शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

CoronaVirus: सुवर्णबाजार बंद असल्यामुळे बळीराजावरही संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 02:04 IST

दागिन्यांची मोड नाही की तारण नाही; ऐन शेती मशागतीच्या काळात हाती पैसा नसल्याने चिंता

जळगाव : लॉकडाऊन दरम्यान सुवर्णबाजार बंद असल्याने याचा फटका सुवर्ण व्यवसायिकांसह बळीराजालाही बसत आहे. शेती मशागतीसाठी घरातील दागिन्यांची मोड करणे वा ते तारण ठेवून पैसा उभा करण्याचे साधन असलेल्या सुवर्णपेढ्या बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.कोरोनामुळे विविध देशांची अर्थव्यवस्था अस्थिर झाली असताना भारताचीही तीच स्थिती आहे. शेतीदेखील संकटात सापडली आहे. खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या काळातच कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने ही कामे ठप्प झाली आहे. या कामासह बी-बियाणे, खते यांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्ज घेऊन आपली कामे करीत असतो. या सोबतच मिळणाºया कर्जात शेतीकामांचा खर्च भागणे शक्य नसल्याने शेतकरी त्यांच्याकडे असलेले सोने-चांदीचे दागिने मोडून अथवा तारण ठेवून पैसा उभा करतो.घरात बसण्याशिवाय पर्याय नाहीकापूस असो की इतर रब्बी हंगामातील माल विकता येत नाही. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सुवर्णपेढ्या बंद असल्याने दागिन्यांची मोड करता येत नाही की ते तारण ठेवता येत नाही. त्यामुळे बळीराजाला घरातच बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.जास्त भाव असूनही मोड करता येईनाकधी नव्हे एवढ्या उच्चांकीवर सोन्याचे भाव पोहोचल्याने शेतकऱ्यांना मोड करताना फायदा होणार होता. गेल्या महिन्यात सोन्याचे भाव ४२ हजार ते ४४ हजारादरम्यान राहिले. त्यामुळे त्याचा फायदा मोड करताना झाला असता व बळीराजाच्या हाती अधिक पैसा पडला असता. मात्र, यंदा सुवर्णपेढ्याच बंद असल्याने ना मोड, ना जास्त भावाचा फायदा करता आला नाही.खरेदी व मोडचा हंगामएप्रिल-मे महिन्यात मशागतीसह लग्नसराईदेखील असते. त्यामुळे लग्नसराईत मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होते. शेतीसाठी बँकांकडून कर्ज मिळाले तरी, ते हजारात असते व शेताला खर्च लाखात लागतो, त्यामुळे दागिने मोडसाठी शेतकरी सुवर्णपेढ्याकडे जातो. परिणामी, सुवर्णबाजारात दुहेरी उलाढाल या काळात होत असते.शेतीच्या अर्थकारणासाठी दुकानांना वेळ ठरवून द्या२० एप्रिलपासून सरकार विविध क्षेत्रातील कामांना सुरुवात करण्याचे संकेत देत आहे. त्यात शेतीशी निगडित अनेक कामे आहे. सुवर्णपेढ्याही सुरू करण्याची मागणी शेतकºयांसह सुवर्ण व्यावसायिकदेखील करीत आहेत. यासाठी वेळा निश्चित करून दिल्या तरी शेतकºयांना मोठा आधार होईल व शेतीचे अर्थकारण सुरू होईल, असाही सूर उमटत आहे.एप्रिल व मे महिन्यात लग्नसराईमुळे सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी असतेच. सोबतच शेती मशागतीच्या कामासाठीदेखील शेतकरी त्यांच्याकडील दागिने विक्रीसाठी आणतात. त्यामुळे या दिवसात ही दुहेरी उलाढाल होते. मात्र, यंदा सुवर्णपेढ्या बंद असल्याने हे सर्व व्यवहार ठप्प आहेत.- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशन.कापूस तसेच इतर पिके पडून आहे. त्यात सुवर्णपेढ्या बंद असल्याने शेतकºयांना दागिने विकता वा तारण ठेवता येत नसल्याने शेती मशागतीसाठी पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न पडला आहे. - किशोर चौधरी, शेतकरी, असोदा, ता. जळगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीGoldसोनं