शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बापरे...आता पुतण्याने केला काकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST

जुन्या जळगावात राजू पंडित सोनवणे हे वरच्या मजल्यावर एकटे वास्तव्य करत होते, तर खाली आई द्रौपतीबाई या वास्तव्याला आहेत. ...

जुन्या जळगावात राजू पंडित सोनवणे हे वरच्या मजल्यावर एकटे वास्तव्य करत होते, तर खाली आई द्रौपतीबाई या वास्तव्याला आहेत. सोमवारी सकाळी १०.१५ वाजता नळांना पाणी आले होते. पाणी भरण्यासाठी राजू खाली नळावर का आले नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या आशा सोनवणे या त्यांना आवाज देण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या असता राजू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी हा प्रकार त्यांची आई व इतर नातेवाईकांना सांगितला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शनी पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळिराम हिरे, उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक फौजदार रवींद्र पाटील, अमोल पाटील, गिरीश पाटील आदींचा ताफा दाखल झाला. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून काही नमुने संकलित केले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

राजू यांचा घटस्फोट; मात्र पत्नीकडून सेवा

राजू यांचा प्रेमविवाह झालेला होता. जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकाचे काम करायचे. दोन महिन्यांपासून त्यांनी हे काम सोडले होते. त्यांना एक मुलगा व तीन विवाहित मुले आहेत. पत्नी रजियाबी यांनी पतीपासून घटस्फोट घेतला आहे, त्यामुळे त्या पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या नवीन लक्ष्मी नगरात मुलासह वास्तव्याला आहेत. घटस्फोट झालेला असला तरी त्यांचे पतीकडे येणे-जाणे सुरू होते, इतकेच काय सुख:दुख व आजारपणात त्याच त्यांची सेवा करत होत्या. त्या सतत पतीच्या संपर्कात होत्या. पतीचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी एकच हंबरडा फोडला. मुलगा अश्वघोष व मुलींचाही प्रचंड आक्रोश सुरू होता. राजू यांच्या पश्चात पत्नी रजिया, मुलगा अश्वघोष, तीन विवाहित मुली, आई द्रौपती, भाऊ अनिल, सुहास, कैलास व सुनील असा परिवार आहे.

पुतण्यावर संशय; शोधार्थ पथक रवाना

राजू यांचा मोठा भाऊ अनिल यांचा मुलगा विशाल याच्यावर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून पोलिसांना त्याचेच नाव सांगितले आहे. विशाल हादेखील व्यसनाधीन आहे, त्याचे सतत राजू याच्याशी वादविवाद होत होते. तोच त्यांच्या घरी सतत येत होता, त्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्यावरच संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, विशाल याच्यावर संशय व्यक्त केल्यानंतर पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बळिराम हिरे यांनी दिली. त्याच्याविषयी ठोस पुरावा किंवा माहिती मिळालेली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

दोन घटनांनी शहर हादरले

सतत आईच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, मूळ रा.घनश्यामपूर, ता.खकनार, जि.बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा मुलाने छातीत चॉपर खुपसून खून केल्याची घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजता निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ घडली होती. त्यात गोपाल व दीपक या दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर सोमवारी पुन्हा आंबेडकरनगरात खुनाचा घटना घडली. त्यात देखील पुतण्यावरच संशय व्यक्त केला जात आहे. सलगच्या दोन घटनांनी शहर हादरले आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात मुलगा अश्वघोष राजू सोनवणे याच्या फिर्यादीवरून विशाल अनिल सोनवणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.