शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST

सुरुवातीला जेमतेम पाऊस झाला. कापूस लागवड झाली, पेरणी झाली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु पावसाने हुलकावणी देणे काही थांबवले ...

सुरुवातीला जेमतेम पाऊस झाला. कापूस लागवड झाली, पेरणी झाली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु पावसाने हुलकावणी देणे काही थांबवले नाही. जवळपास १५ ऑगस्टपर्यंत खंड पडला. परिणामी पिकांची वाढ खुंटली. जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनामध्ये घट होईल, असे चित्र दिसत होते. जेमतेम या कोरड्या दुष्काळाच्या खाईतून शेतकरी बाहेर निघाले. परंतु १५ ऑगस्टपासून ते आजपर्यंत दररोज पावसामुळे उत्पादन खर्चही निघणार नाही, अशी अवस्था झाली आहे.

शेतकऱ्यांची अशी अवस्था पाहून पारोळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिले.

सततच्या पावसामुळे कापूस पिकाची वाईट अवस्था झाली आहे. परिणामी कापूस लाल पडला. लाल्या व दह्या रोगाचा प्रादुर्भाव शेतावर दिसू लागल्याने शेतांमध्ये पाणी तुंबल्याने झाडे कोमेजून कैऱ्या सडत आहेत. कापसाच्या बोंडा मधून उग्र स्वरूपाची दुर्गंधी येत आहे. ज्या आशेवर शेतकऱ्याने भविष्याचे स्वप्न पाहिले तेच स्वप्न डोळ्यांसमोर चकाचूर होताना दिसत आहे. आता जगावे की मरावे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष भिकनराव पाटील, नरेश चौधरी, छावाचे तालुका शेतकरी आघाडीचे अविनाश मराठे, प्रकाश पाटील, संजय पाटील, अजित पाटील, अधिकार पाटील, प्रकाश पाटील, चेतन पाटील, सचिन पाटील, निलेश चौधरी, रघुनाथ पाटील, राजेंद्र पाटील, स्वाभिमानीचे वाल्मीक पाटील उपस्थित होते.