शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

एकनाथराव खडसेंना कामांचे श्रेय मिळू नये यासाठी कामे रखडली : डॉ.राधेश्याम चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:02 IST

समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल

ठळक मुद्देसमांतर रस्त्यांसाठी दिवाळीनंतर पुन्हा आंदोलनडीपीआरची स्थिती सांगावी अन्यथा माफी मागावीआमदार सुरेश भोळे यांना ६० टक्के जनमत नाहीच

जळगाव : समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, अशी माहिती कॉँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रश्नी जळगाव फर्स्टच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, समांतर रस्त्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवर दररोज सकाळी आठवण करून दिली. आज ६०० वे ट्विट करण्यात आले आहे.समांतर रस्त्याअभावी अनेकांचे बळी जात आहेत, तरीही याप्रश्नी सत्ताधारी भाजपा असंवेदनशील का आहे? जळगावकरांनी समांतर रस्त्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर डीपीआरचे कवित्व सुरू झाले. सुरुवातीला ३६५, त्यानंतर १००, १२५ आणि आता १३९ कोटी रुपयांचा डीपीआर तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण तो अजूनही मंजूर नाही.तर महामार्गाचा दर्जा गमावू शकतोजळगाव शहराच्या बाहेरून बायपास झाल्यावर सध्याचा रस्ता आपला महामार्गाचा दर्जा गमावू शकतो. अशावेळी केंद्र सरकार देखील आपली जबाबदारी झटकेल याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकार म्हणजे भाजपाचे षङ्यंत्र तर नाही असा प्रश्नही डॉ. चौधरी यांनी केला. जळगाव-औरंगाबाद, जळगाव-पाचोरा रस्त्याची कामे युध्दपातळीवर होत असताना चिखली ते फागणे या पट्ट्यात महामार्ग चौपदरीकरणासाठी ठेकेदार का मिळू नये? असा प्रश्न डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थित केला. तसेच समांतर रस्त्याबाबत दिवाळीनंतर आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला.आमदार पटेल भाजपाचे ‘एटीएम’१८ हजार ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या कोनशिलेचे अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते जळगावात झाले. तेव्हापासूनच लोकप्रतिनिधींमध्ये पत्रकबाजीची स्पर्धा सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांनी आठ दिवसात काम सुरू होईल, असे सांगितले होते.तर गिरीश महाजन दुसरेच काही सांगतात. आमदार भोळे तिसरेच काही तरी सांगतात. निवडणुका आल्या की आमदार चंदुलाल पटेल हे पुढे येतात. आमदार पटेल म्हणजे भाजपाचे ‘एटीएम’ असल्याचाही आरोप डॉ.राधेश्याम चौधरी यांनी घेतला.आमदार सुरेश भोळे यांना ६० टक्के जनमत नाहीचआमदार सुरेश भोळे हे ६० टक्के जनमत असल्याचे सांगतात. मनपात निवडून आलेल्या ५७ नगरसेवकांचे जनमत घ्या पाचही त्यांच्या बाजूने नसतील असा टोलाही डॉ. चौधरी यांनी मारला.डीपीआरची स्थिती सांगावी अन्यथा माफी मागावीशहरातील समांतर रस्ते तसेच १८०० कोटींच्या कामांचे श्रेय एकनाथराव खडसे यांना मिळू नये म्हणूनही कामे रखडले असल्याचा आरोप डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केला. खडसे म्हणजे जे बोलतो ते करतो अशी त्यांची ख्याती आहे. मात्र त्यांनी कबुल केले ते होऊ नये असा प्रयत्न या पक्षातील काही मंडळींचा आहे मात्र याचा भुर्दंड पाच लाख जळगावकरांना बसत आहे. स्थानिक आमदार व खासदारांनी या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) आजची स्थिती सांगावी किंवा जळगावकरांची माफी मागावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगावcongressकाँग्रेस