शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

उधारी फेडण्यासाठी विकावे लागले ठिबक

By ram.jadhav | Updated: December 21, 2017 00:54 IST

कापूस उत्पादक शेतकºयाची व्यथा : गुलाबी बोंड अळीने काढले दिवाळे

ठळक मुद्दे बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील तुळशीराम गायकवाड या शेतकºयाची बिकट अवस्थाज्वारीलाही लागली मर, उत्पन्न आले शुन्यआधुनिक तंत्रज्ञानापासून शेतकरी पुन्हा एक पाऊल मागे

आॅनलाईन लोकमतराम जाधव।जळगाव दि़ २० - उत्पन्न वाढण्याच्या अपेक्षेने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी घेतलेल्या ठिबक सिंचनाचा संचच बोंडअळीमुळे अपेक्षित उत्पन्नाअभावी उधारीचे पैसे फेडण्यासाठी एका कापूस उत्पादक शेतकºयाला विकावा लागला आहे़ गुलाबी बोंडअळीने झालेल्या या अतोनात नुकसानीमुळे अशी परिस्थिती राज्यातील अनेक शेतकºयांची झालेली आहे़ बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील तुळशीराम गायकवाड या शेतकºयावर ही परिस्थिती ओढवली़तुळशीराम यांच्याकडे एकूण ९ एकर जमीन आहे़ पैकी वेगवेगळ्या वाणांच्या कपाशीची लागवड गायकवाड यांनी केली होती़ पाणी कमी म्हणून त्यांनी ४ वर्षांपूर्वी ५ एकर क्षेत्रासाठी नामांकित कंपनीचे ठिबक केले होते़ अजून उर्वरित २ एकर क्षेत्रावरील कपाशीलाही पाणी देता यावे, म्हणून त्यांनी यावर्षी उधारीवर आणखी दुय्यम दर्जाचे ठिबक घेतले़ त्यातून जेमतेम कपाशीचे पीक बहरलेही, मात्र आलेल्या कैºयांवर गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले़गायकवाड यांना ७ एकर क्षेत्रामध्ये केवळ २२ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले़ म्हणजेच एकरी ३ क्विंटल १४ किलो इतके, यासाठी त्यांना एकरी किमान १० ते १२ हजार रुपये इतका खर्च आला आहे़ हा कापूस त्यांनी सरासरी ४ हजार रुपये प्रती क्विंटलप्रमाणे विकला़ त्यातून त्यांना १२,५६० रुपये एकरी उत्पन्न मिळाले आहे़त्यामुळे आता त्यांना संपूर्ण वर्ष कसे काढायचे याची चिंता आहे़ त्यातच उधारीवर घेतलेल्या ठिबकचे पैसे देणे आवश्यक असल्यामुळे ते फेडण्यासाठी नगदी घेतलेले ५ एकरचे ठिबकही विकावे लागले़ अन्यथा हेच ठिबक त्यांना अजून किमान ५ ते १० वर्ष टिकले असते़ मात्र उधारी फेडण्यासाठी तुळशीराम यांना ठिबक विकावे लागल्याने त्यांचे उत्पादन अजूनच घटणार आहे़तरीही तुळशीराम यांना आत्मविश्वास४निसर्गाची साथ नाही, सरकारची मदत नाही, तरीही तुळशीराम म्हणतात, मदत नको, कर्जमाफीही नको, फक्त माझ्या शेतात माल होऊ द्या व त्याला भाव मिळू द्या, मग गरज नाही शेतकºयाला कशाचीच़४अशी प्रामाणिक भूमिका त्यांनी पोटतिडकीने मांडली़तुळशीराम यांच्या घरात पत्नी दोन मुले व आई असा परिवार आहे़४संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या तुळशीरामाला ताठ मानेने जगणे मात्र महत्त्वाचे वाटते, त्यामुळे ठिबक विकून का होईना, मात्र उधारीचे पैसे त्यांनी देण्याचा निर्णय घेतला़गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान कमीच की काय म्हणून, तुळशीराम गायकवाड यांनी एकरभर लावलेल्या ज्वारीला मर लागली, जी काय वाढली तिलाही कणीसचं लागले नाही़ ती अजूनही शेतातच पडून आहे़ त्यामुळे गायकवाड यांचे संपूर्ण गणित बिघडले आहे़‘आम्हाले कर्जमाफी नको अन् कोणतीही सरकारच्या मदतची भिक नको’ फक्त आमच्या शेतात माल पिकला पाहिजे अन् तेले हिशेबात भाव भेट्याले पाहिजे’़ उधारी देणं बाकी हे़-तुळशीराम गायकवाड, भानखेडा, ता़ बोदवड़http://www.lokmat.com/yavatmal/pink-bond-slowly-farmers-havoc/ 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी