शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पीक कापणी प्रयोगाला उद्यापासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : शेतकऱ्यांच्या पीकविमा कापणी प्रयोगाच्या पहिल्या टप्प्याला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तालुक्यातील आठ महसूल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शेतकऱ्यांच्या पीकविमा कापणी प्रयोगाच्या पहिल्या टप्प्याला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तालुक्यातील आठ महसूल मंडळात ३८ गावांमध्ये २०० पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत.

महसूल विभागातर्फे जाहीर होणाऱ्या पैसेवारीवर आधारित पीकविमा देण्याची पद्धत बंद झाली आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास, उत्पन्न न आल्यास, बियाणे न उगवल्यास महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभागातर्फे संयुक्त समिती नेमून पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत.

अनेकदा शेतकऱ्यांना कमी पावसाने उत्पन्न येत नाही तरी त्यांना पीकविमा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. मात्र शासनाने त्यासाठी रँडम पद्धतीने गावांची निवड केली आहे. पहिल्या टप्प्याला १ पासून सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात समितीने ज्या पिकाचे प्रयोग ज्या गावाला घ्यायचे आहेत त्या ठिकाणी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी करून त्यातील दोन शेतकऱ्यांची निवड करून ठेवायची आहे.

दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरनंतर उत्पन्न यायला सुरुवात झाल्यावर पिकानुसार प्रत्यक्ष पीक काढणे सुरू होईल तेव्हा १ गुंठा म्हणजे १० बाय १० मीटरमधील पीक किती आले ते त्याच जागेवरून ऑनलाइन ॲपमध्ये माहिती भरली जाणार आहे.

तालुक्यातील आठ मंडळे

अमळनेर, नगाव, पातोंडा, अमळगाव, मारवड, शिरूड, वावडे, भरवस ही आठ मंडळे आहेत. त्यातील गावे ऐच्छिक पद्धतीने निवडली आहेत.

३८ गावांत होणार प्रयोग

तालुक्यात ३८ गावांत समिती पीक कापणी प्रयोग घेणार आहे. ती अशी गलवाडे बुद्रुक, ढेकू सिम, अमळनेर, अंचलवाडी, इंदपिंप्री, कचरे, कुऱ्हे सिम, धुरखेडा, नांद्री, पिंगळवाडे, जळोद, हिंगोणे सिम, कळमसरे, डांगरी, पाडळसरे, खापरखेडा प्र.ज. सबगव्हाण, भोरटेक, लोण पंचम, झाडी, आनोरे, जवखेडा, देवगाव, बिलखेडा, मठगव्हाण, मुंगसे, कामतवाडी, धुपी, सात्री, मंगरूळ, एकतास, तांदळी, भिलाली, भरवस, बोदर्डे, बोरगाव, वाघोदा, बोहरा, पिंपळी प्र.ज. या गावांचा समावेश आहे.

अशी आहे समिती

ज्या गावात पीक कापणी प्रयोग घ्यायचा आहे त्या ग्रामस्तरीय समितीत सरपंच, पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची समिती असेल. ही समिती दिलेल्या सूचनेनुसार त्या त्या प्रकारच्या पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची प्रयोगासाठी निवड करून तक्त्यात ऑनलाइन माहिती पाठवेल.

कोणत्या पिकाचे किती प्रयोग

ज्वारी - १२

बाजरी - १८

मका- ९

तूर -१२

उडीद - १२

मूग - ३०

भुईमूग - १२

तीळ- ३०

सोयाबीन - ९

कापूस- ५०

कोट

पीकविमा पारदर्शी पद्धतीने मिळावा शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही म्हणून समिती आणि शेतकरी निवडप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सरपंच, पोलीसपाटील व शेतकरी यांनी दक्ष राहून योग्य माहिती भरली जाईल म्हणजे तक्रारी राहणार नाहीत. - अनिल पाटील, आमदार, अमळनेर.

कोट

धुरखेडा हे गाव अस्तित्वात नसले तरी महसूल दप्तरी शिवार अस्तित्वात असल्याने त्या ठिकाणच्या प्रयोगात सरपंच, ग्रामसेवक यांचा समावेश नसेल. महसूल व कृषी विभाग शेतकऱ्यांच्या समक्ष प्रयोग करून अहवाल पाठवतील. - भारत वारे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर