शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सुवर्ण महोत्सवी ‘गिरणा धरणा’ची शतकी सलामी, ११ वषार्नंतर ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:45 AM

गिरणा खो-याला दिले हिरवे दान

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि. जळगाव : १९६९ मध्ये लोकार्पण झालेल्या गिरणा धरणाचे यंदाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. ५० वर्षाच्या कटू - गोड आठवणी गाठीशी बांधतांनाच धरणाने आभाळमाया कवेत घेत यंदा ‘शतकी’ सलामीही दिली आहे. सोमवारी रात्री ते तब्बल ११ वषार्नंतर पूर्ण भरले असून मंगळवारी सकाळी नऊ वाजता धरणातून १५०० क्युसेस पाणी नदीत सोडण्यात आले. निम्म्याने जिल्ह्याची तहान भागविणा-या गिरणा धरणाच्या सुवर्ण महोत्सवी कृतज्ञतेचा लोकप्रतिनिधींसह प्रशासनालाही विसर पडल्याची वेदना समाजमनाच्या पटलावर तीव्रपणे उमटली आहे. आता ओव्हरफ्लो झाल्यानंतर तरी त्याच्या जलपूजनाचा सोहळा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.‘गिरणा धरण’ हे उत्तर महाराष्ट्रातील महाकाय जलप्रकल्पांपैकी एक. नऊ सप्टेंबर २०१९ रोजी गिरणा धरणाने ५० वर्ष पूर्ण करुन अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरु केली आहे. जळपास जळगाव जिल्ह्याच्या पाऊण भागाची तहान हे धरण भागवते. धरणामुळे गिरणा खो-याला हिरवे कवचही लाभले आहे.१९६९ मध्ये पहिल्यांदाच गिरणा धरणात पाणीसाठा साठविण्यात यश आले. याच वर्षी धरणाचे लोकार्पणही झाले. गिरणा धरणाला पहिली प्रशासकीय मान्यता १९५५ मध्ये मिळाली. भूमिपुजनाचा कुदळही मारला गेला. सलग १४ वर्ष काम चालल्यानंतर अवघ्या १३ कोटी रुपयात धरण पूर्णत्वास गेले. ९ सप्टेंबर १९६९ रोजी धरणात अधिकृत पाणीसाठा झाल्याचे गिरणा पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात येते. यावर्षी नाशिक परिसरात दमदार पाऊस झाल्याने ते १०० टक्के भरले.चाळीसगाव शहराच्या पश्चिमेला ४० किमी अंतरावर गिरणा धरण असून नांदगाव तालुक्यातील 'पांझन' गाव हे त्याचे निश्चित स्थळ आहे. गिरणा प्रकल्प नाशिक जिल्ह्यात असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो.महाकाय साठवण क्षमतागिरणा धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता २१ हजार ५००दलघफू असून मृत साठा तीन हजार दलघफू आहे. एक हजार ४०० फूट दगडी तर एक हजार ७६० मातीचे बांधकाम आहे. धरणाची नदी पातळीपासूनची उंची १३३ इंच तर समुद्र सपाटीपासून १३१८ इंच आहे. १८हजार ५०० दलघफू उपयुक्त तर ३०० दलघफू मृतसाठा निर्धारित केला आहे. १३ हजार ५५० एकर बुडीत क्षेत्रात क्षेत्रात धरणाचा विस्तार व्यापला असून एक लाख ४१ हजार ३६४ एकर सिंचन क्षेत्राला धरणाने हिरवा साज दिलायं. कालव्यामुळे दोन लाख ६३ हजार ३७७ एकर क्षेत्र ओलिताखाली येते.गिरणा धरणापासून निघालेला पांझण डावा कालवा ५३ किमीचा तर जामदा उजवा कालवा २० किमी. याबरोबरच डावा जामदा कालवा ४० तर निम्न गिरणा काठ ६० किमी लांबीचा आहे. या कालव्यांमुळेच गिरणामाईचे खोरे सुपीक झाले आहे. अर्थात कालव्यांमधून होणारी गळती, पाटचा-यांची दुरुस्ती हा ऐरणीवरचा प्रश्न आहे.१२७ पाणीपुरवठा योजनांचा जीवंत स्त्रोतमालेगाव शहर, चाळीसगाव शहर यासह नांदगाव, ५६ खेडीअशा १२७ पाणी पुरवठा योजनांसाठी गिरणा धरण हा एकमेव जीवंत पाणीस्त्रोत आहे. याच योजनांव्दारे जळगाव जिल्ह्याच्या पाऊण भागाची तहान भागते. बिगर सिंचनासाठी धरणाचे पाणी दहीगाव बंधा-यापर्यत प्रवास करते.५० वर्षात आठ वेळा गाठली शंभरीगिरणा धरणाने गेल्या ५० वर्षात आठ वेळा शंभरी गाठली आहे. १९७३, १९७६, १९८०, १९९४ या अंतराने चार वेळा तर २००४ ते २००५, २००६, २००७ असे सलग चार वर्ष...असे एकुण आठ वेळा गिरणा धरणाने शतकी सलामी दिली आहे. आठ ते दहा वेळा ते ५० टक्क्यांहून अधिक तर १० वेळा ९० टक्के साठवण क्षमता ओंलाडली आहे. पुनंद, हरणबारी, केळझर, चणकापुर आदी मध्यम जलप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणात पाण्याची आवक होते.लोकप्रतिनिधींना पडला विसरएकीकडे विधानसभा निवडणुकीचे डफ वाजू लागले असतांनाच चाळीसगाव तालुक्यात इच्छुकांचे जोरदार शक्तिपदर्शन सुरु झाले. सर्वच 'सिंचन क्रांति' करण्याच्या आणाभाका घेत असले तरी ज्या धरणातून आपल्यासह मततदारांचीही तहान भागते. त्या 'गिरणा' धरणाच्या सुवर्ण महोत्सव (वाढदिवस) विसरच लोकप्रतनिधींसह प्रशासनालाही पडल्याचे स्पष्ट झाले आहे. कृतज्ञता म्हणून तरी धरणाचा सुवर्ण महोत्सव साजरा होणे आवश्यक असल्याचा पर्यावरणप्रेमींचा सूर आहे. कदाचित धरण नांदगाव तालुक्यात असल्याचे कारण पुढे करुनही जबाबदारी झटकली जाईल. अर्थात हा कृतघ्नपणा ठरु शकतो. गिरणा धरणाचा सर्वाधिक फायदा जळगावला जिल्ह्याला होतो. चाळीसगाव पासून ते अवघ्या ४० किमी आहे. संपूर्ण तालुक्याच्या घश्याची कोरडही धरणातूनच ओली होते. गिरणामाईच्या मायेने शेती - शिवाराला हिरवेगार कोंदण लाभले असल्याने चाळीसगाववासियांवर गिरणा धरणाची आभाळमाया जास्त आहे. त्यामुळे कृतज्ञतेची पहिली फुले चाळीसगावकरांची असावीत. असा सूर आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव