शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा : साकेगावात तब्बल चार वर्षांनंतर ऑन कॅमेरा झाली ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : कोरोनाविषयक नियमांमुळे गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यासह जिल्ह्यात ग्रामसभा झाली नाही. ‘लोकमत’ने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : कोरोनाविषयक नियमांमुळे गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यासह जिल्ह्यात ग्रामसभा झाली नाही. ‘लोकमत’ने ‘गावातील ज्वलंत समस्या सुटण्यासाठी ग्रामस्थांना आता ग्रामसभेची आस’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने याची गांभीर्यपूर्वक दखल घेत तालुक्यातील सर्वच गावांना ग्रामसभेच्या नियोजनाच्या सूचना केल्या. साकेगाव येथे तब्बल चार वर्षांनंतर झालेल्या ऑन कॅमेरा ग्रामसभेत नागरिकांनी विविध प्रश्न मांडले. यावर ‘आश्वासन नको, कृती करावी’, अशी भूमिका नागरिकांनी ग्रामसभेत घेतली.

पावसामुळे प्रथमच ग्रामसभा ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर घेण्यात आली. गावात सध्या सोशल मीडियावर कोल्ड वॉर सुरू आहे. याचे पडसाद ग्रामसभेत उमटू नये याकरिता दक्षता म्हणून पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत ऑन कॅमेरा ग्रामसभा झाली.

चुडामण नगरसह शाळेकडे भागातील नागरिकांना फेऱ्याने जावे लागणार

चिखली - तरसोद महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य जवळपास संपुष्टात आले आहे. या प्रकल्पाचे कंपनीचे मुख्य कार्यालय हे गावातच असूनही फक्त गावातील मोठ्या भूखंडाची एनओसी देण्यातच पुढाऱ्यांना धन्यता वाटली व यातही मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना चुडामणनगर, शाळेकडील भागातील वाढीव वस्तीच्या नागरिकांना भुसावळकडे जाण्यासाठी बोगदाच सोडण्यात आलेला नाही. यावर कुठलेही अर्ध फाटे करण्यात आले नाही. नियोजन करण्यात आले नसल्याचा ज्वलंत प्रश्न ग्रामसभेत मांडला. इतर सर्व प्रश्न महामार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून सोडविले; मात्र हा ज्वलंत प्रश्न का दिसला नाही? यावर गोंधळ झाला.

डुकरांमुळे शेतशिवारासह ग्रामस्थांना त्रास

गावात मोठ्या प्रमाणात डुकरांचा उच्छाद वाढत आहे. याशिवाय डुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उभ्या पिकांचे नुकसान करत आहेत, यावर त्वरित उपाययोजना करावी, अशा सूचना करण्यात आल्या. यावर संबंधितांनी यावर लगेच कारवाईचे आश्वासन दिले.

ग्रामस्थांनी ग्रामसभा केली ‘एन्जॉय’

वास्तविक अनेक वर्षांनंतर झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आपल्या प्रभागातील प्रश्न मांडून ते कशा पद्धतीने लवकरात लवकर सुटतील यावर चर्चा होणे अपेक्षित असताना काही मोजक्या लोकांनी त्यावर प्रकाश टाकला. मात्र, युवकांसह नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना विरोधकांसह नागरिक काय प्रश्न विचारतात? त्याचे सत्ताधारी कशा पद्धतीने उत्तर देतील, ग्रामपंचायतीच्या आतील विषय चव्हाट्यावर येतील का? या उत्सुकतेपोटी एन्जॉय म्हणून ग्रामसभेस गर्दी केली होती.

संपूर्ण परिसरात डेंग्यू पार्श्वभूमीवर व्हावी फवारणी

गावात डेंग्यूने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रभागात फवारणी सुरू आहे, मात्र ती प्रभावीरीत्या प्रत्येक प्रभागातील गल्ली-बोळात व्हावी, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी केली.

दरम्यान, ग्रामसभेत विविध विषयांवर आलेल्या अर्जांचे वाचन करण्यात आले. याशिवाय विविध समित्यांची स्थापना शासकीय निकषाप्रमाणे करण्यात येईल याची माहिती देण्यात आली.

आश्वासन नको, कृती हवी

गावातील अनेक ज्वलंत प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. यावर ‘आश्वासन नको, प्रत्यक्षात कृती व्हावी’, अशी अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

या सभेत सत्ताधारी व विरोधी पक्षाचे पुढारी, ग्रामविकास अधिकारी एच. डी. पाटील, गावातील काही प्रतिष्ठित नागरिक, याशिवाय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक घनश्याम चौधरी, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम पटेल, आरोग्य केंद्राच्या दीप्ती पाटील, ज्योती घुले, आशावर्कर, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस निरीक्षकांची ग्रामसभेला भेट

तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी ग्रामसभा शांततेत व्हावी, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता प्रथमच साकेगावला भेट देत ग्रामसभेची माहिती घेतली.