शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रावेर तालुक्यातील उटखेडासह परिसरात शेतकऱ्यांचे पाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 4:15 PM

उटखेडा, ता. रावेर , जि.जळगाव : गेल्या तीन वर्षांपासूून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकºयांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळात ...

ठळक मुद्देकेळी बागा वाचवण्यासाठी शेतकºयांची धडपडउत्पादन खर्चही निघणे झाले अवघडअनेक व्यावसायिक जमिनीत उभी बोअर खोदणारी महागडी जंत्रे घेऊन दाखल

उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : गेल्या तीन वर्षांपासूून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकºयांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळात सापडलेला शेतकरी आता पाण्यासाठी भूगर्भाची खोली पाहताना दिसत आहे.पाण्यावर अवलंबून असलेल्या शेती व्यवसायासाठी शेतकरी सातत्याने पाण्याच्या शोधात राहिला आहे .परंतु गेली तीन -चार वर्षे पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतच पाणी राहिले नाही. तरीही शेतकरी पाण्याच्या शोधात वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. मात्र त्याचा सगळेच गैरफायदा घेत असल्याने बुडत्या शेतकºयांचा पाय अधिकच अडचणीत जाताना दिसत आहे.शेतकरी पाण्याच्या शोधात असल्याचे पाहून उत्तर प्रदेशातील अनेक व्यावसायिक जमिनीत उभी बोअर खोदणारी महागडी जंत्रे घेऊन डिसेंबरमध्येच दाखल झाले आहेत. या यंत्राच्या एक फुट खोदाईस १२५ ते १५० रुपये मोजावे लागतात. या भागातील पाण्याची पातळी २०० फुटापेक्षा जादा खोल असली व ही खोदाई एवढी महागडी असली तरीही शेतकरी लाखो रुपये खर्चून नशिबाची परीक्षा घेताना दिसत आहेत. या बोअरमध्ये शेतकºयास पाणी मिळो न मिळो, त्यांची संपूर्ण रक्कम मोजावीच लागते. विशेष म्हणजे या व्यवहारात कसलीही सूट मिळत नाही. विहिरीच्या भिंतीत आडवे बोअर घेण्याचाही प्रयोग शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे.नवीन विहीर खोदणे तर सर्वसामान्य शेतकºयांच्या आवाक्याबाहेर होऊन बसले आहे. या कामासाठी मजुरांना ३५० ते ४०० रुपये मंजुरी द्यावी लागत आहे, तर विहिरीतील खोदलेले दगड बाहेर काढणाºया बैलजोडीला दररोज किमान ८०० रुपये मोजावे लागत आहेत. शेतकºयांच्या या परिस्थितीत जमिनीतील पाण्याचा वर अंदाज देणारे (पानाडी) नारळाचा आधार घेतात, तर कोणी रक्तगटाच्या आधारे जमिनीतील पाण्याचा अंदाज वर्तवीत आहेत. शेतकरी जमिनीत पाणी नसताना देवाला नवस (साकडे) घालूून भूगर्भातील पाण्याची खोली शोधत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर