शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

जनता एक्सप्रेसमधील गार्ड व सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारी; खंडवा-भुसावळ स्टेशन दरम्यान प्रकार 

By सचिन देव | Updated: July 9, 2023 19:45 IST

जीआरपी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीत तपासणीत गाडीतील सुरक्षा रक्षक संदीप कुमार याला बेदम मारहाण केल्याचे तपासणीतुन समोर आले आहे.

जळगाव: बिहारहुन मुंबईकडे जाणाऱ्या अपच्या जनता एक्सप्रेसमध्ये (गाडी क्रमांक १३२०१) शनिवारी मध्यरात्री गार्ड व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गाडी उशिरा धावण्याच्या चौकशीवरुन ही हाणामारीची घटना घडली असून, या घटनेनंतर भुसावळ स्टेशनवर गाडीतील रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी मध्यरात्री रेल्वेच्या गार्ड कर्मचाऱ्यांनी चांगलाच गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केेले. यामुळे जनता एक्सप्रेसचा तासभर खोळंबा झाला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारकडुन येणारी पटना एक्सप्रेस रात्री बारा वाजता खंडवा स्टेशनवर आल्यानंतर, या गाडीला खंडव्याहुन भुसावळ पर्यंत एस्कॉर्ट सुरक्षा देण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजीव कुमार, दीपेंद्र सोलंकी व संदीप कुमार यांच्यावर देण्यात आली होती. खंडव्याला ही गाडी येण्याची वेळ रात्री सव्वा अकराची असतांना, गाडी बारा वाजता आल्यामुळे, ही गाडी उशिरा का धावली, वाटेत काही समस्या निर्माण झाली होती का, याची चौकशी करण्यासाठी हे सुरक्षा रक्षक पोलीस गार्डच्या डब्यात गेले. गार्डच्या डब्यात गेल्यानंतर या एक्सप्रेसचे गार्ड रजनीकांत डे व त्यांच्या सोबत असलेले राजेश मीना यांनी या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोठ-मोठ्याने आवाज करून वाद घातला. यावेळी सुरक्षा रक्षक संदीप कुमार व एका गार्डमध्ये जोरदार हाणामारीही झाली. खंडवा येथुन बऱ्हानपुर स्टेशनवर गाडी आल्यानंतरही या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन, अर्धा तास गाडीचा खोळंबा झाला.

अन् गार्ड कर्मचाऱ्यांचे मध्यरात्री स्टेशनवर ठिय्या आंदोलन..जनता एक्सप्रेसमध्ये गार्ड व रेल्वे पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना भुसावळ रेल्वे पोलीस व जीआरपी पोलिसांना समजल्यानंतर, दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता. तसेच यावेळी स्टेशनवर डियुटीसाठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते. भुसावळ स्टेशनवर मध्यरात्री अडीच वाजता ही गाडी आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी जोरदार वाद झाला. यावेळी गार्ड कर्मचाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी गदारोळ करित ठिय्या आंदोलन केले. यानंतर जीआरपी पोलिसांनी रेल्वे पोलिसांसह गाडीतील दोन्ही गार्ड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन, जनता एक्सप्रेस  मुंबईच्या दिशेने मार्गस्थ केली.

रेल्वे पोलिसाला बेदम मारहाण..जीआरपी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीत तपासणीत गाडीतील सुरक्षा रक्षक संदीप कुमार याला बेदम मारहाण केल्याचे तपासणीतुन समोर आले आहे. दोघांच्या तक्रारीवरून जीआरपी पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हे नोंदविले आहेत.

जनता एक्सप्रेसमध्ये गार्ड व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेली वादाची घटना खरी आहे. मात्र, हा प्रकार खंडवा स्टेशन हद्दीत घडला असल्याने, त्यांच्याकडे तक्रार वर्ग केली आहे. विजय घेरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस, भुसावळ

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे