शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

एकाच शाळेत दोन मुख्याध्यापकांच्या नियुक्तीचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 6:14 PM

चाळीसगाव, जि.जळगाव : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चाळीसगाव तालुक्यातील दहिवद माध्यमिक विद्यालयात संस्थेने दोन जणांना मुख्याध्यापक पदाची ...

ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील दहिवद शाळेतील प्रकारन्यायालय आदेशाची पायमल्ली प्रकरणी सचिवांना नोटीसध्वजारोहण प्रसंगीही झाला वाद

चाळीसगाव, जि.जळगाव : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चाळीसगाव तालुक्यातील दहिवद माध्यमिक विद्यालयात संस्थेने दोन जणांना मुख्याध्यापक पदाची सूत्रे दिल्यामुळे नियुक्तीचा वाद न्यायालयात गेला आहे. प्रकाश पाटोळे यांचा अर्ज शाळा न्यायाधिकरण नाशिक न्यायालयाने मंजूर करून संस्थेचे म्हणणे फेटाळले आहे. न्यायालय आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे संस्था सचिवांविरुद्ध अवमान नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे.या आधीही याच शाळेत शालेय पोषण आहाराच्या ठेक्यामुळे दहिवदची शाळा चर्चेत आली होती. या वादामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना न पाठवल्याने ही शाळा चार दिवस बंद होती. त्यानंतर आताही मुख्याध्यापक नियुक्तीचा वादही तालुक्यात चर्चेचा झाला आहे.१ सप्टेंबर २०१८ रोजी दहिवद शाळेच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी प्रकाश सुकदेव पाटोळे यांना संस्थेने दिली होती. यानंतर १९ दिवसांनी म्हणजे १९ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांना पदावरुन दूर करून त्यांची पदानवती केली व प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कल्याणराव जयवंतराव वाघ यांची नियुक्ती केली होती.ांस्थेने आपल्यावर अन्याय केला म्हणून प्रकाश पाटोळे यांनी संस्था निर्णयाविरुध्द शाळा न्यायाधिकरण नाशिक यांच्या न्यायालयात दाद मागितली. या न्यायालयाने पाटोळे यांचे म्हणणे ग्राह्य धरुन संस्थेचा निर्णय रद्दबादल ठरवून त्यावर अंतरीम स्थगिती दिली व पुढील तारीख ८ फेब्रुवारी २०१९ रोजी ठेवण्यात आली.दोन मस्टर, दोन कॅबिनमुळे संभ्रमन्यायालयाच्या आदेशानंतर मुख्याध्यापक पदाची धुरा पाटोळे हेच पहात आहेत. परंतु संस्था न्यायालयाचा तो आदेश मानायला तयार नाही. या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कल्याणराव वाघ हेच कामकाज पाहतील, असे धोरण संस्थेने अंगीकारले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सद्य:स्थितीत पाटोळे यांचे कामकाज मुख्याध्यापक दालनातून, तर वाघ टिचर रुममधून कामकाज पाहत आहे. त्यामुळे शिक्षक-कर्मचारी यांचे मस्टरदेखील तीन-चार महिन्यांपासून दोन स्वतंत्र झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दोघेही म्हणतात, मीच मुख्याध्यापक पदाचे कामकाज पाहतो आहे.संस्था सचिव अरुण निकम यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यानंतरही त्यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून वाघ यांच्याकडेच जबाबदारी कायम ठेवली आहे. यात न्यायालयाचा अवमान केला गेला म्हणून अरुण निकम यांना वकिलामार्फत नोटीसही बजावण्यात आली आहे. ८ रोजी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देवू. तसेच आपण मागासवर्गीय असल्याने सुरुवातीपासूनच निकम यांच्याकडून त्रास दिला जात आहे. याबाबत मागासवर्गीय आयोग व पोलिसात तक्रारीदेखील याआधीच दिल्याचे पाटोळे यांनी सांगितले.परिपत्रकानुसार जबाबदारी-निकमसंस्था सचिव अरुण निकम यांनी सांगितले की, प्रकाश पाटोळे यांना मुख्याध्यापक म्हणून संस्थेने नेमणूक केलेली नसून, बेकायदेशीर कामकाज पाहत आहे. विभागीय शिक्षण संचालक यांच्याकडे पाटोळे यांनी सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदासाठी प्रस्ताव पाठविला होता. तो त्यांनी मान्य करून संस्थकडे त्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे संस्थेने त्यांना पत्र दिले. तथापि, सेवा ज्येष्ठतेनुसार पाटोळे यांचा क्रमांक ६७ वा असल्याचे लक्षात येताच तो प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. रिक्त झालेल्या मुख्याध्यापक पदावर शासन निर्णयाशिवाय कुणालाही नेमू नये, तोपर्यंत प्रभारी पद ठेवावे, असे परिपत्रक शासनाचे आहे. त्या परिपत्रकांनुसार वाघ यांच्याकडे प्रभारीची जबाबदारी देण्यात आली आहे.ध्वजारोहण प्रसंगीही वाद२६ जानेवारी २०१९ रोजी ध्वजारोहणप्रसंगी शाळेत नियुक्तीचा वाद पुढे आला होता. ध्वजारोहण कुणाच्या हस्ते होईल याबाबत बराच वेळ वाद झाल्यामुळे गावातील लोकांनी शाळेत गर्दी केली होती. अखेर प्रकाश पाटोळे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर या विषयावर पडदा पडला.संस्थेच्या बैठकीत विरोधकांनी केला हल्लाबोलराष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत विरोधी संचालक डी.वाय.चव्हाण व इतरांनी सत्ताधारी गटाविरुद्ध हल्लाबोल केला. सत्ताधारी गटातील संचालकांमध्ये गटबाजीमुळे नियुक्तीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. परिणामी शिक्षक व कर्मचाºयांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता आहे. या प्रकारामुळे संस्थेची बदनामी होत आहे, असा आरोप डी.वाय.चव्हाण यांनी सभेत केला.शासन परिपत्रकांनुसार माझी नियुक्ती प्रभारी मुख्याध्यापक म्हणून संस्थेने केली आहे. शाळेच्या कामकाजाबरोबरच आर्थिक, प्रशासकीय, कामकाज पाहतो आहे. दोन मुख्याध्यापक पदाची संकल्पना आपल्याला मुळीच मान्य नाही.- कल्याणराव वाघ, प्रभारी मुख्याध्यापक, दहिवदन्यायालयाच्या आदेशानुसार मीच शाळेचा मुख्याध्यापक असून शाळेचे काम माझ्या नियंत्रणाखाली सुरू आहे. केवळ मागासवर्गीय असल्या कारणाने सचिवांकडून त्रास दिला जात आहे. त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.-प्रकाश पाटोळे, मुख्याध्यापक दहिवद