शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

मनपाची सुस्ती, पाणी असलेल्या खड्ड्यात डांबर टाकून केली दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असून, हे काम अत्यंत सुमार दर्जाचे होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असून, हे काम अत्यंत सुमार दर्जाचे होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील डीमार्ट परिसरातील रस्त्यावर पाणी असलेल्या खड्ड्यातच डांबर टाकून रस्त्याची तकलादू दुरुस्तीचे काम उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे हे काम आमदार सुरेश भोळे यांनीच उघडकीस आणले असून, अशा सुमार दर्जाच्या कामामुळे रस्त्यांचा त्रास वाढत जात असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली आहे.

शहरात मनपा प्रशासनाने ऐन पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे कामे केवळ नावालाच केली जात असल्याचे आढळून येत आहे. आमदार सुरेश भोळे यांनी मंगळवारी शहरातील विविध भागात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, शिरसोली रस्त्यालगत एका ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यातील पाणी न काढताच त्यामध्ये डांबर टाकला जात असल्याचा प्रकार आमदार भोळे यांच्यासमोर घडला. आमदारांच्या समोरच असे प्रकार घडत असतील तर या रस्त्यांचा दुरुस्तीवरील मनपाचा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मनपा अभियंता काम सोडून, मेहरूण तलावावर

आमदार भोळे यांनी मनपाकडून सुरु असलेल्या ढिसाळ कामाचे पितळ उघडे पाडल्यानंतर या कामाची जबाबदारी असलेले मनपाचे अभियंते आहेत तरी कोठे ? असा प्रश्न मनपा कर्मचाऱ्यांना विचारला. आमदारांनी मनपा आयुक्तांनाच याबाबत विचारणा केल्यानंतर काही वेळात मनपा अभियंते कामाच्या ठिकाणी हजर झाले. मनपाचे अधिकारी व अभियंता कामाच्या ठिकाणी न थांबता मेहरूण तलाव व इतर ठिकाणीच असतात असा आरोप आमदार भोळे यांनी केला आहे.

ढिसाळ कामाचे ऑडिट कोण करणार ?

शहरात रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. मनपाने या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी दोन मनपा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांना मनपा कर्मचारी, नगरसेवक व इतर ठेकेदारांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचीही तयारी केली होती. आता शहरातील रस्त्यांचा कामांबाबत आमदार भोळे यांनीच आक्षेप घेतल्यामुळे मनपाकडून होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाकडून रस्त्यांचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही मनपाकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.