शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
3
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
4
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
5
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
6
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
7
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
8
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
9
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
10
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
11
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
12
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:18 IST

किनगाव : यावल तालुक्यातील चिंचोलीसह पश्चिम भागातील आडगाव, कासारखेडा, किनगाव, डांभुर्णी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ...

किनगाव : यावल तालुक्यातील चिंचोलीसह पश्चिम भागातील आडगाव, कासारखेडा, किनगाव, डांभुर्णी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल प्रशासन विभागाने पंचनामे करून शासनाने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पिकांची नुकसानभरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी बांधवांनी केली आहे.

आधीच कर्ज काढून लहान- मोठ्या शेतकरी बांधवांनी खरिपाची पेरणी केली. महागाची खते व बियाणे जमिनीत टाकले. यंदा तरी वरुणराजा पावेल व कर्जाच्या खाईतून सुखरूप बाहेर येईल, अशी आशा शेतकरी धरून बसला होता; परंतु ऐन हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची दैना थांबायचे नावच घेत नसल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.

चिंचोली परिसरात कापसाचे पन्नास टक्के, तर कांदा पिकाचे साठ ते सत्तर टक्के नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे लागवड केलेला कांदा पूर्णत: खराब झाला. कापसाचे पीक लाल पडून खराब झाले असून, शेतात फक्त कापसाच्या काड्याच दिसत आहेत. सोयाबीनची पानेही गळून फक्त सडलेल्या शेंगा तग धरून आहेत. अजून दोन-चार दिवस पाऊस सुरू राहिल्यास सोयाबीनही हातचे वाया जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उडीद, मूग तर तोडण्यासाठी मजूरच न मिळाल्याने शेतकऱ्यांना उडीद शेतातच सोडून द्यावा लागला. एवढे मोठे नुकसान होऊनही शासनाने अद्याप महसूल विभागाला पंचनामे करण्याचा आदेश दिला नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात शासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने शेतकरीबांधवांच्या हिताचा निर्णय घेत निदान ज्या शेतकरी बांधवांचे कापूस, कांदा, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी किनगाव व चिंचोली परिसरातील शेतकरीबांधवांनी केली आहे.