शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

स्वच्छ सर्वेक्षणात आयुक्तांना मुख्यालयी थांबण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:37 IST

राज्य शासनाच्या सूचना

ठळक मुद्दे ३१ जानेवारीपर्यंत होणार सर्वेक्षण

जळगाव : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये देखील स्वच्छ महाराष्टÑ अभियान राबविण्यात आले आहे. त्यानुसार ४ ते ३१ जानेवारीदरम्यान शहरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांनी या सर्वेक्षणाची पूर्व तयारी व संनियत्रण योग्य रितीने होण्यासाठी मनपा आयुक्तांनी मुख्यालयात उपस्थित राहण्याचा सक्त सूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत.राज्य शासनाकडून यासंबधी ५ जानेवारी रोजी परिपत्रक काढून यासंबधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयात म्हटले आहे की, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सर्वेक्षणाची पूर्व तयारी व संनियत्रण योग्य रितीने होण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि नागरिकांचे अभिप्राय याबाबतची कार्यवाही पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत आयुक्तांना माहिती घ्यावी लागणार आहे.३१ जानेवारी पर्यंत होत असलेल्या सर्वेक्षण कालावधीत आयुक्तांना आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील केवळ मनपाच्या महत्वपुर्ण बैठकांसाठीचे प्रवास अपवादात्मक सोडण्यात आले आले आहे. राजशिष्टाचारानुसार अनिवार्य बाबत वगळता इतर ठिकाणी जाताना मनपा आयुक्तांना नगरविकास विभागाच्या पूर्व व विवक्षित मान्यता घ्यावीच लागणार आहे. तसेच आयुक्तांनी सर्वेक्षण मुल्यमापनातील महत्वाचा घटक असणारे, प्रत्यक्ष निरीक्षण व नागरिकांचे अभिप्राय या घटकांबाबत विशेषत्वाने उत्तम मुल्यांकन होण्याचा दृष्टीने आयुक्तांनी स्वत: आवश्यक खात्री करावी लागणार आहे. तसेच आयुक्तांनी प्रत्येक दिवशी या सर्वेक्षणाच्या मुल्यमापणाच्या दृष्टीने परिपुर्ण नियोजन करावे लागणार आहे.जळगाव मनपापुढे आव्हानया सर्वेक्षणात पात्र ठरण्याचे जळगाव मनपासमोर मोठे आव्हान राहणार आहे. कारण मनपाचे सर्व सर्वेक्षण हे सध्यातरी कागदावरच असल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांना ओला व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र सुविधा मिळत नाही.कचºयाचे विलगीकरण होत नसून शहरातून जमा होणाºया कचºयावर कुठलीही प्रक्रिया देखील होत नसल्याचे पहायला मिळत आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प देखील अनेक वर्षांपासून बंद असून या ठिकणी लाखो क्ंिवटल कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. त्यामुळे देखील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थिती जळगाव मनपाला समोर या सर्वेक्षणात पात्र होण्याचे मोठे आव्हान आहे.पात्र ठरल्यास मिळणार २ कोटींचा निधीस्वच्छतेला चालना मिळावी यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. देशभरातील ५ हजार १०० शहरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाअंती सर्व महानगरपालिकांना शासनाकडे स्वच्छतेसाठी करण्यात येणाºया उपायोजनांची माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती शासनाकडे पाठविल्यानंतर शासनाच्या समितीकडून शहरात प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर नागरिकांकडून त्यांना मनपाकडून स्वच्छतेच्या दृष्टीने देण्यात येणाºया सुविधांबाबत अभिप्राय मागविले जातील. हे तीन्ही टप्पे पूर्ण केल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षणानुसार शहरांचे रेटींग ठरविले जाणार आहे. या रेटींगमध्ये शहर पात्र ठरल्यास संबधित महानगरपालिकांना शासनाकडून २ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.