शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पहूर पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या सांगवीतील तेराजणांविरूध्द दंगलीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:52 IST

अल्पवयीन मुलगी व पोलीसाकडून तक्रार

 

 

 

पहूर ता जामनेर : येथील पोलिस स्टेशनमध्ये हाणामारी करणाºया सांगवीतील १३ जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवी येथे लहान मुलांच्या भांडणावरून तडवी समाजाच्या दोन गटात शनिवारी रात्री हाणामारी झाली होती. यादरम्यान एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. या मुलीच्या तक्रारीवरून तसेच पहूर पोलिस स्टेशनमध्ये पोलीसांसमक्ष पुन्हा या दोन गटांनी आपसात मारहाण केली होती. याप्रकरणी पोलीस कर्मचाºयाच्या तक्रारीवरून १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित लोक फरार असून सांगवीत लहान मुलांचे भांडणे शनिवारी रात्री झाले होते यावरून तडवी समाजाच्या दोन गटांनी हाणामारी केली. यादरम्यान एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगही झाला. दोन्ही गट पहूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास आले असता पोलीसांसमक्ष पुन्हा तुफान हाणामारी केली. यात भांडण सोडविणारे पोलीस कर्मचारी विनय सानप किरकोळ जखमी झाले आहे. याच वेळी जमावातील काहींनी पोलिस स्टेनवर किरकोळ दगड फेक केली होती.याप्रकवणी गावातील घटनेबाबतम अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अकबर समसोद्दीन तडवी, अनिल शब्बीर तडवी, बादशहा समसोद्दीन तडवी, अकबर समसोद्दीन तडवी, सुग्रा अनिल तडवी, दिलावर शब्बीर तडवी , शाहरूख सिराज तडवी, इकबाल तडवी, मनोज बनारखाँ तडवी, मौसीम अनिल तडवी, दिलीप बाबू तडवी, आकाश अकबर तडवी व हिलाल अनिल तडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कडक कारवाईच्या सूचनाघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी डिवायएसपी ईश्वर कातकडे यांना कडक कारवाईच्या सुचना दिल्यावरून पोलीस कर्मचारी रमण कंडारे यांची तक्रार दाखल केली आहे.दरम्यान पोलिस कर्मचारी रमण कंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तेरा जणांविरूध्द भा.द.वी.३५४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९, प्रमाणे दंगल, दमदाटी, मारहाण व विनयभंग असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा विभागाचे डीवायएसपी ईश्वर कातकडे यांनी रविवारी दिवसभर या घटनेची चौकशी केलीे.कायदा सुव्यवस्थेचे काय ?पोलीसांमक्ष पोलीस स्टेशनमध्ये दोन गट आमने सामने येऊन हाणामारी करतात. भांडण सोडविणाºया पोलीस कर्मचाऱ्यांला धकाबुक्की केली जाते, एवढेच नव्हे तर हातात दगड घेऊन पोलीस स्टेशनवर भिरकवितात. या फोफावलेल्या गुन्हेगारी प्रव्रुत्तीमुळे खुद्द पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरीकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्थेचे काय? असा प्रश्न ही समाजमनाला पडला आहे.सांगवी धुमसतेयसांगवी गावात अनेक दिवसांपासून छोट्या मोठ्या घटना घडत आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर सांगवी अलीकडच्या काळात संवेदनशील म्हणून समोर आले आहे. थातुरमातुर कारवाईमुळे गुन्हेगारीला बळ मिळत आहे. वेळीच गंभीर दखल पोलिसांनी घेतली असती तर पोलीसांना हा दिवस पहावयास लागला नसता, असाही सुर उमटत आहे. 

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी