शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोट्यवधीच्या निधीचा दावा, मात्र विकास झाला तरी कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 1:02 PM

रोटरीतर्फे चर्चासत्र : त्रासाला कोण जबाबदार ? : प्रश्न अनुत्तरीतच

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यवधीचा निधी आल्याचा दावा लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. मात्र, या कोट्यवधीच्या निधीतून विकास झाला तरी कुठे ? असा प्रश्न रविवारी रोटरी वेस्टतर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित ‘जळगावकरांच्या त्रासाला कोण जबाबदार ?’ या विषयावरील चर्चासत्रात उपस्थित नागरिकांनी केला. मात्र, त्रासापासून मुक्तता होईल, असे उत्तर मिळू शकले नाही.शहरातील रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत आहे. संपूर्ण शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जळगावकरांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार आहे तरी कोण ? याबाबत नागरिकांना उत्तर मिळावे यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर सुशिलकुमार राणे, किशोर ढाके, गनी मेमन, अ‍ॅड.सुरज जहांगीर, सुनील सुखाणी आदी उपस्थित होते.२८ कोटी आले सुविधांचा पत्ताच नाहीउद्योजक किशोर ढाके म्हणाले की, २५ वर्षानंतर पहिल्यादांच एमआयडीसीच्या विकासाठी २८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र, त्यातून कोणत्या समस्या सोडविण्यात आला ? हे न कळण्यापलीकडे असल्याचे सांगितले. शहरातील मुख्य चौकात सिग्नल व्यवस्था आहे. मात्र, ती अनेकदा बंद असते ती व्यवस्था जर सुरु राहिली असती तर अनिल बोरोले यांचा मृत्यू कदाचित झाला नसता. अमृत योजनेमुळे रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला असून त्याची दुरुस्ती होत नसल्याचे ढाके यांनी सांगितले.३५० कोटी वसुल करून दाखवतोगाळ्यांबाबत दीपककुमार गुप्ता यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर आयुक्तांनी हा प्रश्न टाळल्यानंतर गुप्ता यांनी १५ दिवस आयुक्त बनवा आपण गाळेधारकांकडून ३५० कोटींची वसुली करून दाखवतो असा प्रस्ताव दिला. त्यावर हा चित्रपटाचा विषय नसून तसा नियम नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर अ‍ॅड.राहुल लाठी यांनी समस्या सोडवू शकत नसेल तर मनपा बरखास्त करुन टाकावी असे सांगितले.आयुक्तांनी सांगितल्या मनपाच्या कमजोर व मजबूत बाजु ; गाळ्यांबाबत भाष्य नाही- आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी मनपाच्या कमजोर बाजू व मजबूत बाजू यावेळी मांडल्या., सध्या मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असून मनपात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.- महिने-दोन महिन्यात शहराच्या समस्या सोडवायच्या असतील तर माझ्याकडे जादुचा दिवा द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील काही वर्षात शहरात पाणी पुरवठा, मलनिस्सारण योजनेसह पिंप्राळा व शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम झाल्यामुळे मोठ्या अडचणी दुर होणार असल्याचे सांगितले.- सफाईचा ठेका देण्यात आला असून, आॅगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यात मक्तेदाराकडून काम सुरु झाल्यानंतर कचºयाची समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. तर एमआयडीसी च्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, गाळ्यांचा प्रश्नांबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे सांगत आयुक्तांनी गाळ्याचा प्रश्नाला बगल दिल्याचेच दिसून आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव