शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

खपणाऱ्यांच्या तपोभूमीवर स्वप्नेच बंदिस्त होतील, तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:40 IST

शुभेच्छा कार्ड या सदरात ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत अभ्यासक जयंत पाटील...

या शुभेच्छा कार्डात प्रामाणिकपणा आणि सुंदरता हा विषय आहे़विठ्ठलाच्या काळ्याश्यार मूर्तीला तुकाराम महाराज, सुंदर ते ध्यान उभें विटेवरी! करकटावरी ठेवूनिया ।।१।। असे म्हणतात.मेंढ्या राखणारा एखादा काळ्याशार वर्णाचा धनगर त्या काळ्या शिवारातून उगवून आला आहे, असेच वाटते़ तोही त्या विठ्ठलासारखाच सुंदर आहे़ मी आनंदवनात असताना हेमलकशाला अनेकदा गेलेलो आहे़आदिवासी गोंंड-माडिया स्त्रिया पाहिल्या आहेत़ त्यांची त्वचा इतकी निर्मळ- जीवनधर्मी असते की, विचारू नका. आपल्या शहरी माणसांची सौंदर्य दृष्टी कॅलेंडरवरून तयार झालेली दिसते़ त्या स्त्रिया प्रत्येक ऋतू त्या ऋतूप्रमाणे भोगतात़ त्यांचे जगणेही तसेच स्वच्छ- प्रामाणिक.आनंदवनात फॉरेनची काही मंडळी तिकडच्या बिस्किटांचे डबे पाठवायचे. बाबा हेमलकशाला जायच्या वेळी तेथील मुलांसाठी ते डबे आठवणीने घ्यायचे़स्टुलावर मध्यभागी बिस्किटांचा डबा ठेवलेला असायचा. त्या डब्याभोवती वर्तुळ करून आदिवासी पुरूष, बायका, मुले, उभी राहायची. बाबा सांगायचे, प्रत्येकाने एक- एक बिस्किट घ्यायचे. या आज्ञेचे इतके प्रामाणिकपणे पालन व्हायचे की, विचारू नका़ एकाही स्त्री किंवा मुलाने दोन बिस्किटे उचलल्याचे कधीही दिसले नाही़अलिकडे आपला बनेलपणा- दाखविगिरी इतकी भीषण पातळीवर पोहचली आहे की, कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या गौरवाच्या जाहिराती काढून पाहाव्यात.दुसरी एक गोष्ट अशी पूर्वी माणसांना- तरूणांना घामाचा वास येत नव्हता का? मुंबई - पुण्यात तर घरात ए़ सी़, कार्यालयात ए़सी़ म्हणजे घाम येण्याचा प्रश्नच नाही़ आमचे मानराजपार्क किती छोटेसे. इथेदेखील अनेक घरात बाहेर जाण्यापूर्वी डिओ मारला जातो़ तेव्हा तर वास येतोच़ पण जेव्हा ते गाडीवर बसून हायवेकडे जातात तिथपर्यत तो वास येत राहतो़ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध एखाद्या ठिकाणी गेल्यावर पसरत नाही़ त्याच मंडळींना यांची गरज असाविशी वाटते़बाबा आमटेंनी या घामाला, कष्टकऱ्यांच्या घामाला स्वेद - रस म्हटले आहे़बाबांची कविता़-‘खपणाºयांच्या तपोभूमीवरश्रम- रसाचे सुगंधी गुत्तेझिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत्याची चटक लागली तरजगणे हरवून बसलेलीकलेवरेही तेथे गर्दी करतीलप्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना आकार येईलस्वेद-रसाची ही मद्यशाळा अल्पावधीत आटून जाईलअथवा खपणाºयांच्या तपोभूमीवरस्वप्नेच बंदिस्त होतीलम्हणून असे बिचकू नकाकारण जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतातआणि प्रज्ञा-पुत्रांच्या स्वप्नांनी बंदीस्तपणा स्वीकारण्याचा इतिहास नाही !-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव