शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

खास जिलेबी खाण्यासाठी कुटुंबासह येतात या यात्रेत भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 4:09 PM

जळगाव जिल्ह्यातील सायगावच्या यात्रेत रंगणार लोकनाट्याची जुगलबंदी

ठळक मुद्देसायगाव यात्रेतील जिलेबीची चवच न्यारीनाशिक व जळगाव जिल्ह्यातील भाविकांची गर्दीमनोरंजनासाठी भाविकांसाठी लोकनाट्याची जुगलबंदी

गोकुळ मंडळ/ आॅनलाईन लोकमतसायगाव, ता.चाळीसगाव, दि.६ : यात्रा म्हटली म्हणजे धम्मालमस्ती. प्रत्येक यात्रेचे एक वैशिष्ट्य असते. चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे दत्तजयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या यात्रेत मिळणारी जिलेबी ही विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध असल्याने भाविक याठिकाणी जिलेबी खाण्यासाठी कुटुंबासह येत असतात. पंधरा दिवस चालणाºया यात्रेत प्रत्येक दिवशी लोकनाट्याची जुगलबंदी रंगणार आहे.सायगाव येथे दत्तजयंतीनिमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे. नाशिक व जळगाव जिल्ह्याच्या सिमेवर असणाºया सायगावात यात्रेसाठी दोन्ही जिल्ह्यातून भाविक येत असतात. चाळीसगाव तालुक्यात महानुभव पंथीय भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे श्री दत्ताच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

सायगाव यात्रेतील जिलेबीची चवच न्यारीसायगावच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मिळणारी विशिष्ट चव असलेली जिलेबी. जिलेबीची विक्री करणारे अनेक कारागिर या निमित्त यात्रेत दाखल होत असतात. गुळाच्या जिलेबीला साखरेच्या जिलेबीपेक्षा जास्त मागणी आहे. सध्या १०० रुपये किलो दराने यात्रेत जिलेबीची विक्री होत आहे. कुटुंबासह यात्रेत आलेली भाविक जिलेबीचा आस्वाद घेत आहेत.यात्रोत्सवात लोकनाट्याची जुगलबंदीफोर-जी, एच.डी. च्या जमान्यात आजही ग्रामीण भागात पारंपारिक लोककला तसेच लोकनाट्याला प्रतिसाद असतो. नागरिकांच्या दरवर्षाच्या प्रतिसादामुळे याठिकाणी एक दोन नव्हे तर चक्क पाच लोकनाट्यांचे आयोजन केले आहे. सायगावच्या यात्रेत जिलेबीसोबत भाविकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्याची जुगलबंदी रंगणार आहे. बुधवार ६ डिसेंबर रोजी मंगला बनसोडे, ८ डिसेंबर रोजी मालती इनामदार, १० डिसेंबर रोजी हरिभाऊ बढे, १२ डिसेंबर रोजी रघुवीर खेडकर तर १५ डिसेंबर रोजी दिलीप काटे यांच्या लोकनाट्याचे आयोजन केले आहे. परिसरातील तरुण व भाविकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असते.यात्रेवर पावसाचे सावटओखी वादळामुळे सध्या पावसाचे सावट आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. पावसाच्या शक्यतेने भाविकांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र शनिवार व रविवारी भाविकांची सर्वाधिक वर्दळ राहणार आहे. या दिवशी सुटी असल्याने नोकरदार तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणात यात्रेत कुटुंबासह सहभागी होत असतात.

टॅग्स :JalgaonजळगावNashikनाशिक