शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला अवकाळी पावासाने अठराशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:10 IST

शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने तालुक्यातील २८ गावांना याचा तडाखा बसला आहे.

ठळक मुद्देसोमवारी पुन्हा दिला तडाखाः विजांचा कडकडाट, शहरात बत्तीगूल

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने तालुक्यातील २८ गावांना याचा तडाखा बसला असून १८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. याची झळ एक हजार सहाशे शेतकऱ्यांना पोहचली आहे. सोमवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह सलामी दिल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. शहरातील अनेक भागात विजेची बत्तीगूल झाली होती.

शनिवारी अवकाळी माऱ्यासह गारपीटीने नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले होते. त्यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन शेतक-यांना धीरही दिला होता. रविवारी व सोमवारीही महसुल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या २८ गावांमधील शेती पिकांची पाहणी करुन पंचनामे केले. पंचनामे करण्याचे काम सुरुच राहिल. अशी माहिती कृषी अधिकारी साठे यांनी दिली.

अवकाळी धूमशान सुरुच, शेतकरी धास्तावले

शनिवारी अवकाळी पावसाने परिसराला झोडपल्याने मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांसह फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. गारपीट झाल्याने फळबागांचा फुलोरा गळून पडला. वादळीवा-याने पिके आडवी पडली असून केळी बांगांबरोबरच कांदा पिकालाही झळ पोहचली आहे. सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता परिसरातील मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसाचे हे धूमशान शेतक-यांची चिंता वाढविणारे ठरले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावRainपाऊसFarmerशेतकरी