शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जळगावच्या बाजारपेठेत मागणी घटल्याने धान्याचे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 13:07 IST

धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी कमी

जळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी कमी झाली असून गव्हाची आवक व मागणीही कमी झाल्याने भाव स्थिर आहेत. वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी सुरू होती, तीदेखील थांबली आहे. गेल्या दोन महिन्यापासून गहू व डाळीमध्ये दर आठवड्याला तेजी येत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. दीड महिनाभरापूर्वी वाढलेल्या तांदळाचे भावदेखील महिनाभरापासून स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन कडधान्याची आवक कमी झाली व त्याचा डाळीवर परिणाम झाला आणि सुरुवातीपासूनच डाळींचे भाव वाढू लागले. त्यात यंदाही पाऊस लांबणार असल्याचे चित्र असल्याने व मागणी वाढल्याने गेल्या दोन महिन्यापासून धान्य, डाळींचे भाव वाढत होते. मात्र मागणी कमी झाल्याने गेल्या आठवड्यात गव्हाचे भावदेखील कमी झाले होते. या आठवड्यात ते स्थिर असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या मुगाच्या डाळीचे भाव १०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते ७९०० ते ८३०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. उडीदाच्या डाळीच्या भावातही घसरण होऊन ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवरून ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५६०० ते ६००० रुपये प्रती क्विंटलवर तर तसेच तूरडाळीच्या भावातदेखील २०० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ते ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटलवरून ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.गव्हाचे भाव स्थिरवर्षभरासाठी धान्य खरेदी थांबल्याने दोन आठवड्यांपासून गव्हाचे भाव कमी झाले आहेत. या आठवड्यात ते स्थिर राहिले. १४७ गव्हाचे भाव २३०० ते २३५० रुपये प्रती क्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २२५० ते २३५० रुपये प्रती क्विंटल तर चंदोसीचे भाव ३७०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भावदेखील २४०० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून येणाऱ्या गव्हाची आवकही थांबली आहे.तांदुळाचे भाव स्थिरतांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने अडीच महिन्यांपूर्वी तांदळाच्या भावातही वाढ झाली होती. मात्र महिनाभरापासून हे भाव स्थिर आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव