शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

भरपावसाळ्यात महाबळवासीयांवर आली पाण्यासाठी भटकंतीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासह शहरात एकीकडे पावसाचे दमदार आगमन झाले असताना, पाणीटंचाईची समस्या मार्गी लागत आहे. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यासह शहरात एकीकडे पावसाचे दमदार आगमन झाले असताना, पाणीटंचाईची समस्या मार्गी लागत आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील महाबळ भागात भरपावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना रात्री- बेरात्री पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच नागरिकांना मनपा कर्मचाऱ्यांकडे पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, मनपाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाची पातळीदेखील आता वाढू लागली आहे. गेल्यावर्षी पुरेसा पाऊस झाल्यानंतर जळगावकरांना ऐन उन्हाळ्यातदेखील पाण्याची समस्या निर्माण झाली नाही. मात्र, मनपा पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजन व उदासीनतेमुळे शहरातील महाबळ परिसरातील नागरिकांना भरपावसाळ्यात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनदेखील मनपा प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

टाक्यांमध्ये मुबलक पाणी, घरांमध्ये मात्र पोहोचेना

महाबळ परिसराचे नगरसेवक नितीन बरडे यांच्याकडे स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर बरडे यांनी मनपाकडे चौकशी केली असता, या भागातील पाण्याचा टाक्या पूर्णपणे भरत आहेत. मात्र, घरांपर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, याठिकाणी पाण्याची मोटार जुनाट असून, मनपाकडून ती दुरुस्तदेखील केली जात नसल्याने पाण्याची उचल कमी होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे उंच भागात पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत नितीन बरडे यांनी गुरुवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली, तसेच याबाबत लवकर तोडगा काढण्याची मागणी केली. त्यानुसार शुक्रवारी मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व अभियंत्यांची बैठक घेतली जाणार असल्याची माहिती बरडे यांनी दिली.