शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

विजेच्या सारख्या लंपडावाने ममुराबाद, आव्हाणे येथील नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:44 IST

जळगाव : गेल्या काही महिन्यापासून ममुराबाद व आव्हाणे येथे दररोज तासन-तास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे, नागरिक हैराण झाले ...

जळगाव : गेल्या काही महिन्यापासून ममुराबाद व आव्हाणे येथे दररोज तासन-तास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे, नागरिक हैराण झाले आहेत. खंडित वीज पुरवठ्यासंदर्भात तक्रार केल्यावर सबंंधित कर्मचारी उड्डवाउड्डवीचे उत्तरे देत असल्यामुळे नागरिकांतर्फे महावितरणच्या कामावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.महावितरणतर्फे सध्या शहरासह जिल्ह्यात कुठेही भारनियमन होत नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी, ग्रामीण भागामध्ये मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.जळगाव पासून काही अंतरावर असलेल्या ममुराबाद व आव्हाणे येथे दररोज रात्री-अपरात्री विज पुरवठा खंडित होत आहे. काही दिवसांपासून तर दररोज ४ ते ५ विज पुरवठा खंडित होत असून, या संदर्भात तक्रार केल्यावर काम सुरु असल्याचे सांगितले जाते. मात्र, कुठे काम सुरु आहे, कोणते काम सुरु आहे. विशेष म्हणजे बहुतांश वेळा सायंकाळीच वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे, कामावरुन घरी आलेल्या मजूरवर्गाला यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा आहेत. तसेच गावात वायरमन नसल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांचे अधिकच हाल होत आहेत.आव्हाणे येथे गावात एकही वायरमन राहत नसल्यामुळे, वीज पुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांनी तक्रार करावी तरी कुठे, असा प्रश्न पडत आहे.सध्या पावसाळा सुरु असल्याने, वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे गावात पूर्णवेळ वायरमन नियुक्त करण्याची मागणी आहे.अनेक ठिकाणी विद्युत खांब अन् तारा लोंबकळलेल्याममुराबाद गावात वीजेची समस्या असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी ठिकाणी विद्युत तारा व खांबही वाकलेले आहेत. यामुळे जोराने वारा आल्यास तारा तुटण्याची भिती निर्माण झाली आहे. विद्युत खांब वर्षानुवर्ष जुने असल्यामुळे, या खाबांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. तरी महावितरण प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव