शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्व टिकवणे अवघड तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीत जागांवरून वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 19:24 IST

२००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढल्या.

- सुशील देवकर

जळगाव: जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. राष्ट्रवादीचा एकच आमदार निवडून आलेला असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना जिल्ह्यात अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. इतकी बिकट परिस्थिती असतानाही या दोन्ही पक्षांमध्ये अद्यापही जिल्ह्यातील जागांवरून वाद सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी रावेरची जागा काँग्रेसला देताना झालेल्या तडजोडीत जामनेर व अमळनेर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीला देण्याचे ठरल्याची चर्चा असताना काँग्रेस व राष्ट्रवादीचेही जिल्ह्यातील पदाधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. एकीकडे सेना-भाजपा जागा वाटपावरून वाद सुरू असताना काँग्रेस-राष्ट्रवादीतही मतदार संघावरूनच गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे.

२००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढल्या. त्यावेळी ठरलेल्या जागा वाटपाच्या सुत्रानुसार जळगाव जिल्ह्यात काँग्रेसकडे जळगाव शहर, जामनेर, रावेर व अमळनेर असे चार मतदारसंघ तर राष्ट्रवादीकडे उर्वरीत ७ मतदार संघ असे सूत्र ठरले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजपा स्वतंत्र लढले. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीही स्वतंत्र लढले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र लढले. त्यावेळी जिल्ह्यातील रावेर व जळगाव हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच वाट्याला असतानाही रावेर मतदारसंघ शेवटच्या क्षणी काँग्रेसला देण्यात आला होता. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर झालेल्या तडजोडीत काँग्रेसकडील जामनेर व अमळनेर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने मागून घेतल्याची चर्चा होती. मात्र याबाबत जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांशी कोणतीच चर्चा झालेली नाही.

आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्यावर काँग्रेसला केवळ रावेर व जळगाव मतदारसंघच वाट्याला येणार असल्याची चर्चा सुरू होताच काँग्रेसचे पदाधिकारी खडबडून जागे झाले. याबाबत वरिष्ठांशी संपर्कही साधण्यात येऊन पूर्वीच्या चार जागांसोबतच आणखी काही जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याभेटीची वेळही मागण्यात आली आहे. १३ अथवा १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी थोरात यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

काँग्रेसचा ‘मुक्ताईनगर’वर दावापूर्वीच्या जागा वाटपानुसार काँग्रेसकडे चार जागा तर कायम ठेवाव्याच शिवाय जेथे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे, अशा जागाही काँग्रेसकडे घ्याव्यात, अशी मागणी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यात मुक्ताईनगरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा केला जात आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचे उदाहरण दिले जात आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर याबाबत काय दखल घेतली जाते? याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावvidhan sabhaविधानसभा