शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

बागायती कापूस उत्पादक कमावतोय ४७ रूपये रोज: शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 11:44 IST

हमी भाव वाढविण्याची होतेय मागणी

ठळक मुद्दे शेतमजुरापेक्षाही परिस्थिती बिकटहमीभावाअभावी व्यापाºयांकडून लूटस्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी

सुशील देवकरजळगाव: खते, बियाणे, मजुरी, ठिबक,कीटक नाशके आदीचा मोठ्या प्रमाणावर खर्च व तुलनेने मिळणारा कमी हमीभाव यामुळे बागायती कापूस उत्पादकाला जेमते ४७ रूपये रोज पडेल इतकेच उत्पन्न मिळत आहे. शेतमजूर देखील २०० रूपये रोज कमवीत असताना बळीराजाची अवस्था त्याहून बिकट झाली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.शेतकºयाला चांगला हमी भाव देण्यास शासनाकडून सातत्याने टाळाटाळ होत आली आहे. स्वामीनाथ आयोगाने उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली आहे. असे असताना शासनाच्या दुर्लक्षामुळे बळीराजा व्यापाºयांकडून नागवला जात आहे. पडत्या भावाला माल खरेदी करायचा आणि परप्रांतात नेऊन जास्त भावाने विकून रग्गड पैसा कमवायचे उद्योग सुरू आहेत. त्यातच शेतकरी कर्जबाजारी झाला तर कशाला हवी कर्जमाफी? असे प्रश्न शेतीतील ओ-की-ठो कळत नसलेल्यांनी करावेत, असा दुर्देवाचा फेरा शेतकºयांच्या नशिबी आला आहे.असा होतो खर्चकापूस उत्पादकांचा होणार एकरी खर्चच एका शेतकºयाने सविस्तर मांडून मिळणारे उत्पन्न व त्यातून कापूस उत्पादक शेतकºयाला पडणारा रोज याचा ताळेबंदच सोशल मिडियावर टाकला आहे, त्याची चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे. त्यात बागायती कापूस उत्पादकाला एका एकरला नांगरणीसाठी १००० रूपये, रोटाव्हेटर १००० रूपये खर्च येतो. ठिबकची किंमत किमान १५००० रूपये आहे. ते किमान तीन वर्ष टिकते. म्हणजेच वर्षाला ५ हजार रूपये खर्च येतो. सरी काढण्याची मजुरी ५०० रूपये, ठिबक बसविण्याची मजुरी १००० रूपये, बियाणे २ पाकीटे २ हजार रूपये, पेरणी मजुरी १ हजार रूपये, खतांसाठीपेरणीवेळी १ बॅग, पेरणीनंतर १ महिन्याने १ बॅग, माल धरण्यापूर्वी १ बॅग याप्रमाणे २७०० रूपये व टाकण्याचा खर्च २०० रूपये प्रमाणे ६०० रूपये असा एकूण ३ हजार रूपये खर्च येतो. कोळपणी किमान दोन वेळेचा खर्च २ हजार रूपये किमान एक खुरपणी १ हजार रूपये, किटकनाशकांच्या किमान ४ फवारण्या कराव्या लागतात. त्यासाठी एका फवारणीला हजार रूपये प्रमाणे ४ हजार रूपये खर्च येतो. जर निसर्गाच्या कृपेने कापूस उत्पादन चांगले आले तर जास्तीत जास्त एकरी १२ क्विंटल उत्पन्न मिळते. त्यासाठी ७ रूपये किलो प्रमाणे वेचणीसाठी ८४०० रूपये इतकी मजुरी लागते. तर शेवटी शेतात उरलेले खुंट शेताबाहेर काढण्यासाठी १ हजार रूपये खर्च येतो. याप्रमाणे एकरी सुमारे ३० हजार ९०० म्हणजेच ३१ हजार रूपये खर्च येतो.केवळ ४७ रूपये पडतो रोजशासनाकडून ३५०० ते ४ हजार रूपये क्विंटल भाव दिला जात आहे. ४ हजार रूपये भाव धरला तरी १२ क्विंटलला म्हणजेच एकरी ४८००० रूपये उत्पन्न मिळते. त्यातून ३१ हजार रूपये खर्च वजा जाता शेतकºयाच्या हाती केवळ १७ हजार रुपये शिल्लक राहतात. म्हणजेच १४११ रूपये महिना किंवा ४७ रूपये रोज या शेतकºयाला पडतो. त्याव्यतिरिक्त विहिरीवरील पंपांचे वीजबिल, शेतकºयाची स्वत:ची मेहनत वेगळीच.