शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

दिवाळी होणार ‘नमकीन’, डाळींच्या भावात मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:20 PM

भाव सहा महिन्यांच्या निच्चांकीवर

ठळक मुद्देतेलातही वाढ नाहीबेसनपीठाचेही भाव घसरलेआवक वाढली

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 -  आवकच्या तुलनेत मागणी नसल्याने  डाळींचे भाव गडगडल्याने ग्राहकांना दिलासा मिळला असून दिवाळीचा गोडवा वाढणार  आहे. एरव्ही दिवाळीमध्ये हरभ:याच्या डाळीसह बेसनपीठाला मागणी वाढून भावही कडाडतात.  मात्र यंदा उलट चित्र असून सणासुदीत भाव कमी झाले आहे. 

आवक वाढलीप्रत्येक डाळ, कडधान्याचा विचार केला तर सर्वाची आवक वाढली आहे. महाराष्ट्रात उडीद-मुगाचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न व आवक नसले तरी इतर राज्यातून मुगाची चांगली आवक होत आहे. दुसरीकडे मात्र पाहिजे त्या प्रमाणात मागणी नसल्याने डाळींचे भाव कमी होत आहे. उडीदाच्या बाबतीतही असेच चित्र असून मध्यप्रदेशात उडीदाचे चांगले उत्पादन आल्याने तेथून येणा:या मालाला 4000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. 

दिवाळीत ज्या डाळीला सर्वात जास्त मागणी असते त्या हरभरा डाळीतही असेच चित्र आहे. दिवाळीमध्ये लाडू, बर्फी व इतर पदार्थ तयार करण्यासाठी हरभरा डाळ, बेसनपीठ यांना जास्त मागणी असते. त्यामुळे त्यांचे भाव या दिवसात वाढतात. मात्र यंदा आवकच जास्त असल्याने भाव वाढण्यापेक्षा उलटकमी झाले आहे. 

बेसनपीठाचेही भाव घसरलेबेसनपीठाचे भाव यंदा तर शंभरीच्या आत आले आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये 100 ते 120 रुपये प्रति किलो असणारे भाव यंदा 80 ते 90 रुपये प्रति किलोवर आले आहे. 

तेलातही वाढ नाहीदिवाळीमध्ये खाद्य तेलाचेदेखील भाव वाढतात. मात्र यंदा तेलाचे भावदेखील स्थिर आहे. सोयाबीन तेल 72 ते 78 रुपये प्रति किलो तर शेंगदाणा तेल 115 ते 130 रुपये प्रति किलो (दर्जा व कंपनीन्यांनुसार यापेक्षा जास्त दर) आहे. 

डाळींसह बेसनपीठाचे भाव कमी होणे व तेलाचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांची दिवाळी गोड होणार आहे.  सध्या फराळाचे विविध पदार्थ करण्यास जोमाने सुरुवात झाली आहे. 

डाळींचे भाव गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे व्यापा:यांनी सांगितले. सध्या तूर डाळीचे भाव 55 ते 60 रुपये प्रति किलो, हरभरा डाळ - 62 ते 70, मूग डाळ - 60 ते 64, उडीद डाळ 60 ते 64 रुपये प्रति किलो आहे. गेल्या महिन्यात हेच भाव 10 ते 20 रुपयांनी जास्त होते. 

दरवर्षी दिवाळीमध्ये डाळींची मागणी वाढते, मात्र यंदा आवक वाढली असली तरी मागणी पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे भावदेखीलघसरलेआहे. - प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल असोसिएशन. 

महाराष्ट्रात कडधान्याचे उत्पादन कमी असले तरी इतर राज्यातून माल येत असल्याने आवक वाढून डाळींचे भाव कमी झाले आहे. दिवाळीमध्ये असणारी मागणी पाहिजे तेवढी नाही. - प्रविण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणार्मचट असोसिएशन.