शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व ताण दूर ठेवून ऐकून घ्याव्या लागतात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

जळगाव - मनपाच्या अग्निशमन विभागाचे काम म्हणजे नेहमी अलर्टचे काम. कार्यालयात आलेला एकही फोन जरी उचलला गेला नाही, ...

जळगाव - मनपाच्या अग्निशमन विभागाचे काम म्हणजे नेहमी अलर्टचे काम. कार्यालयात आलेला एकही फोन जरी उचलला गेला नाही, तर आगीची लहान घटनाही मोठे स्वरूप घेवू शकते. मात्र, अनेकदा अग्निशमनच्या कार्यालयात असे काही फोन येतात, की ज्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचा संतापही अनावर होईल, मात्र थंड डोक्यानेच फोनद्वारे माहिती देणाऱ्यांची अडचण समजून घेवून घटनास्थळी जावून आगीची घटना आटोक्यात आणावी लागते. अनेकदा कार्यालय, प्रशासन व कुटुंबामुळे तणाव असला तरीही अलर्ट राहूनच मोठ-मोठ्या घटनांवर उपाययोजना केली जाते, अशी माहिती मनपा अग्निशमन विभागाच्या रोहिदास चौधरी यांनी दिली.

मनपा अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख शशिकांत बारी हे आहेत. त्यांच्या अखत्यारित चार ते पाच कर्मचारी अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयात कार्यरत आहेत. शहरात आगीची घटना घडल्यास २२२४४४ हा क्रमांक नागरिकांसाठी दिला आहे. त्यामुळे हा फोन वाजला म्हणजे, शहरात आगीची घटना घडली असेच जवळपास समजले जाते. या कार्यालयात तीन सत्रांत अग्निशमन विभागाचे कर्मचारी काम करीत असतात. रात्री-बेरात्री देखील आगीच्या घटना घडत असतात. अनेकदा शहरासोबत तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील घटना घडल्या तरी त्याठिकाणीही जावे लागते, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. अनेकदा ग्रामीण भागातील घटनेबाबत फोन आले तर थोडा उदासीनपणा येतो, मात्र घटनेचे गांभीर्य घेवून त्याठिकाणीही त्याच तत्परतेने जातो. जी तत्परता शहरातील घटनेबाबत दाखविली जात असते, असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कचरा पेटला तरी फोन

दररोज घटना घडत नसली तरी फोन मात्र सातत्याने येतात. यामध्ये अनेकदा गल्ली-बोळातील कचरा पेटत असला तरीही काही नागरिक थेट अग्निशमन विभागाच्या कार्यालयातच फोन करतात, अशा व्यक्तींना समजावण्याचा अनेकद प्रयत्न केला जातो. मात्र, जर अडचण मांडायचीच आहे. तर आम्हीही घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांची तक्रार ऐकून घेतो. अनेकदा राग येतो मात्र तो जिभेपर्यंत पोहोचू दिला जात नाही. यासह दिवाळीच्या काळातदेखील लहान-लहान घटनांसाठीही नागरिक फोन करतात, त्याठिकाणी बंब घेवून जातो मात्र ती आग अनेकदा आम्ही जाण्याअगोदरच विझविली जाते असेही गमतीशीर किस्से घडत असतात.

ताणतणावही दूरच

आरोग्यावर अशा फोनमुळे फारसा परिणाम होत नाही. अनेकदा अफवांचे फोनदेखील येतात, तेव्हाही थोडी दमछाक होते. घरात काही वाद तर होत नाही मात्र जीवन जगताना छोटे-छोटे ताणतणाव तर येतच असतात. मात्र, हा तणाव कार्यालयाबाहेरच सोडून आम्ही दररोज कामावर जातो, अशीही माहिती याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ ला दिली.