शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

नव्या खासदारांपुढे विकास कामांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 20:13 IST

दळणवळण, सिंचन आणि औद्योगिक विकासाचे प्रलंबित प्रश्न नियोजनपूर्वक मार्गी लावण्याची आवश्यकता, भाजपच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या वैयक्तीक लाभाच्या योजनांमधील त्रूटी दूर होण्याची गरज

मिलिंद कुलकर्णीखान्देशात दळणवळण, सिंचन आणि औद्योगिक विकासाचे काम गेल्या पाच वर्षात सुरु झाले आहे. त्याला आता गती देण्याची आवश्यकता आहे. काही अडचणी आहेत, त्या सोडविण्याची गरज आहे. तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे केंद्र सरकारशी निगडीत काही प्रश्न प्राधान्याने हाती घेण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित खासदारांपुढे असणार आहे. राज्य सरकारदेखील सकारात्मक सहकार्याच्या भूमिकेत आहे. केंद्र व राज्यात एका पक्षाचे सरकार असल्याचा लाभ दिसायला हवा.एक सुज्ञ नागरिक मध्यंतरी भेटले. भाजप सरकारच्या पुनर्विजयाविषयी बोलताना ते म्हणाले, खान्देशचा विचार केला तर अनेक प्रश्न गंभीर बनलेले आहेत. प्रसारमाध्यमांनी प्रश्न उचलले, विरोधी पक्षांनी आंदोलने केली, लोक रस्त्यावर उतरले तरी पुन्हा भाजपला लोकांनी कशी संधी दिली हेच कळत नाही. लोकांची मानसिकता लक्षात येत नाही. त्या गृहस्थांची हतबलता लक्षात आली. अनेकांना हे प्रश्न पडले. पण मला असे वाटते की, लोकांना विश्वास देण्यात भाजपची मंडळी यशस्वी ठरली. पाच वर्षांच्या कार्यकाळात किमान सुरुवात आम्ही केली आहे, ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी एकदा संधी द्या, असे भाजपचे मागणे लोकांना पटलेले दिसते. विरोधकांना तो विश्वास देता आला नाही, असा अन्वयार्थ या निकालाचा काढता येऊ शकतो.निकालाचे गुºहाळ अनेक दिवस सुरु राहील. पण आता नव्या खासदारांपुढे मोठी आव्हाने आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. जसे या लोकसभा निवडणुकीत आमदारांची रंगीत तालीम झाली, तशी विधानसभा निवडणुकीत नव्या खासदारांची चाचणी परीक्षा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवून देणाऱ्या आमदाराचा पक्षाकडून उमेदवारी निश्चितीचा दावा भक्कम झाला. तसे खासदारांनी तीन महिन्यात कोणत्या प्रश्नांना हात घातला, त्याच्या व्हीजनची दिशा काय असणार आहे हे तीन महिन्यात त्याला दाखवावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारबरोबरच या खासदारांची कसोटी लागणार आहे.भाजप सरकारने पाच वर्षांत अनेक कामांना सुरुवात केली. परंतु, त्यातील काही कामे रखडली आहेत, हे उघड आहे. नवापूर ते चिखली या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे कायम आहे. विमानसेवा बंद पडलेली आहे. टेक्सटाईल पार्कची सुरुवात होणे बाकी आहे. जळगावकरांचा जिव्हाळ्याचा हुडको कर्ज आणि गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. धुळ्याच्या पाणी योजनेचा काथ्याकुट सुरु आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, मनमाड-धुळे-इंदोर रेल्वे मार्ग, आकांक्षित जिल्ह्यात समाविष्ट नंदुरबारची कुपोषण आणि स्थलांतराच्या शापातून मुक्तीची प्रतीक्षा...असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.खान्देशी जनतेने विश्वासाने चार खासदार निवडून दिले. या चौघांना अनुभव आहे, क्षमता आहे आणि प्रश्न सोडविण्याची हातोटी आहे. त्याचा उपयोग करुन प्रलंबित प्रश्न मार्गी लावायला हवेत. पाडळसरे, गिरणेतील बलून बंधारे, मेगा रिचार्ज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील तांत्रिक अडचणी ऐकण्यात लोकांना आता रस नाही. मागील पाच वर्षे तुम्हाला दिली आणि आता आणखी पाच वर्षे दिली आहेत, तर ही कामे मार्गी लागायला हवी, अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे.२०१४ ची पुनरावृत्ती खान्देशने २०१९ मध्ये केली आहे. चारही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. जळगावचे उन्मेष पाटील वगळता उर्वरित तिन्ही खासदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. डॉ.सुभाष भामरे यांचे मंत्रिपद हुकले. अर्थात पुढील विस्तारात समावेशाची शक्यता कायम आहे. डॉ.भामरे, रक्षा खडसे आणि डॉ.हीना गावीत यांना यावेळी वैयक्तीक लाभाच्या योजनांनी चांगला हात दिला. या योजनेत काही त्रूटी आहेत, डीबीटीविषयी अडचणी आहेत, त्यावर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. उन्मेष पाटील यांना आमदारकीचा अनुभव कामी येईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव