शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

४५ लाखांचे अनुदान हडपल्याच्या प्रकरणात संशयित मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:35 AM

नऊ महिने बेकायदेशीर चालले केंद्र

ठळक मुद्दे गुन्हा दाखल झाल्यानंतर पाठविला मान्यतेचा प्रस्ताव; न्यायालयाने फेटाळले होते अटकपूर्व

जळगाव : खोट्या सह्या व ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने काही संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, तरी देखील पोलिसांनी अद्याप एकाही संशयिताला अटक केलेली नाही. एरव्ही अनेक गुन्ह्यात आरोपी अटकेची घाई करणारी यंत्रणा या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेत आहे? असा प्रश्न तक्रारदारांना पडला आहे.महाबळ परिसरातील निमजाई फांऊडेशनचे भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील यांनी खोट्या सह्या करुन मयुरेश्वर स्कुल आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेचे बनावट कागदपत्रे तयार केले तसेच सदस्य भरत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, भगवान दगडू पाटील, राजेश नरेंद्र नारखेडे यांनीही खोटा ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याचा गुन्हा दीड महिन्यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. एकीकडे हातात पुरावे असल्यानेच गुन्हा दाखल केला असे पोलीस सांगत असताना दुसरीकडे न्यायालयानेही गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून चौघांचा अटकपूर्व फेटाळला. असे असतानाही यात अजून कोणालाच अटक केली नाही. एका संशयिताला पोलिसांनी आणलेही होते, मात्र पुढे काय झाले हे कळलेच नाही.अनधिकृत सुरु होते केंद्रसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्टÑ राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत रायपुर येथे सुरु केलेले केंद्र भूषण बक्षे व शीतल पाटील यांनी पिंप्राळा येथे हलविल्याचे दाखविले, प्रत्यक्षात तेथे काहीच सुरु नाही. गणेश कॉलनी परिसरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हे केंद्र चालविले जात आहे.या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर या केंद्राला मान्यता देण्याचा प्रस्ताव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने मुंबई कार्यालयात पाठविला.त्याआधी ९ महिने हे केंद्र अनधिकृतच चालले. गुन्हा दाखल झाल्यानंतर नवीन पत्याला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, इतर सात केंद्रामध्ये हजेरीत बनवेगिरी आढळून आल्याने त्यांचा अनियमिततेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, त्याच प्रमाणे निमजाईच्या या केंद्रातील हजेरीही संशयास्पद आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याचीही चर्चा आहे. पोलीस तपास सुरु आहे इतकेच सांगत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.स्थानिक अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यातकोणत्याही केंद्राचा पत्ता बदल करावयचा असेल तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा तपासणी अहवाल शासनाकडे पाठवावा लागतो. या कार्यालयाने इतर सात केंद्राचा अनियमिततेचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविला, मग याच केंद्राचा का पाठविला नव्हता, असाही प्रश्न निर्माण होत आहे. तपासाधिकाऱ्यांनी मुंबई कार्यालयातून काही कागदपत्रे मिळविली असून स्थानिक अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.पोलीस म्हणतात, तपास सुरु आहेया प्रकरणात आरोपींना अटकेबाबत प्रभारी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षकरणजीत शिरसाठ यांना विचारला असता पुरावा असल्यानेच गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अजूनही तपास सुरु आहे. त्यासाठी तपासाधिकारी मुंबईलाही जावून आले. आरोपींच्या अटकेबाबत बोलण्यास मात्र त्यांनी टाळले. संदीप यांच्याशी संपर्क साधला असता ते औरंगाबाद येते खंडपीठात होते.यापूर्वीच फेटाळला यांचा अटकपूर्वनिमजाई फांऊडेशनचे भरत अरविंद भंगाळे (४०) मोहीनी भरत भंगाळे (३१) दोन्ही रा.भवानी पेठ, राजेश नरेंद्र नारखेडे (४९, रा.विनोबा नगर, जळगाव) व भगवान दगडू पाटील (४९, रा.वाल्मिक नगर, जळगाव) या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी