शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकटामुळे जळगावातील १०८ गावांमधील हागणदारीमुक्ती धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 14:36 IST

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने शौचालयांचा वापर झाला बंद

जळगाव : सरासरीपेक्षा कमी झालेले पर्जन्यमान आणि मे महिन्यात वेगाने कमी होत असलेली भूजलपातळी यामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १०८ गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत असल्याने ग्रामीण भागात शौचालयांचा वापर बंद झाला आहे.जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून अनेक गावांमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिला, लहान मुलांसह नागरिकांकडून पायपीट केली जात आहे.

१०८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठासद्यस्थितीला जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांमधील जलस्त्रोत कमी झाल्याने या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अमळनेर तालुक्यातील ४४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. त्यापाठोपाठ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील २६ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील १९ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही, तर शौचालयाच्या वापरासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न कायम आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांनी शौचालयांचा वापर बंद केला आहे.

कपडे धुण्याचे पाणी शौचालयासाठीपाणी टंचाईच्या काळात देखील शौचालयाचा वापर करण्यावर काही कुटुंबांनी पर्याय शोधला आहे. अंघोळ आणि कपडे धुण्याचे पाणी एका टाकीत साठवून ठेवत त्याचा शौचालयासाठी वापर ग्रामीण भागात करण्यात येत आहे. कुटुंबातील वृद्ध तसेच महिलांकडूनच या काळात शौचालयाचा वापर करण्यात येत आहे. तर अन्य सदस्य पाण्याअभावी नाईलाजास्तव उघड्यावर प्रात:विधीसाठी जात आहेत.

विहिरीच्या जलस्त्रोतासाठी नालाबांधपाण्याअभावी वैयक्तिक शौचालयांचा वापर थांबल्याने काही गावांमध्ये ग्रामपंचायतीतर्फे सुरु करण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांचा वापर वाढला आहे. नाल्याच्या शेजारी असलेल्या विहिरीचा जलस्त्रोत पुर्नजिवित व्हावा यासाठी नाल्याचे सांडपाणी अनेक ठिकाणी अडवण्यासाठी नालाबांध करण्यात येत आहे.

पिण्यासाठीच नाही तर शौचालयासाठी पाणी कुठून आणणार?अमळनेर, जामनेर व पारोळा तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये ग्लासभर पिण्यासाठी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पिण्यासाठीच नाही तर शौचालयासाठी पाणी कोठून आणणार असा प्रश्न या गावातील महिलांसह नागरिकांपुढे आहे.

१८१ गावांमध्ये पाणीबाणीजळगाव जिल्ह्यातील १८१ गावांमध्ये पाणी टंचाई सदृष्यस्थिती आहे. त्यामुळे या गावांमधील शेतातील तसेच परिसरातील विहिरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनाने केले आहे. या गावांमध्ये १० ते १५ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. भांड्यांमध्ये पिण्याचे पाणी साठवण्याचा प्रयत्न होत असल्याने डेंग्यू तसेच मलेरियाच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे.

सार्वजनिक शौचालयांचा वापर वाढलाग्रामपंचायतींमार्फत सार्वजनिक शौचालयासाठी अखंडित पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याअभावी वैयक्तिक शौचालय बंद करत अनेकांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाई असलेली गावे- जळगाव- २०६जामनेर- २६३७धरणगाव- १७एरंडोल- १०७भुसावळ- २०९मुक्ताईनगर- १२४बोदवड- ११०पाचोरा- ३१३चाळीसगाव- ९०३अमळनेर- ४४४०पारोळा- १९११ 

टॅग्स :Jalgaonजळगाव