शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

अर्थसंकल्पाबाबत जळगावात संमिश्र प्रतिक्रिया, कृषी क्षेत्राच्या तरतुदीमुळे उद्योगांना फायदा होण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:51 IST

व्यापार, उद्योगांच्या पदरी निराशा

ठळक मुद्देउद्योगांसाठी मोठी घोषणा नाहीचस्थानिक कर ‘जैसे थे’

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ९ - केंद्राप्रमाणे राज्याच्याही अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याने त्याचा फायदा सर्वच क्षेत्रांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र कोट्यवधींचा कर भरणाºया व्यापारी, उद्योजकांसाठी भरीव उपाययोजना नसल्याने या क्षेत्रात नाराजीचा सूर असला तरी कृषी क्षेत्रामुळे फायदा होणार असल्याचा सूर आहे, यामुळे एकूणच अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. या बाबत व्यापारनगरी तसेच डाळ व पाईप उद्योगांचे माहेर घर असलेल्या जळगावातील उद्योजक, व्यापाºयांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता निवडणुका डोळ््यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केल्याचाही सूर उमटला.कोट्यवधींचा कर भरणाºयांची निराशाराज्यातील व्यापाºयांकडून दरवर्षी सरकार १ लाख ६५ हजार कोटी रुपयांचा कर वसूल करते. मात्र त्यांचा या अर्थसंकल्पात विचार झाला नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. कृषी क्षेत्रासाठी तरतूद केली असली तरी सध्या शेतकºयांची बिकट स्थिती व सरकारबद्दलची त्यांची नाराजी ओळखून सरकारने २०१९च्या निवडणुकांचा विचार करीत कृषी क्षेत्रासाठी ही तरतूद केली असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे.राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगाबाबत सरकारने घोषणा केली, मात्र त्याची अंमलबजावणी कधी व कशी करणार याबाबत ठोस सांगितलेले नाही. कर्मचाºयांना आयोग मिळाल्यास त्याचा थेट फायदा बाजारपेठेत होतो, त्यामुळे हा आयोग लवकर लागू होण्याची अपेक्षा व्यापारी वर्गातूनही होत आहे.स्थानिक कर ‘जैसे थे’मूल्यवर्धीत कर (व्हॅट) व इतर कर जीएसटीमुळे नसले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर, व्यवसाय कर अद्यापही भरावे लागत आहे. ते रद्द होण्याची अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने नाराजी आहे.उद्योगांसाठी मोठी घोषणा नाहीचपायाभूत सुविधांमध्ये रस्ते उभारणीची घोषणा असली तरी उद्योगांसाठी मोठी घोषणा नसल्याने अपेक्षाभंग झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.शीतगृहांमुळे फायदाशेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच शीतगृह उभारणी यामुळे कृषी माल व एकूणच शेतकºयांना फायदा होणार आहे. यामुळे माल जास्त दिवस टिकून राहील, वर्षभर बाजारपेठेत चांगला माल येईल व भाव स्थिर राहण्यास मदत होईल, यामुळे बाजारपेठ, उद्योगांनाही फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकºयांची स्थिती सुधारल्यास कृषी पूरक डाळ, पाईप उद्योगांनाही फायदा होईल, असा सूर उद्योजकांकडून उमटला.कौशल्य विकास मार्गदर्शनामुळे फायदाविदेशात शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना आता सरकारच कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन करण्याची घोषणा करण्यात आल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व उद्योगांना होईल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.कृषी क्षेत्रातील तरतुदींमुळे सर्वच क्षेत्रांना फायदा होण्यासाठी कौशल्य विकास मार्गदर्शनामुळे उद्योगांनाही फायदा होईल. मात्र उद्योगांसाठी अपेक्षित असलेली मोठी घोषणा नाही.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद केल्याने कृषी पूरक उद्योगांना फायदा होणार आहे. या सोबतच पायाभूत सुुविधांवर सरकारचा भर असल्याने त्यास नवीन उद्योग येण्यास चालना मिळण्याची अपेक्षा आहे.- अंजनीकुमार मुंदडा, प्रदेश सचिव, लघु उद्योग भारती.शीतगृहांमुळे शेतीमाल तसेच बाजारपेठेसही फायदा होईल. मात्र स्थानिक कर कमी रद्द होण्याची अपेक्षा होती, ते झाले नाही.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, गे्रन किराणा मर्चंट असोसिएशननिवडणुका डोळ््यासमोर ठेवून कृषीसाठी उपाययोजना करण्याचे सरकारचे धोरण दिसून येत आहे. कोट्यवधी कर भरणाºया व्यापाºयांनाच्या पदरी अर्थसंकल्पातून निराशा पडली आहे.- पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ.

टॅग्स :JalgaonजळगावBudget 2018अर्थसंकल्प २०१८