शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथराव खडसेंना कामांचे श्रेय मिळू नये यासाठी कामे रखडली : डॉ.राधेश्याम चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:02 IST

समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल

ठळक मुद्देसमांतर रस्त्यांसाठी दिवाळीनंतर पुन्हा आंदोलनडीपीआरची स्थिती सांगावी अन्यथा माफी मागावीआमदार सुरेश भोळे यांना ६० टक्के जनमत नाहीच

जळगाव : समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, अशी माहिती कॉँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रश्नी जळगाव फर्स्टच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, समांतर रस्त्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवर दररोज सकाळी आठवण करून दिली. आज ६०० वे ट्विट करण्यात आले आहे.समांतर रस्त्याअभावी अनेकांचे बळी जात आहेत, तरीही याप्रश्नी सत्ताधारी भाजपा असंवेदनशील का आहे? जळगावकरांनी समांतर रस्त्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर डीपीआरचे कवित्व सुरू झाले. सुरुवातीला ३६५, त्यानंतर १००, १२५ आणि आता १३९ कोटी रुपयांचा डीपीआर तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण तो अजूनही मंजूर नाही.तर महामार्गाचा दर्जा गमावू शकतोजळगाव शहराच्या बाहेरून बायपास झाल्यावर सध्याचा रस्ता आपला महामार्गाचा दर्जा गमावू शकतो. अशावेळी केंद्र सरकार देखील आपली जबाबदारी झटकेल याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकार म्हणजे भाजपाचे षङ्यंत्र तर नाही असा प्रश्नही डॉ. चौधरी यांनी केला. जळगाव-औरंगाबाद, जळगाव-पाचोरा रस्त्याची कामे युध्दपातळीवर होत असताना चिखली ते फागणे या पट्ट्यात महामार्ग चौपदरीकरणासाठी ठेकेदार का मिळू नये? असा प्रश्न डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थित केला. तसेच समांतर रस्त्याबाबत दिवाळीनंतर आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला.आमदार पटेल भाजपाचे ‘एटीएम’१८ हजार ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या कोनशिलेचे अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते जळगावात झाले. तेव्हापासूनच लोकप्रतिनिधींमध्ये पत्रकबाजीची स्पर्धा सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांनी आठ दिवसात काम सुरू होईल, असे सांगितले होते.तर गिरीश महाजन दुसरेच काही सांगतात. आमदार भोळे तिसरेच काही तरी सांगतात. निवडणुका आल्या की आमदार चंदुलाल पटेल हे पुढे येतात. आमदार पटेल म्हणजे भाजपाचे ‘एटीएम’ असल्याचाही आरोप डॉ.राधेश्याम चौधरी यांनी घेतला.आमदार सुरेश भोळे यांना ६० टक्के जनमत नाहीचआमदार सुरेश भोळे हे ६० टक्के जनमत असल्याचे सांगतात. मनपात निवडून आलेल्या ५७ नगरसेवकांचे जनमत घ्या पाचही त्यांच्या बाजूने नसतील असा टोलाही डॉ. चौधरी यांनी मारला.डीपीआरची स्थिती सांगावी अन्यथा माफी मागावीशहरातील समांतर रस्ते तसेच १८०० कोटींच्या कामांचे श्रेय एकनाथराव खडसे यांना मिळू नये म्हणूनही कामे रखडले असल्याचा आरोप डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केला. खडसे म्हणजे जे बोलतो ते करतो अशी त्यांची ख्याती आहे. मात्र त्यांनी कबुल केले ते होऊ नये असा प्रयत्न या पक्षातील काही मंडळींचा आहे मात्र याचा भुर्दंड पाच लाख जळगावकरांना बसत आहे. स्थानिक आमदार व खासदारांनी या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) आजची स्थिती सांगावी किंवा जळगावकरांची माफी मागावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगावcongressकाँग्रेस