शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

देवकाआई ठरली खरीखुरी प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:11 PM

धुळ्याच्या धुळीत माखलेल्या शाळा क्रमांक नऊमध्ये १९६५ च्या काळात एक शिक्षक ज्यांच्या नावातच धार्मिक सलोखा होता, ते शब्बीर मियाँ देशपांडे आम्हाला गाणे शिकवित. ‘हमे गांधी क्षमा करना, हमे गौतम क्षमा करना... आज हमने अहिंसा को, धीर तलवार दे दी है ।या देशपांडे सरांनी, माझ्या जोरदार, दमदार माझ्यापुरताच मर्यादित असलला आवाज ...

धुळ्याच्या धुळीत माखलेल्या शाळा क्रमांक नऊमध्ये १९६५ च्या काळात एक शिक्षक ज्यांच्या नावातच धार्मिक सलोखा होता, ते शब्बीर मियाँ देशपांडे आम्हाला गाणे शिकवित. ‘हमे गांधी क्षमा करना, हमे गौतम क्षमा करना... आज हमने अहिंसा को, धीर तलवार दे दी है ।या देशपांडे सरांनी, माझ्या जोरदार, दमदार माझ्यापुरताच मर्यादित असलला आवाज ऐकून म्हटले. ‘जगदीश तू देशभक्तीपर गाणे लिही.’ मी पाचव्या गल्लीच्या धाब्याच्या मातीच्या घरावर गेलो आणि गाणे लिहिले.‘देशासाठी करू बलिदान, या भारताचे आम्ही नौजवान’. मी तेव्हा माझ्या शाळेपुरता कवी झालो... धुळ्याचे जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर होते. ‘त्या वेळी जि.प. सभागृहात’ ‘काळ चालला पुढे’ हे विधान दिले आणि कविता करायला सांगितली. मी गुरुवर्य नागेश मोगलाईकरांच्या ओट्यावर बसलो आणि ‘कोण म्हणतं, काळ चालला पुढे?’ ही कविता लिहिली. तेव्हापासून ‘मी गावाचा कवी झालो’. भुसावळला वीज मंडळात नोकरीला लागलो. अमळनेरचे वा.रा.तात्या सोनार यांच्या घरात बसून दिवाळीच्या दिवशी एक कविता लिहिली.भैया उपासनी यांनी जळगाव आकाशवाणीच्या उगवतीचे रंग या कार्यक्रमाची सुरुवात केली. तेव्हा मी खान्देशचा कवी म्हणून परिचित झालो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिक येथे प्रथमच अहिराणीत कथाकथन सादर करण्याचा मान मला देशपातळीवर मिळाला. हे मी फक्त कॉमर्सचा विद्यार्थी असून, माझी पातळी ओळखून केलेला माझा लेखन प्रवास आहे आणि लहानपणी मी रडताना माझी आई देवकाबाई अहिराणीत अंगाईगीत म्हणायची, ‘येवं येवं गाई, भाऊ मना निजी जाई’ म्हणणारी माझी देवकाआई माझ्या लेखनाची खरीखुरी प्रेरणा आहे.- जगदीश देवपूरकर

टॅग्स :Jalgaonजळगाव