शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
6
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
7
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
8
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
9
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
10
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
11
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
12
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
13
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
14
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
15
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
16
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
17
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
18
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
19
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
20
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम

जनता एक्सप्रेसमधील गार्ड व सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारी; खंडवा-भुसावळ स्टेशन दरम्यान प्रकार 

By सचिन देव | Updated: July 9, 2023 19:45 IST

जीआरपी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीत तपासणीत गाडीतील सुरक्षा रक्षक संदीप कुमार याला बेदम मारहाण केल्याचे तपासणीतुन समोर आले आहे.

जळगाव: बिहारहुन मुंबईकडे जाणाऱ्या अपच्या जनता एक्सप्रेसमध्ये (गाडी क्रमांक १३२०१) शनिवारी मध्यरात्री गार्ड व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गाडी उशिरा धावण्याच्या चौकशीवरुन ही हाणामारीची घटना घडली असून, या घटनेनंतर भुसावळ स्टेशनवर गाडीतील रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी मध्यरात्री रेल्वेच्या गार्ड कर्मचाऱ्यांनी चांगलाच गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केेले. यामुळे जनता एक्सप्रेसचा तासभर खोळंबा झाला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारकडुन येणारी पटना एक्सप्रेस रात्री बारा वाजता खंडवा स्टेशनवर आल्यानंतर, या गाडीला खंडव्याहुन भुसावळ पर्यंत एस्कॉर्ट सुरक्षा देण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजीव कुमार, दीपेंद्र सोलंकी व संदीप कुमार यांच्यावर देण्यात आली होती. खंडव्याला ही गाडी येण्याची वेळ रात्री सव्वा अकराची असतांना, गाडी बारा वाजता आल्यामुळे, ही गाडी उशिरा का धावली, वाटेत काही समस्या निर्माण झाली होती का, याची चौकशी करण्यासाठी हे सुरक्षा रक्षक पोलीस गार्डच्या डब्यात गेले. गार्डच्या डब्यात गेल्यानंतर या एक्सप्रेसचे गार्ड रजनीकांत डे व त्यांच्या सोबत असलेले राजेश मीना यांनी या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोठ-मोठ्याने आवाज करून वाद घातला. यावेळी सुरक्षा रक्षक संदीप कुमार व एका गार्डमध्ये जोरदार हाणामारीही झाली. खंडवा येथुन बऱ्हानपुर स्टेशनवर गाडी आल्यानंतरही या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन, अर्धा तास गाडीचा खोळंबा झाला.

अन् गार्ड कर्मचाऱ्यांचे मध्यरात्री स्टेशनवर ठिय्या आंदोलन..जनता एक्सप्रेसमध्ये गार्ड व रेल्वे पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना भुसावळ रेल्वे पोलीस व जीआरपी पोलिसांना समजल्यानंतर, दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता. तसेच यावेळी स्टेशनवर डियुटीसाठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते. भुसावळ स्टेशनवर मध्यरात्री अडीच वाजता ही गाडी आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी जोरदार वाद झाला. यावेळी गार्ड कर्मचाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी गदारोळ करित ठिय्या आंदोलन केले. यानंतर जीआरपी पोलिसांनी रेल्वे पोलिसांसह गाडीतील दोन्ही गार्ड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन, जनता एक्सप्रेस  मुंबईच्या दिशेने मार्गस्थ केली.

रेल्वे पोलिसाला बेदम मारहाण..जीआरपी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीत तपासणीत गाडीतील सुरक्षा रक्षक संदीप कुमार याला बेदम मारहाण केल्याचे तपासणीतुन समोर आले आहे. दोघांच्या तक्रारीवरून जीआरपी पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हे नोंदविले आहेत.

जनता एक्सप्रेसमध्ये गार्ड व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेली वादाची घटना खरी आहे. मात्र, हा प्रकार खंडवा स्टेशन हद्दीत घडला असल्याने, त्यांच्याकडे तक्रार वर्ग केली आहे. विजय घेरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस, भुसावळ

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे