शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

पीक कापणी प्रयोगाला उद्यापासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : शेतकऱ्यांच्या पीकविमा कापणी प्रयोगाच्या पहिल्या टप्प्याला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तालुक्यातील आठ महसूल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शेतकऱ्यांच्या पीकविमा कापणी प्रयोगाच्या पहिल्या टप्प्याला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तालुक्यातील आठ महसूल मंडळात ३८ गावांमध्ये २०० पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत.

महसूल विभागातर्फे जाहीर होणाऱ्या पैसेवारीवर आधारित पीकविमा देण्याची पद्धत बंद झाली आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास, उत्पन्न न आल्यास, बियाणे न उगवल्यास महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभागातर्फे संयुक्त समिती नेमून पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत.

अनेकदा शेतकऱ्यांना कमी पावसाने उत्पन्न येत नाही तरी त्यांना पीकविमा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. मात्र शासनाने त्यासाठी रँडम पद्धतीने गावांची निवड केली आहे. पहिल्या टप्प्याला १ पासून सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात समितीने ज्या पिकाचे प्रयोग ज्या गावाला घ्यायचे आहेत त्या ठिकाणी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी करून त्यातील दोन शेतकऱ्यांची निवड करून ठेवायची आहे.

दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरनंतर उत्पन्न यायला सुरुवात झाल्यावर पिकानुसार प्रत्यक्ष पीक काढणे सुरू होईल तेव्हा १ गुंठा म्हणजे १० बाय १० मीटरमधील पीक किती आले ते त्याच जागेवरून ऑनलाइन ॲपमध्ये माहिती भरली जाणार आहे.

तालुक्यातील आठ मंडळे

अमळनेर, नगाव, पातोंडा, अमळगाव, मारवड, शिरूड, वावडे, भरवस ही आठ मंडळे आहेत. त्यातील गावे ऐच्छिक पद्धतीने निवडली आहेत.

३८ गावांत होणार प्रयोग

तालुक्यात ३८ गावांत समिती पीक कापणी प्रयोग घेणार आहे. ती अशी गलवाडे बुद्रुक, ढेकू सिम, अमळनेर, अंचलवाडी, इंदपिंप्री, कचरे, कुऱ्हे सिम, धुरखेडा, नांद्री, पिंगळवाडे, जळोद, हिंगोणे सिम, कळमसरे, डांगरी, पाडळसरे, खापरखेडा प्र.ज. सबगव्हाण, भोरटेक, लोण पंचम, झाडी, आनोरे, जवखेडा, देवगाव, बिलखेडा, मठगव्हाण, मुंगसे, कामतवाडी, धुपी, सात्री, मंगरूळ, एकतास, तांदळी, भिलाली, भरवस, बोदर्डे, बोरगाव, वाघोदा, बोहरा, पिंपळी प्र.ज. या गावांचा समावेश आहे.

अशी आहे समिती

ज्या गावात पीक कापणी प्रयोग घ्यायचा आहे त्या ग्रामस्तरीय समितीत सरपंच, पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची समिती असेल. ही समिती दिलेल्या सूचनेनुसार त्या त्या प्रकारच्या पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची प्रयोगासाठी निवड करून तक्त्यात ऑनलाइन माहिती पाठवेल.

कोणत्या पिकाचे किती प्रयोग

ज्वारी - १२

बाजरी - १८

मका- ९

तूर -१२

उडीद - १२

मूग - ३०

भुईमूग - १२

तीळ- ३०

सोयाबीन - ९

कापूस- ५०

कोट

पीकविमा पारदर्शी पद्धतीने मिळावा शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही म्हणून समिती आणि शेतकरी निवडप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सरपंच, पोलीसपाटील व शेतकरी यांनी दक्ष राहून योग्य माहिती भरली जाईल म्हणजे तक्रारी राहणार नाहीत. - अनिल पाटील, आमदार, अमळनेर.

कोट

धुरखेडा हे गाव अस्तित्वात नसले तरी महसूल दप्तरी शिवार अस्तित्वात असल्याने त्या ठिकाणच्या प्रयोगात सरपंच, ग्रामसेवक यांचा समावेश नसेल. महसूल व कृषी विभाग शेतकऱ्यांच्या समक्ष प्रयोग करून अहवाल पाठवतील. - भारत वारे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर