शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Shivsena: आमदारांना तुम्ही हलकटसारखं निघून जायला सांगता?, गुलाबरावांनी सांगितला तो प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 13:09 IST

गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

जळगाव - आम्ही शिवसेना सोडली नाही, त्यामुळे आम्हाला आमदारकीचा राजीनामा देण्याची गरजच नाही. आम्ही शिवसेनेचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी काम करत असून, त्यासाठी दिवसरात्र झटून पुढेही काम करत राहू. मात्र, पक्षप्रमुखांनी जे आधी करायला हवे होते ते आता करीत आहेत. उद्धव ठाकरेंना विनामास्क शिवसेनेच्या शाखांवर जावे लागत आहे. हे त्यांच्यासाठी दुर्दैव म्हणावेच लागेल, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर भाष्य केलं. तसेच, ते गुवाहाटीला जाताना घडलेला प्रसंगही त्यांनी सांगितला. 

गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. युवा सेनेच्या तालुका व जिल्हा प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून, नव्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यानंतर, त्यांनी लोकमतशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

कार्यकर्ते नेत्यांचं ऐकत असताना, मग नेत्यांनीही कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे. मला व्यक्तिगत अडचण नव्हती. पण, पहिल्या वेळेस निवडून आलेल्या आमदारांची मोठी खदखद होत होती. मी तर मातोश्रीवरच होतो, मी 34 वा आमदार आहे तिकडे जाणारा. मी त्यावेळी संजय राऊतांना सांगितलं की, अजूनही वेळ गेलेले नाही, त्यांना बोलवा. तर, ते म्हणाले तुम्हालाही जायचं असेल तर जावा... असे राऊत म्हणाले. 4 लाख लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना तुम्ही हलकटसारखं निघून जायला सांगता, असं राजकारण मला वाटत नाही कुठे असेल, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. 

आम्हीही विचार केला की, मंत्रीपद गेलं खड्ड्यात, आम्ही मंत्रीपद सोडून बाहेर निघालो. आज लोकं सरपंचपद सोडत नाहीत, पण आम्ही मंत्रीपद सोडून निघालो, यावरुन तीव्रता तुमच्या लक्षात येईल. आता लढाई ना तुमच्या हातात ना आमच्या हातात, आता लढाई निवडणूक आयोगाच्या हातात आहे. आता, ते सांगतिल ते, असेही गुलाबरावा पाटील यांनी स्पष्ट केले. 

आदित्य ठाकरेंनी हेच काम आधी करायचं होतं

आदित्य ठाकरे आज निष्ठायात्रा काढत आहेत, हेच काम जर आधी केले असते तर पक्षावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

दोन दिवस जिल्ह्यातच, पुढे पहाच

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नसल्याने अनेकांसोबत चर्चा करता आलेली नाही; मात्र आता दोन दिवस जिल्ह्यातच थांबणार असल्याने अनेकांसोबत चर्चा करायच्या आहेत. तसेच येत्या काळात त्याबाबतचे चित्र दिसेलच असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाGulabrao Patilगुलाबराव पाटीलSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे