शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

मुसळधार पावसाने कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:18 IST

किनगाव : यावल तालुक्यातील चिंचोलीसह पश्चिम भागातील आडगाव, कासारखेडा, किनगाव, डांभुर्णी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ...

किनगाव : यावल तालुक्यातील चिंचोलीसह पश्चिम भागातील आडगाव, कासारखेडा, किनगाव, डांभुर्णी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल प्रशासन विभागाने पंचनामे करून शासनाने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पिकांची नुकसानभरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी बांधवांनी केली आहे.

आधीच कर्ज काढून लहान- मोठ्या शेतकरी बांधवांनी खरिपाची पेरणी केली. महागाची खते व बियाणे जमिनीत टाकले. यंदा तरी वरुणराजा पावेल व कर्जाच्या खाईतून सुखरूप बाहेर येईल, अशी आशा शेतकरी धरून बसला होता; परंतु ऐन हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची दैना थांबायचे नावच घेत नसल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.

चिंचोली परिसरात कापसाचे पन्नास टक्के, तर कांदा पिकाचे साठ ते सत्तर टक्के नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे लागवड केलेला कांदा पूर्णत: खराब झाला. कापसाचे पीक लाल पडून खराब झाले असून, शेतात फक्त कापसाच्या काड्याच दिसत आहेत. सोयाबीनची पानेही गळून फक्त सडलेल्या शेंगा तग धरून आहेत. अजून दोन-चार दिवस पाऊस सुरू राहिल्यास सोयाबीनही हातचे वाया जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उडीद, मूग तर तोडण्यासाठी मजूरच न मिळाल्याने शेतकऱ्यांना उडीद शेतातच सोडून द्यावा लागला. एवढे मोठे नुकसान होऊनही शासनाने अद्याप महसूल विभागाला पंचनामे करण्याचा आदेश दिला नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात शासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने शेतकरीबांधवांच्या हिताचा निर्णय घेत निदान ज्या शेतकरी बांधवांचे कापूस, कांदा, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी किनगाव व चिंचोली परिसरातील शेतकरीबांधवांनी केली आहे.