शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

सर्व ताण दूर ठेवून ऐकून घ्याव्या लागतात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

जळगाव - मनपाच्या अग्निशमन विभागाचे काम म्हणजे नेहमी अलर्टचे काम. कार्यालयात आलेला एकही फोन जरी उचलला गेला नाही, ...

जळगाव - मनपाच्या अग्निशमन विभागाचे काम म्हणजे नेहमी अलर्टचे काम. कार्यालयात आलेला एकही फोन जरी उचलला गेला नाही, तर आगीची लहान घटनाही मोठे स्वरूप घेवू शकते. मात्र, अनेकदा अग्निशमनच्या कार्यालयात असे काही फोन येतात, की ज्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचा संतापही अनावर होईल, मात्र थंड डोक्यानेच फोनद्वारे माहिती देणाऱ्यांची अडचण समजून घेवून घटनास्थळी जावून आगीची घटना आटोक्यात आणावी लागते. अनेकदा कार्यालय, प्रशासन व कुटुंबामुळे तणाव असला तरीही अलर्ट राहूनच मोठ-मोठ्या घटनांवर उपाययोजना केली जाते, अशी माहिती मनपा अग्निशमन विभागाच्या रोहिदास चौधरी यांनी दिली.

मनपा अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख शशिकांत बारी हे आहेत. त्यांच्या अखत्यारित चार ते पाच कर्मचारी अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयात कार्यरत आहेत. शहरात आगीची घटना घडल्यास २२२४४४ हा क्रमांक नागरिकांसाठी दिला आहे. त्यामुळे हा फोन वाजला म्हणजे, शहरात आगीची घटना घडली असेच जवळपास समजले जाते. या कार्यालयात तीन सत्रांत अग्निशमन विभागाचे कर्मचारी काम करीत असतात. रात्री-बेरात्री देखील आगीच्या घटना घडत असतात. अनेकदा शहरासोबत तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील घटना घडल्या तरी त्याठिकाणीही जावे लागते, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. अनेकदा ग्रामीण भागातील घटनेबाबत फोन आले तर थोडा उदासीनपणा येतो, मात्र घटनेचे गांभीर्य घेवून त्याठिकाणीही त्याच तत्परतेने जातो. जी तत्परता शहरातील घटनेबाबत दाखविली जात असते, असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कचरा पेटला तरी फोन

दररोज घटना घडत नसली तरी फोन मात्र सातत्याने येतात. यामध्ये अनेकदा गल्ली-बोळातील कचरा पेटत असला तरीही काही नागरिक थेट अग्निशमन विभागाच्या कार्यालयातच फोन करतात, अशा व्यक्तींना समजावण्याचा अनेकद प्रयत्न केला जातो. मात्र, जर अडचण मांडायचीच आहे. तर आम्हीही घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांची तक्रार ऐकून घेतो. अनेकदा राग येतो मात्र तो जिभेपर्यंत पोहोचू दिला जात नाही. यासह दिवाळीच्या काळातदेखील लहान-लहान घटनांसाठीही नागरिक फोन करतात, त्याठिकाणी बंब घेवून जातो मात्र ती आग अनेकदा आम्ही जाण्याअगोदरच विझविली जाते असेही गमतीशीर किस्से घडत असतात.

ताणतणावही दूरच

आरोग्यावर अशा फोनमुळे फारसा परिणाम होत नाही. अनेकदा अफवांचे फोनदेखील येतात, तेव्हाही थोडी दमछाक होते. घरात काही वाद तर होत नाही मात्र जीवन जगताना छोटे-छोटे ताणतणाव तर येतच असतात. मात्र, हा तणाव कार्यालयाबाहेरच सोडून आम्ही दररोज कामावर जातो, अशीही माहिती याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ ला दिली.