शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भावभोळया भक्तीची ही एक तारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:17 PM

मनुष्य हा पृथ्वीवरील स्वार्थी प्राणी आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात तो फक्त स्वार्थ पहातो. अध्यात्मामध्ये सुद्धा देवाला हात जोडतो ...

मनुष्य हा पृथ्वीवरील स्वार्थी प्राणी आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात तो फक्त स्वार्थ पहातो. अध्यात्मामध्ये सुद्धा देवाला हात जोडतो ते फक्त काही मागण्यासाठी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला मीच स्वरा अपराधी.... या भक्ती गीतात सांगितल्याप्रमाणे मनात भक्ती भाव न ठेवता फक्त देवाने इच्छा पूर्ण करावी हाच ध्यास मनुष्य घेत असतो. खरं तर भगवंत भाव, भक्तीचाच भुकेला आहे. जो कोणी त्याला शुद्ध अत:करणाने अर्पण करतो ते तो आनंदाने स्वीकारतो. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगितले आहे.शबरीने भक्ती पूर्वक अर्पण केलेली बोर रामाने मोठ्या आवडीने स्वीकार करून खाल्ले. इतकेच काय तर रिकामे झालेल्या अक्षय पात्रातून उरलेल्या भाजीचा एक कण खाऊन भगवंतांनी ऋतू कालोत्स पुष्पाणी समर्पयामी, असे म्हणून त्या-त्या ऋतूत आलेल कोणतेही फुल भगवंताला अर्पण केले तरी भगवंत ते फुुल आनंदाने स्वीकरतो.भगवंताला काहीच नाही तर रोज पाणी जरी अर्पण केले तरी तो ते आनंदाने स्वीकारतो, पण त्यात भक्ताची भाव भक्ती असायला हवी. सुदामाने आणलेली पोहयाची गाठोडी घेऊन त्या भक्तीच्या पोह्याची गाठ भगवंतांनी स्वत:च्या हाताने सोडली आणि मुठभर पोहे खाऊन तृप्त झाले, अशी अनेक उदाहरणे देता येतील जी भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. मनुष्याने स्वार्थ सोडून जगाच्या कल्याणाचा विचार करून भगवंत भक्ती केल्यास मनुष्याचा स्वत:चा उत्कर्ष होईल. अनेक महात्मा लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपल्या जीवनात उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर केवळ आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा ज्ञानरूपी प्रकाश जेवढ्यांना देता येईल. त्यांनाही ही ऊर्जा आणि प्रेरणा द्यायची आहे. आपल्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये व्यवहारांमध्ये अंगीकार करून, गोड वाणीद्वारे कोणाचे मन न दुखवता ही प्रेरणा दिली पाहिजे.-नाना महाराज कुलकर्णी,  पिंप्राळा

टॅग्स :Jalgaonजळगाव