शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

चाळीसगावला अवकाळी पावासाने अठराशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:10 IST

शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने तालुक्यातील २८ गावांना याचा तडाखा बसला आहे.

ठळक मुद्देसोमवारी पुन्हा दिला तडाखाः विजांचा कडकडाट, शहरात बत्तीगूल

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने तालुक्यातील २८ गावांना याचा तडाखा बसला असून १८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. याची झळ एक हजार सहाशे शेतकऱ्यांना पोहचली आहे. सोमवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह सलामी दिल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. शहरातील अनेक भागात विजेची बत्तीगूल झाली होती.

शनिवारी अवकाळी माऱ्यासह गारपीटीने नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले होते. त्यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन शेतक-यांना धीरही दिला होता. रविवारी व सोमवारीही महसुल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या २८ गावांमधील शेती पिकांची पाहणी करुन पंचनामे केले. पंचनामे करण्याचे काम सुरुच राहिल. अशी माहिती कृषी अधिकारी साठे यांनी दिली.

अवकाळी धूमशान सुरुच, शेतकरी धास्तावले

शनिवारी अवकाळी पावसाने परिसराला झोडपल्याने मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांसह फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. गारपीट झाल्याने फळबागांचा फुलोरा गळून पडला. वादळीवा-याने पिके आडवी पडली असून केळी बांगांबरोबरच कांदा पिकालाही झळ पोहचली आहे. सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता परिसरातील मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसाचे हे धूमशान शेतक-यांची चिंता वाढविणारे ठरले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावRainपाऊसFarmerशेतकरी