शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात २० टक्क्यांनी वाढले धुलीकरणाचे प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:59 IST

जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही वाढ झाली नाही. मात्र, हवेतील धुलीकरणाच्या प्रदूषणात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे

ठळक मुद्देयंदा कमी फटाके फोडल्यामुळे हवेचे प्रदूषणही झाले कमीउपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले होते नमुणेतीन ठिकाणी मोजण्यात आली ध्वनीची पातळी

सचिन देवजळगाव : जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही वाढ झाली नाही. मात्र, हवेतील धुलीकरणाच्या प्रदूषणात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दरवर्षी दिवाळीच्या काळात हवेची गुणवत्ता तपासण्यात येत असते. यंदादेखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १ ते १४ नोव्हेंबर दरम्यान हाय व्हाल्यूम ईअर मशिनद्वारे दर आठ तासाला वातावरणातील प्रदुषणाचे नमुने जळगावातील गिरणा पाण्याची टाकी व जुन्या बी. जे. मार्केटच्या इमारतीवर घेण्यात आले. हे नमुने दररोज दुसºया दिवशी प्रदूषण मंडळाच्या नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते.महिनाभरानंतर नाशिक प्रयोगशाळेतर्फे प्रदूषणाचा अहवाल जळगाव कार्यालयाला प्राप्त झाला आहे. तसेच नाशिक येथील अश्वमेध या खाजगी संस्थेतर्फेही शहरातील तीन ठिकाणी ध्वनीची पातळी मोजण्यात आली होती. मात्र, अश्वमेध संस्थेचा अहवाल अद्याप आलेला नाही.खराब रस्त्यांमुळे वाढले धुलीकरणाचे प्रमाणधुलीकरणामुळे प्रदूषण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब रस्ते असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले. खराब रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवेत धुळ पसरत असते व त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्याखालोखाल शहरात सुरु असलेल्या बांधकामांमुळेही धुळीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.दिवाळीच्या काळात १५ दिवस हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता मोजण्यात आली. यामध्ये शहरात कमी प्रमाणात फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात कुठलीही वाढ झालेली दिसून आली नाही. मात्र, वातावरण धुलीकरणाचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. तर ध्वनी प्रदूषणाची नोंद नाशिक येथील अश्वमेध संस्थेने घेतली असून,त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.-सोमनाथ कुरमुडे, उपप्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :pollutionप्रदूषणJalgaonजळगाव