शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

चाळीसगावला अवकाळी पावासाने अठराशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:10 IST

शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने तालुक्यातील २८ गावांना याचा तडाखा बसला आहे.

ठळक मुद्देसोमवारी पुन्हा दिला तडाखाः विजांचा कडकडाट, शहरात बत्तीगूल

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने तालुक्यातील २८ गावांना याचा तडाखा बसला असून १८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. याची झळ एक हजार सहाशे शेतकऱ्यांना पोहचली आहे. सोमवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह सलामी दिल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. शहरातील अनेक भागात विजेची बत्तीगूल झाली होती.

शनिवारी अवकाळी माऱ्यासह गारपीटीने नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले होते. त्यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन शेतक-यांना धीरही दिला होता. रविवारी व सोमवारीही महसुल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या २८ गावांमधील शेती पिकांची पाहणी करुन पंचनामे केले. पंचनामे करण्याचे काम सुरुच राहिल. अशी माहिती कृषी अधिकारी साठे यांनी दिली.

अवकाळी धूमशान सुरुच, शेतकरी धास्तावले

शनिवारी अवकाळी पावसाने परिसराला झोडपल्याने मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांसह फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. गारपीट झाल्याने फळबागांचा फुलोरा गळून पडला. वादळीवा-याने पिके आडवी पडली असून केळी बांगांबरोबरच कांदा पिकालाही झळ पोहचली आहे. सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता परिसरातील मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसाचे हे धूमशान शेतक-यांची चिंता वाढविणारे ठरले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावRainपाऊसFarmerशेतकरी