शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बागायती कापूस उत्पादक कमावतोय ४७ रूपये रोज: शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 11:44 IST

हमी भाव वाढविण्याची होतेय मागणी

ठळक मुद्दे शेतमजुरापेक्षाही परिस्थिती बिकटहमीभावाअभावी व्यापाºयांकडून लूटस्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी

सुशील देवकरजळगाव: खते, बियाणे, मजुरी, ठिबक,कीटक नाशके आदीचा मोठ्या प्रमाणावर खर्च व तुलनेने मिळणारा कमी हमीभाव यामुळे बागायती कापूस उत्पादकाला जेमते ४७ रूपये रोज पडेल इतकेच उत्पन्न मिळत आहे. शेतमजूर देखील २०० रूपये रोज कमवीत असताना बळीराजाची अवस्था त्याहून बिकट झाली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.शेतकºयाला चांगला हमी भाव देण्यास शासनाकडून सातत्याने टाळाटाळ होत आली आहे. स्वामीनाथ आयोगाने उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली आहे. असे असताना शासनाच्या दुर्लक्षामुळे बळीराजा व्यापाºयांकडून नागवला जात आहे. पडत्या भावाला माल खरेदी करायचा आणि परप्रांतात नेऊन जास्त भावाने विकून रग्गड पैसा कमवायचे उद्योग सुरू आहेत. त्यातच शेतकरी कर्जबाजारी झाला तर कशाला हवी कर्जमाफी? असे प्रश्न शेतीतील ओ-की-ठो कळत नसलेल्यांनी करावेत, असा दुर्देवाचा फेरा शेतकºयांच्या नशिबी आला आहे.असा होतो खर्चकापूस उत्पादकांचा होणार एकरी खर्चच एका शेतकºयाने सविस्तर मांडून मिळणारे उत्पन्न व त्यातून कापूस उत्पादक शेतकºयाला पडणारा रोज याचा ताळेबंदच सोशल मिडियावर टाकला आहे, त्याची चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे. त्यात बागायती कापूस उत्पादकाला एका एकरला नांगरणीसाठी १००० रूपये, रोटाव्हेटर १००० रूपये खर्च येतो. ठिबकची किंमत किमान १५००० रूपये आहे. ते किमान तीन वर्ष टिकते. म्हणजेच वर्षाला ५ हजार रूपये खर्च येतो. सरी काढण्याची मजुरी ५०० रूपये, ठिबक बसविण्याची मजुरी १००० रूपये, बियाणे २ पाकीटे २ हजार रूपये, पेरणी मजुरी १ हजार रूपये, खतांसाठीपेरणीवेळी १ बॅग, पेरणीनंतर १ महिन्याने १ बॅग, माल धरण्यापूर्वी १ बॅग याप्रमाणे २७०० रूपये व टाकण्याचा खर्च २०० रूपये प्रमाणे ६०० रूपये असा एकूण ३ हजार रूपये खर्च येतो. कोळपणी किमान दोन वेळेचा खर्च २ हजार रूपये किमान एक खुरपणी १ हजार रूपये, किटकनाशकांच्या किमान ४ फवारण्या कराव्या लागतात. त्यासाठी एका फवारणीला हजार रूपये प्रमाणे ४ हजार रूपये खर्च येतो. जर निसर्गाच्या कृपेने कापूस उत्पादन चांगले आले तर जास्तीत जास्त एकरी १२ क्विंटल उत्पन्न मिळते. त्यासाठी ७ रूपये किलो प्रमाणे वेचणीसाठी ८४०० रूपये इतकी मजुरी लागते. तर शेवटी शेतात उरलेले खुंट शेताबाहेर काढण्यासाठी १ हजार रूपये खर्च येतो. याप्रमाणे एकरी सुमारे ३० हजार ९०० म्हणजेच ३१ हजार रूपये खर्च येतो.केवळ ४७ रूपये पडतो रोजशासनाकडून ३५०० ते ४ हजार रूपये क्विंटल भाव दिला जात आहे. ४ हजार रूपये भाव धरला तरी १२ क्विंटलला म्हणजेच एकरी ४८००० रूपये उत्पन्न मिळते. त्यातून ३१ हजार रूपये खर्च वजा जाता शेतकºयाच्या हाती केवळ १७ हजार रुपये शिल्लक राहतात. म्हणजेच १४११ रूपये महिना किंवा ४७ रूपये रोज या शेतकºयाला पडतो. त्याव्यतिरिक्त विहिरीवरील पंपांचे वीजबिल, शेतकºयाची स्वत:ची मेहनत वेगळीच.