शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

सर्व ताण दूर ठेवून ऐकून घ्याव्या लागतात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

जळगाव - मनपाच्या अग्निशमन विभागाचे काम म्हणजे नेहमी अलर्टचे काम. कार्यालयात आलेला एकही फोन जरी उचलला गेला नाही, ...

जळगाव - मनपाच्या अग्निशमन विभागाचे काम म्हणजे नेहमी अलर्टचे काम. कार्यालयात आलेला एकही फोन जरी उचलला गेला नाही, तर आगीची लहान घटनाही मोठे स्वरूप घेवू शकते. मात्र, अनेकदा अग्निशमनच्या कार्यालयात असे काही फोन येतात, की ज्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचा संतापही अनावर होईल, मात्र थंड डोक्यानेच फोनद्वारे माहिती देणाऱ्यांची अडचण समजून घेवून घटनास्थळी जावून आगीची घटना आटोक्यात आणावी लागते. अनेकदा कार्यालय, प्रशासन व कुटुंबामुळे तणाव असला तरीही अलर्ट राहूनच मोठ-मोठ्या घटनांवर उपाययोजना केली जाते, अशी माहिती मनपा अग्निशमन विभागाच्या रोहिदास चौधरी यांनी दिली.

मनपा अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख शशिकांत बारी हे आहेत. त्यांच्या अखत्यारित चार ते पाच कर्मचारी अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयात कार्यरत आहेत. शहरात आगीची घटना घडल्यास २२२४४४ हा क्रमांक नागरिकांसाठी दिला आहे. त्यामुळे हा फोन वाजला म्हणजे, शहरात आगीची घटना घडली असेच जवळपास समजले जाते. या कार्यालयात तीन सत्रांत अग्निशमन विभागाचे कर्मचारी काम करीत असतात. रात्री-बेरात्री देखील आगीच्या घटना घडत असतात. अनेकदा शहरासोबत तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील घटना घडल्या तरी त्याठिकाणीही जावे लागते, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. अनेकदा ग्रामीण भागातील घटनेबाबत फोन आले तर थोडा उदासीनपणा येतो, मात्र घटनेचे गांभीर्य घेवून त्याठिकाणीही त्याच तत्परतेने जातो. जी तत्परता शहरातील घटनेबाबत दाखविली जात असते, असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कचरा पेटला तरी फोन

दररोज घटना घडत नसली तरी फोन मात्र सातत्याने येतात. यामध्ये अनेकदा गल्ली-बोळातील कचरा पेटत असला तरीही काही नागरिक थेट अग्निशमन विभागाच्या कार्यालयातच फोन करतात, अशा व्यक्तींना समजावण्याचा अनेकद प्रयत्न केला जातो. मात्र, जर अडचण मांडायचीच आहे. तर आम्हीही घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांची तक्रार ऐकून घेतो. अनेकदा राग येतो मात्र तो जिभेपर्यंत पोहोचू दिला जात नाही. यासह दिवाळीच्या काळातदेखील लहान-लहान घटनांसाठीही नागरिक फोन करतात, त्याठिकाणी बंब घेवून जातो मात्र ती आग अनेकदा आम्ही जाण्याअगोदरच विझविली जाते असेही गमतीशीर किस्से घडत असतात.

ताणतणावही दूरच

आरोग्यावर अशा फोनमुळे फारसा परिणाम होत नाही. अनेकदा अफवांचे फोनदेखील येतात, तेव्हाही थोडी दमछाक होते. घरात काही वाद तर होत नाही मात्र जीवन जगताना छोटे-छोटे ताणतणाव तर येतच असतात. मात्र, हा तणाव कार्यालयाबाहेरच सोडून आम्ही दररोज कामावर जातो, अशीही माहिती याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ ला दिली.