शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

Shivsena: आमदारांना तुम्ही हलकटसारखं निघून जायला सांगता?, गुलाबरावांनी सांगितला तो प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 13:09 IST

गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

जळगाव - आम्ही शिवसेना सोडली नाही, त्यामुळे आम्हाला आमदारकीचा राजीनामा देण्याची गरजच नाही. आम्ही शिवसेनेचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी काम करत असून, त्यासाठी दिवसरात्र झटून पुढेही काम करत राहू. मात्र, पक्षप्रमुखांनी जे आधी करायला हवे होते ते आता करीत आहेत. उद्धव ठाकरेंना विनामास्क शिवसेनेच्या शाखांवर जावे लागत आहे. हे त्यांच्यासाठी दुर्दैव म्हणावेच लागेल, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर भाष्य केलं. तसेच, ते गुवाहाटीला जाताना घडलेला प्रसंगही त्यांनी सांगितला. 

गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. युवा सेनेच्या तालुका व जिल्हा प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून, नव्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यानंतर, त्यांनी लोकमतशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

कार्यकर्ते नेत्यांचं ऐकत असताना, मग नेत्यांनीही कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे. मला व्यक्तिगत अडचण नव्हती. पण, पहिल्या वेळेस निवडून आलेल्या आमदारांची मोठी खदखद होत होती. मी तर मातोश्रीवरच होतो, मी 34 वा आमदार आहे तिकडे जाणारा. मी त्यावेळी संजय राऊतांना सांगितलं की, अजूनही वेळ गेलेले नाही, त्यांना बोलवा. तर, ते म्हणाले तुम्हालाही जायचं असेल तर जावा... असे राऊत म्हणाले. 4 लाख लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना तुम्ही हलकटसारखं निघून जायला सांगता, असं राजकारण मला वाटत नाही कुठे असेल, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. 

आम्हीही विचार केला की, मंत्रीपद गेलं खड्ड्यात, आम्ही मंत्रीपद सोडून बाहेर निघालो. आज लोकं सरपंचपद सोडत नाहीत, पण आम्ही मंत्रीपद सोडून निघालो, यावरुन तीव्रता तुमच्या लक्षात येईल. आता लढाई ना तुमच्या हातात ना आमच्या हातात, आता लढाई निवडणूक आयोगाच्या हातात आहे. आता, ते सांगतिल ते, असेही गुलाबरावा पाटील यांनी स्पष्ट केले. 

आदित्य ठाकरेंनी हेच काम आधी करायचं होतं

आदित्य ठाकरे आज निष्ठायात्रा काढत आहेत, हेच काम जर आधी केले असते तर पक्षावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

दोन दिवस जिल्ह्यातच, पुढे पहाच

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नसल्याने अनेकांसोबत चर्चा करता आलेली नाही; मात्र आता दोन दिवस जिल्ह्यातच थांबणार असल्याने अनेकांसोबत चर्चा करायच्या आहेत. तसेच येत्या काळात त्याबाबतचे चित्र दिसेलच असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाGulabrao Patilगुलाबराव पाटीलSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे