शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

अस्तित्व टिकवणे अवघड तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीत जागांवरून वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 19:24 IST

२००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढल्या.

- सुशील देवकर

जळगाव: जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. राष्ट्रवादीचा एकच आमदार निवडून आलेला असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना जिल्ह्यात अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. इतकी बिकट परिस्थिती असतानाही या दोन्ही पक्षांमध्ये अद्यापही जिल्ह्यातील जागांवरून वाद सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी रावेरची जागा काँग्रेसला देताना झालेल्या तडजोडीत जामनेर व अमळनेर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीला देण्याचे ठरल्याची चर्चा असताना काँग्रेस व राष्ट्रवादीचेही जिल्ह्यातील पदाधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. एकीकडे सेना-भाजपा जागा वाटपावरून वाद सुरू असताना काँग्रेस-राष्ट्रवादीतही मतदार संघावरूनच गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे.

२००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढल्या. त्यावेळी ठरलेल्या जागा वाटपाच्या सुत्रानुसार जळगाव जिल्ह्यात काँग्रेसकडे जळगाव शहर, जामनेर, रावेर व अमळनेर असे चार मतदारसंघ तर राष्ट्रवादीकडे उर्वरीत ७ मतदार संघ असे सूत्र ठरले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजपा स्वतंत्र लढले. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीही स्वतंत्र लढले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र लढले. त्यावेळी जिल्ह्यातील रावेर व जळगाव हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच वाट्याला असतानाही रावेर मतदारसंघ शेवटच्या क्षणी काँग्रेसला देण्यात आला होता. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर झालेल्या तडजोडीत काँग्रेसकडील जामनेर व अमळनेर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने मागून घेतल्याची चर्चा होती. मात्र याबाबत जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांशी कोणतीच चर्चा झालेली नाही.

आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्यावर काँग्रेसला केवळ रावेर व जळगाव मतदारसंघच वाट्याला येणार असल्याची चर्चा सुरू होताच काँग्रेसचे पदाधिकारी खडबडून जागे झाले. याबाबत वरिष्ठांशी संपर्कही साधण्यात येऊन पूर्वीच्या चार जागांसोबतच आणखी काही जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याभेटीची वेळही मागण्यात आली आहे. १३ अथवा १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी थोरात यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

काँग्रेसचा ‘मुक्ताईनगर’वर दावापूर्वीच्या जागा वाटपानुसार काँग्रेसकडे चार जागा तर कायम ठेवाव्याच शिवाय जेथे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे, अशा जागाही काँग्रेसकडे घ्याव्यात, अशी मागणी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यात मुक्ताईनगरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा केला जात आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचे उदाहरण दिले जात आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर याबाबत काय दखल घेतली जाते? याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावvidhan sabhaविधानसभा