्षात ठेऊन माहिती भरायला सुरुवातही करीत आहेत. नाव, गाव, गट नंबर, सर्व्हे नंबर सगळे टाकून झाले. सोयाबीन, कपाशी, केळी, भेंडी, मका, बाजरी, ज्वारी, आदींसोबत उभा राहून फोटो काढला; पण डाउनलोड होईना, कारण रेंज येत नाही. आता ही तक्रार कोणाकडे करायची? उन्हातान्हात उभे राहून रेंज येण्याची वाट पाहत बसावे लागत आहे. तरीही जमिनीची नोंद टाकली व त्यात आपण पेरणी केलेल्या पिकांची नोंद केली तर पलीकडून मेसेज येतो. तुमच्या नावाने तेवढी जमीनच नाही. ही समस्या आपल्या टेक्नॉलॉजीची मग आता हा टेक्निकल प्रॉब्लेम कोण दूर करणार? असा सवालही केला जात आहे.

प्रतिक्रिया

शासनाने आता जो शेतकऱ्यांचा पीक पेरा तलाठ्याकडून काढून घेऊन ऑनलाइन केला; पण ग्रामीण भागात या ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही पीकपेरा लागत नाही. आम्ही काय करावे, असा प्रश्न पडला आहे. ही ऑनलाइन पद्धत शासनाने बंद करून तलाठ्याकडील पीक पेरा कायम ठेवावा.

गोपीचंद धनराज देवरे, शेतकरी, महिंदळे, ता. भडगाव

आम्हाला शासनाच्या विरोधात जायचे नाही. शासनाची ई-पीक पाहणी योग्यच आहे; पण ग्रामीण भागात अजूनही ऑनलाइन पद्धत वापरण्यास शेतकरी सक्षम झालेला नाही व आजही अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत. त्यामुळे पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी रेंज राहत नाही, तर काहींना ऑनलाइन करता येत नाही. यावर कायम उपाय काढणे आवश्यक आहे.

-उत्तमराव शामराव पाटील,

अध्यक्ष, वि. का. सो., महिंदळे