शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविणे हेच आव्हान - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 13:26 IST

ईव्हीएमबाबत समाधान होईपर्यंत प्रात्यक्षिक दाखविण्याची तयारी

सुशील देवकर जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. निवडणुकीसाठी प्रशासनाची काय तयारी झाली आहे? याबाबत जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे म्हणाले की, मतदान केंद्र निश्चित करण्याचे तसेच मतदार यादी अंतीम करण्याचे काम महत्वाचे असते. जिल्ह्यात ३५३२ मतदान केंद्र व ५४ साह्यकारी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.२० हजार मतदार वाढलेमतदार यादी निश्चित झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ इतके मतदार आहेत. १५ जुलै पासून राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत तब्बल २० हजार मतदार समाविष्ट झाले असल्याची माहिती डॉ.ढाकणे यांनी दिली.मतदार केंद्रांमधील सुविधांवर लक्षजिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान केंद्रांसाठी ग्रामीण भागात जि.प. शाळा घेण्यात येतात. मात्र अनेक शाळांचे वीज कनेक्शनच थकबाकीमुळे कट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महावितरणला मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत हे कट केलेले वीज कनेक्शन पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधीतांनाही वीज बिलाची थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत.विश्वास बसेपर्यंत प्रात्यक्षिक दाखवूईव्हीएमबाबत अजूनही काही लोकांच्या मनात शंका असल्याची विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कुणाला अजूनही ईव्हीएमवरील मतदानाबाबत शंका असल्यास कुठल्याही तहसीलदार कार्यालयात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात यावे. त्याच्या शंकांचे निरसन केले जाईल. अगदी संबंधीताचे समाधान होईपर्यंत बटन दाबून मतदानाची प्रक्रिया करून दाखविली जाईल. तसेच व्हीव्हीपॅटही असल्याने शंका घेण्याचे कारण नाही, असे सांगितले.ईव्हीएमच्या सुरक्षेची काळजीमतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील ३६० मतदान केंद्रांवर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. तसेच ईव्हीएमची वाहतूक करणाºया वाहनांसह निवडणूक प्रक्रियेतील सर्वच वाहनांवर जीपीएस ट्रॅकर बसविण्यात येणार आहेत. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकेही स्थापन करण्यात आले असून तीन नाक्यांवरही पथके तैनात करण्यात आले आहेत.कारवाईत कोणीही अपवाद नाहीआचारसंहितेचे काटेकोर पालन प्रत्येकाला करावेच लागेल. कोणी कितीही मोठा, कितीही पॉवरफुल असला तरीही कुणालाही क्षमा नाही. लगेच व निष्पक्षपणे कारवाई केली जाईल. २७ पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे व त्यानंतर प्रचारास सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज शासकीय छापखान्यातून प्राप्त होत आहेत. काही अर्ज प्राप्त झाले आहेत. सभांसाठी मैदानांची परवानगीही ‘प्रथम येणाºयास प्राधान्य’ या तत्वावर दिली जाणार असल्याचे डॉ.ढाकणे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव