शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

CoronaVirus: सुवर्णबाजार बंद असल्यामुळे बळीराजावरही संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 02:04 IST

दागिन्यांची मोड नाही की तारण नाही; ऐन शेती मशागतीच्या काळात हाती पैसा नसल्याने चिंता

जळगाव : लॉकडाऊन दरम्यान सुवर्णबाजार बंद असल्याने याचा फटका सुवर्ण व्यवसायिकांसह बळीराजालाही बसत आहे. शेती मशागतीसाठी घरातील दागिन्यांची मोड करणे वा ते तारण ठेवून पैसा उभा करण्याचे साधन असलेल्या सुवर्णपेढ्या बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.कोरोनामुळे विविध देशांची अर्थव्यवस्था अस्थिर झाली असताना भारताचीही तीच स्थिती आहे. शेतीदेखील संकटात सापडली आहे. खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या काळातच कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने ही कामे ठप्प झाली आहे. या कामासह बी-बियाणे, खते यांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्ज घेऊन आपली कामे करीत असतो. या सोबतच मिळणाºया कर्जात शेतीकामांचा खर्च भागणे शक्य नसल्याने शेतकरी त्यांच्याकडे असलेले सोने-चांदीचे दागिने मोडून अथवा तारण ठेवून पैसा उभा करतो.घरात बसण्याशिवाय पर्याय नाहीकापूस असो की इतर रब्बी हंगामातील माल विकता येत नाही. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सुवर्णपेढ्या बंद असल्याने दागिन्यांची मोड करता येत नाही की ते तारण ठेवता येत नाही. त्यामुळे बळीराजाला घरातच बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.जास्त भाव असूनही मोड करता येईनाकधी नव्हे एवढ्या उच्चांकीवर सोन्याचे भाव पोहोचल्याने शेतकऱ्यांना मोड करताना फायदा होणार होता. गेल्या महिन्यात सोन्याचे भाव ४२ हजार ते ४४ हजारादरम्यान राहिले. त्यामुळे त्याचा फायदा मोड करताना झाला असता व बळीराजाच्या हाती अधिक पैसा पडला असता. मात्र, यंदा सुवर्णपेढ्याच बंद असल्याने ना मोड, ना जास्त भावाचा फायदा करता आला नाही.खरेदी व मोडचा हंगामएप्रिल-मे महिन्यात मशागतीसह लग्नसराईदेखील असते. त्यामुळे लग्नसराईत मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होते. शेतीसाठी बँकांकडून कर्ज मिळाले तरी, ते हजारात असते व शेताला खर्च लाखात लागतो, त्यामुळे दागिने मोडसाठी शेतकरी सुवर्णपेढ्याकडे जातो. परिणामी, सुवर्णबाजारात दुहेरी उलाढाल या काळात होत असते.शेतीच्या अर्थकारणासाठी दुकानांना वेळ ठरवून द्या२० एप्रिलपासून सरकार विविध क्षेत्रातील कामांना सुरुवात करण्याचे संकेत देत आहे. त्यात शेतीशी निगडित अनेक कामे आहे. सुवर्णपेढ्याही सुरू करण्याची मागणी शेतकºयांसह सुवर्ण व्यावसायिकदेखील करीत आहेत. यासाठी वेळा निश्चित करून दिल्या तरी शेतकºयांना मोठा आधार होईल व शेतीचे अर्थकारण सुरू होईल, असाही सूर उमटत आहे.एप्रिल व मे महिन्यात लग्नसराईमुळे सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी असतेच. सोबतच शेती मशागतीच्या कामासाठीदेखील शेतकरी त्यांच्याकडील दागिने विक्रीसाठी आणतात. त्यामुळे या दिवसात ही दुहेरी उलाढाल होते. मात्र, यंदा सुवर्णपेढ्या बंद असल्याने हे सर्व व्यवहार ठप्प आहेत.- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशन.कापूस तसेच इतर पिके पडून आहे. त्यात सुवर्णपेढ्या बंद असल्याने शेतकºयांना दागिने विकता वा तारण ठेवता येत नसल्याने शेती मशागतीसाठी पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न पडला आहे. - किशोर चौधरी, शेतकरी, असोदा, ता. जळगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीGoldसोनं