शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अमळनेर तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तापीचे वाहून जाणारे पाणी नदी-नाल्यात टाकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:58 AM

नव्या संकल्पनेसाठी तालुक्यात जनजागृती सुरू

ठळक मुद्देपाणी टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार

चुडामण बोरसे / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २४ - अमळनेर तालुक्यातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी तापी नदीवरुन वाहून जाणारे पावसाचे पाणी प्रत्येक नाल्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये उपसा सिंचनाद्वारे टाकून सर्व नदी- नाले पावसाच्या पाण्याने रिचार्ज करावेत, अशी संकल्पना पुढे येत आहे. यासाठी गडखांब ता. अमळनेर येथील जय किसान शेतकरी मंडळाचे अध्यक्ष रमेश व्यंकट पाटील यांनी जनजागृती सुरु केली आहे़हा नवा प्रकल्प झाल्यास तालुक्यात दरवर्षी येणाºया दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे एवढेच नाही तर तालुक्याचा पिण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. अमळनेर हा कायमस्वरुपी अवर्षण प्रवण आणि पर्जन्यछायेत असणारा तालुका आहे. गेल्या वर्षी पावसाळा अत्यल्प झालेला आहे. अमळनेर तालुक्याला नेहमीच दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. तापी नदी अमळनेर तालुक्यातून वाहत असली तरी ती फक्त जुलै ते जानेवारी या दरम्यान वाहत असते.काय आहे योजनातालुक्याचा दुष्काळ आणि पाणी प्रश्न कायम सोडविण्यासाठी तापी नदीवरुन निम्न बंधाºयातून नियोजित उपसा सिंचन योजना तयार करण्यात याव्यात, तापी नदीचे पाणी तालुक्यातील प्रत्येक नाल्याच्या सुरुवातीला पुनर्भरणासाठी टाकले तर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकेल. अमळनेर तालुक्यातील तापी नदी ते सूरत रेल्वे मार्ग एवढे ४० टक्के क्षेत्र मंजूर व अस्तित्वात असलेल्या उपसा सिंचन योजनांमध्ये समावेश केल्यास हे सर्व शक्य असल्याची माहिती पाटील यांनी दिली़या शिवारातील नदी नाल्यावर तापी नदीवरुन उपसा सिंचनाद्वारे जुलै ते जानेवारी महिन्यापर्यंत सात महिने पावसाचे पाणी टाकल्यास पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार आहे.राज्यात उपसा सिंचन योजनांना सध्या भरमसाठ वीजबिलांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चांगल्या योजनांना यामुळे खीळ बसत आहे. तसे होऊ नये, म्हणून सौर उर्जा व वीज अशा हायब्रीङ पद्धतीने वीज बिलाची समस्या सोडविता येईल. या विषयावर ग्रामसभा घेऊन लोकांना याचे महत्व पटावे, यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा मानस आहे.- रमेश पाटील, अध्यक्ष, जयकिसान शेतकरी मंडळ, गडखांब, अमळनेर.

टॅग्स :AmalnerअमळनेरWaterपाणी