शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

जिल्हाभरात आता डेंग्यू थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनानंतर आता पावसाने वेग धरला असून, त्यामुळे अन्य साथींच्या आजारांनी डोके वर काढले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनानंतर आता पावसाने वेग धरला असून, त्यामुळे अन्य साथींच्या आजारांनी डोके वर काढले. त्या डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, शासकीय आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या दहाच दिवसांमध्ये ४४ संशयितांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयातील संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. शासकीय आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये ६१ संशियतांपैकी १० रुग्णांचे नमुने बाधित आढळून आले होते, तर सप्टेंबरमध्ये ४१ नमुने पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, या भागांमध्येही आता साथीच्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने आधीच उपाययोजना हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरात दुर्लक्ष

डेंग्यू उपाययोजनांकडे शहरात दुर्लक्ष होत असल्याने भाजपाने याबाबत नुकतेच महापालिकेत धूळफवारणी करून आंदोलन केले. विविध भागांमध्ये डेंग्यूला कारणीभूत डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिवाय अनेक भागांत या अळ्या आढळून आल्या आहेत. अशा स्थितीत विविध भागांत नियमित फवारणीची मागणी होत आहे.

गुळवेल अधिक प्रभावी

- आयुर्वेदच्या डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेटस्चे प्रमाण कमी होत असते. यात ताप येणे, डोकेदुखी, अंगावर पुरळ, अशी मुख्य लक्षणे असतात. अशा स्थितीत आयुर्वेदात ज्वर कमी करण्यासाठी गुळवेल हे अत्यंत प्रभावी औषध असल्याचे व ते सहजासहजी उपलब्ध होत असल्याचे सहायक प्राध्यापक डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. गुळवेलचा रस किंवा त्याचे चूर्ण सहज बाजारात उपलब्ध असते.

- लहान मुलांना डेंग्यू प्रतिबंध म्हणून चॉकलेटपेक्षा आवळा, आवळ्याचा मुरब्बा खायला द्यावा, यात व्हिटॅमिन सी व शरीराला मजबूत करणारे अनेक घटक असतात. डेंग्यू झाल्यानंतर गुळवेलचा वापर खूप फायदेशीर ठरतो. शिवाय याचे कसलेली साइड इफेक्ट नसतात. डेंग्यूमध्ये आहाराची विशेष काळजी घ्यावी. रुग्णाची पचनक्षमता कमी झाल्याने त्याला भूक लागल्यावरच थोडे-थोडे खायला द्यावे, यात सुरुवातीला डाळ किंवा भाताचे पाणी द्यावे व नंतर भूक व पचनक्षमता वाढल्यानंतर नियमित जेवण द्यावे, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.