शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जनता एक्सप्रेसमधील गार्ड व सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारी; खंडवा-भुसावळ स्टेशन दरम्यान प्रकार 

By सचिन देव | Updated: July 9, 2023 19:45 IST

जीआरपी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीत तपासणीत गाडीतील सुरक्षा रक्षक संदीप कुमार याला बेदम मारहाण केल्याचे तपासणीतुन समोर आले आहे.

जळगाव: बिहारहुन मुंबईकडे जाणाऱ्या अपच्या जनता एक्सप्रेसमध्ये (गाडी क्रमांक १३२०१) शनिवारी मध्यरात्री गार्ड व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गाडी उशिरा धावण्याच्या चौकशीवरुन ही हाणामारीची घटना घडली असून, या घटनेनंतर भुसावळ स्टेशनवर गाडीतील रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी मध्यरात्री रेल्वेच्या गार्ड कर्मचाऱ्यांनी चांगलाच गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केेले. यामुळे जनता एक्सप्रेसचा तासभर खोळंबा झाला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारकडुन येणारी पटना एक्सप्रेस रात्री बारा वाजता खंडवा स्टेशनवर आल्यानंतर, या गाडीला खंडव्याहुन भुसावळ पर्यंत एस्कॉर्ट सुरक्षा देण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजीव कुमार, दीपेंद्र सोलंकी व संदीप कुमार यांच्यावर देण्यात आली होती. खंडव्याला ही गाडी येण्याची वेळ रात्री सव्वा अकराची असतांना, गाडी बारा वाजता आल्यामुळे, ही गाडी उशिरा का धावली, वाटेत काही समस्या निर्माण झाली होती का, याची चौकशी करण्यासाठी हे सुरक्षा रक्षक पोलीस गार्डच्या डब्यात गेले. गार्डच्या डब्यात गेल्यानंतर या एक्सप्रेसचे गार्ड रजनीकांत डे व त्यांच्या सोबत असलेले राजेश मीना यांनी या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोठ-मोठ्याने आवाज करून वाद घातला. यावेळी सुरक्षा रक्षक संदीप कुमार व एका गार्डमध्ये जोरदार हाणामारीही झाली. खंडवा येथुन बऱ्हानपुर स्टेशनवर गाडी आल्यानंतरही या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन, अर्धा तास गाडीचा खोळंबा झाला.

अन् गार्ड कर्मचाऱ्यांचे मध्यरात्री स्टेशनवर ठिय्या आंदोलन..जनता एक्सप्रेसमध्ये गार्ड व रेल्वे पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना भुसावळ रेल्वे पोलीस व जीआरपी पोलिसांना समजल्यानंतर, दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता. तसेच यावेळी स्टेशनवर डियुटीसाठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते. भुसावळ स्टेशनवर मध्यरात्री अडीच वाजता ही गाडी आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी जोरदार वाद झाला. यावेळी गार्ड कर्मचाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी गदारोळ करित ठिय्या आंदोलन केले. यानंतर जीआरपी पोलिसांनी रेल्वे पोलिसांसह गाडीतील दोन्ही गार्ड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन, जनता एक्सप्रेस  मुंबईच्या दिशेने मार्गस्थ केली.

रेल्वे पोलिसाला बेदम मारहाण..जीआरपी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीत तपासणीत गाडीतील सुरक्षा रक्षक संदीप कुमार याला बेदम मारहाण केल्याचे तपासणीतुन समोर आले आहे. दोघांच्या तक्रारीवरून जीआरपी पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हे नोंदविले आहेत.

जनता एक्सप्रेसमध्ये गार्ड व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेली वादाची घटना खरी आहे. मात्र, हा प्रकार खंडवा स्टेशन हद्दीत घडला असल्याने, त्यांच्याकडे तक्रार वर्ग केली आहे. विजय घेरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस, भुसावळ

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे