शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

जिल्हाभरात आता डेंग्यू थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनानंतर आता पावसाने वेग धरला असून, त्यामुळे अन्य साथींच्या आजारांनी डोके वर काढले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनानंतर आता पावसाने वेग धरला असून, त्यामुळे अन्य साथींच्या आजारांनी डोके वर काढले. त्या डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, शासकीय आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या दहाच दिवसांमध्ये ४४ संशयितांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयातील संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. शासकीय आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये ६१ संशियतांपैकी १० रुग्णांचे नमुने बाधित आढळून आले होते, तर सप्टेंबरमध्ये ४१ नमुने पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, या भागांमध्येही आता साथीच्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने आधीच उपाययोजना हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरात दुर्लक्ष

डेंग्यू उपाययोजनांकडे शहरात दुर्लक्ष होत असल्याने भाजपाने याबाबत नुकतेच महापालिकेत धूळफवारणी करून आंदोलन केले. विविध भागांमध्ये डेंग्यूला कारणीभूत डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिवाय अनेक भागांत या अळ्या आढळून आल्या आहेत. अशा स्थितीत विविध भागांत नियमित फवारणीची मागणी होत आहे.

गुळवेल अधिक प्रभावी

- आयुर्वेदच्या डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेटस्चे प्रमाण कमी होत असते. यात ताप येणे, डोकेदुखी, अंगावर पुरळ, अशी मुख्य लक्षणे असतात. अशा स्थितीत आयुर्वेदात ज्वर कमी करण्यासाठी गुळवेल हे अत्यंत प्रभावी औषध असल्याचे व ते सहजासहजी उपलब्ध होत असल्याचे सहायक प्राध्यापक डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. गुळवेलचा रस किंवा त्याचे चूर्ण सहज बाजारात उपलब्ध असते.

- लहान मुलांना डेंग्यू प्रतिबंध म्हणून चॉकलेटपेक्षा आवळा, आवळ्याचा मुरब्बा खायला द्यावा, यात व्हिटॅमिन सी व शरीराला मजबूत करणारे अनेक घटक असतात. डेंग्यू झाल्यानंतर गुळवेलचा वापर खूप फायदेशीर ठरतो. शिवाय याचे कसलेली साइड इफेक्ट नसतात. डेंग्यूमध्ये आहाराची विशेष काळजी घ्यावी. रुग्णाची पचनक्षमता कमी झाल्याने त्याला भूक लागल्यावरच थोडे-थोडे खायला द्यावे, यात सुरुवातीला डाळ किंवा भाताचे पाणी द्यावे व नंतर भूक व पचनक्षमता वाढल्यानंतर नियमित जेवण द्यावे, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.