शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

नव्या खासदारांपुढे विकास कामांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 20:13 IST

दळणवळण, सिंचन आणि औद्योगिक विकासाचे प्रलंबित प्रश्न नियोजनपूर्वक मार्गी लावण्याची आवश्यकता, भाजपच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या वैयक्तीक लाभाच्या योजनांमधील त्रूटी दूर होण्याची गरज

मिलिंद कुलकर्णीखान्देशात दळणवळण, सिंचन आणि औद्योगिक विकासाचे काम गेल्या पाच वर्षात सुरु झाले आहे. त्याला आता गती देण्याची आवश्यकता आहे. काही अडचणी आहेत, त्या सोडविण्याची गरज आहे. तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे केंद्र सरकारशी निगडीत काही प्रश्न प्राधान्याने हाती घेण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित खासदारांपुढे असणार आहे. राज्य सरकारदेखील सकारात्मक सहकार्याच्या भूमिकेत आहे. केंद्र व राज्यात एका पक्षाचे सरकार असल्याचा लाभ दिसायला हवा.एक सुज्ञ नागरिक मध्यंतरी भेटले. भाजप सरकारच्या पुनर्विजयाविषयी बोलताना ते म्हणाले, खान्देशचा विचार केला तर अनेक प्रश्न गंभीर बनलेले आहेत. प्रसारमाध्यमांनी प्रश्न उचलले, विरोधी पक्षांनी आंदोलने केली, लोक रस्त्यावर उतरले तरी पुन्हा भाजपला लोकांनी कशी संधी दिली हेच कळत नाही. लोकांची मानसिकता लक्षात येत नाही. त्या गृहस्थांची हतबलता लक्षात आली. अनेकांना हे प्रश्न पडले. पण मला असे वाटते की, लोकांना विश्वास देण्यात भाजपची मंडळी यशस्वी ठरली. पाच वर्षांच्या कार्यकाळात किमान सुरुवात आम्ही केली आहे, ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी एकदा संधी द्या, असे भाजपचे मागणे लोकांना पटलेले दिसते. विरोधकांना तो विश्वास देता आला नाही, असा अन्वयार्थ या निकालाचा काढता येऊ शकतो.निकालाचे गुºहाळ अनेक दिवस सुरु राहील. पण आता नव्या खासदारांपुढे मोठी आव्हाने आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. जसे या लोकसभा निवडणुकीत आमदारांची रंगीत तालीम झाली, तशी विधानसभा निवडणुकीत नव्या खासदारांची चाचणी परीक्षा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवून देणाऱ्या आमदाराचा पक्षाकडून उमेदवारी निश्चितीचा दावा भक्कम झाला. तसे खासदारांनी तीन महिन्यात कोणत्या प्रश्नांना हात घातला, त्याच्या व्हीजनची दिशा काय असणार आहे हे तीन महिन्यात त्याला दाखवावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारबरोबरच या खासदारांची कसोटी लागणार आहे.भाजप सरकारने पाच वर्षांत अनेक कामांना सुरुवात केली. परंतु, त्यातील काही कामे रखडली आहेत, हे उघड आहे. नवापूर ते चिखली या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे कायम आहे. विमानसेवा बंद पडलेली आहे. टेक्सटाईल पार्कची सुरुवात होणे बाकी आहे. जळगावकरांचा जिव्हाळ्याचा हुडको कर्ज आणि गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. धुळ्याच्या पाणी योजनेचा काथ्याकुट सुरु आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, मनमाड-धुळे-इंदोर रेल्वे मार्ग, आकांक्षित जिल्ह्यात समाविष्ट नंदुरबारची कुपोषण आणि स्थलांतराच्या शापातून मुक्तीची प्रतीक्षा...असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.खान्देशी जनतेने विश्वासाने चार खासदार निवडून दिले. या चौघांना अनुभव आहे, क्षमता आहे आणि प्रश्न सोडविण्याची हातोटी आहे. त्याचा उपयोग करुन प्रलंबित प्रश्न मार्गी लावायला हवेत. पाडळसरे, गिरणेतील बलून बंधारे, मेगा रिचार्ज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील तांत्रिक अडचणी ऐकण्यात लोकांना आता रस नाही. मागील पाच वर्षे तुम्हाला दिली आणि आता आणखी पाच वर्षे दिली आहेत, तर ही कामे मार्गी लागायला हवी, अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे.२०१४ ची पुनरावृत्ती खान्देशने २०१९ मध्ये केली आहे. चारही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. जळगावचे उन्मेष पाटील वगळता उर्वरित तिन्ही खासदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. डॉ.सुभाष भामरे यांचे मंत्रिपद हुकले. अर्थात पुढील विस्तारात समावेशाची शक्यता कायम आहे. डॉ.भामरे, रक्षा खडसे आणि डॉ.हीना गावीत यांना यावेळी वैयक्तीक लाभाच्या योजनांनी चांगला हात दिला. या योजनेत काही त्रूटी आहेत, डीबीटीविषयी अडचणी आहेत, त्यावर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. उन्मेष पाटील यांना आमदारकीचा अनुभव कामी येईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव