शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कृउबाच्या दरानेच केळी खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:32 IST

प्रांताधिकाऱ्यांची ताकीद : व्यापारी, शेतकऱ्यांच्या बैठकीत अडचणींवर झाली चर्चा

सावदा, ता. रावेर : बाजार समितीतर्फे केळीचे भाव काढताना बाहेरील बाजारपेठेचाही विचार केला जातो. सध्या सर्वत्र केळीचे भाव घसरले आहे. त्यामुळे दर कमी जाहीर होत आहेत. मात्र या घसरलेल्या भावापेक्षाही अनेक व्यापारी हे कमी दराने केळी मागत असून ते अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे बाजार समितीने जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी दराने कोण्याही व्यापाºयाने केळी मागू नये, अशी ताकीद प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.कोरनाच्या संचारबंदीत केळी उत्पादकांच्या एकूणच अडचणींबाबत व खूपच घसरलेल्या दरांमुळे चिंतीत झालेल्या शेतकºयांची तसेच व्यापारी, ट्रान्स्पोर्ट चालक आदींची बैठक आमदार शिरीष चौधरी व चंद्रकांत पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत येथील विश्रामगृहात शुक्रवारी सकाळी ११ वाजता झाली. त्यावेळी प्रांताधिकाºयांनी ही ताकीद दिली.रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा या तालुक्यांची अर्थव्यवस्था केळीवर अवलंबून असून त्या केळीला पाच वर्षातील सर्वात निच्चांकी भाव मिळत असल्यामुळे या तालुक्यांची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकºयांच्या वतीने विविध समस्या मांडण्यात आल्या. वारंवार जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे रावेर तालुक्यातून विविध तक्रारी गेल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेशाने या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार या सर्र्वानी समन्वय ठेवावा...प्रांताधिकारी यावेळी म्हणाले अकी, केळी उत्पादक व व्यापारी ही एका रथाची दोन चाके असून या दोघांना हाकणारा केळी वाहतूक करणारे ट्रान्सपोर्ट चालक यांनी आतापर्यंत समन्वय राखून या भागाचा आर्थिक कणा मजबूत केला आहे व यापुढे देखील समन्वय राखून हा कना मजबूत ठेवावा. प्रशासन म्हणून जे लागेल ते सहकार्य आम्ही केळी उत्पादक शेतकºयांना करू.कमीशन एजंटकडूनकमी भावात विक्रीव्यापारी वर्गाने आपल्या समस्या मांडताना सांगितले की, उत्तर भारतामध्ये असलेले व्यापारी हे येथील येथील काही कमीशन एजंटकडून अडीचशे ते चारशे क्विंटल दराने केळी घेत आहेत. त्यामुळे आमच्याकडूनही ते याच किंवा कमी भावाने कमी दराने केळी मिळण्याची अपेक्षा करतात.मिळेल त्या दरातद्यावी लागत आहे केळीकेळी ही परिपक्व झाल्यावर जर ती विकली गेली नाही तर शंभर टक्के नुकसान होणार हे निश्चित असल्याने घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या शेतमालाची माती होऊ नये म्हणून म्हणून शेतकºयांना नाईलाजाने मिळेल त्या भावात आज केळी द्यावी लागत आहे.अनेक ट्रक चालकांचीवाहतुकीस ‘ना’परप्रांतात केळी वाहतुकीची परवानगी असली तरी रस्त्यात येणारी जेवणाची अडचण तसेच गॅरेज बंद असल्याने खूपच गैरसोयो होते यामुळे अनेक ट्रकचालक हे वाहतुकीस ना करीत असल्याचा मुद्दाही बैठकीत पुढे आला.यांची होती उपस्थितीजिल्हा कृषी अधिकाºयांसह भागवत पाटील, राजीव पाटील, कडु पाटील, श्रीकांत महाजन, नंदकिशोर महाजन, राजेश वानखेडे, रामदास पाटील, फिरोज खान, तुषार पाटील, किशोर पाटील, हरीष गणवानी यांच्यासह शेतकरी, व्यापारी ट्रान्सपोर्ट चालक उपस्थित होते.ृकेळीवरीलकेळीवरील प्रक्रिया उद्योग उभारण्याची मागणीदेशात कोरनामुळे लॉकडाऊन असल्याने केळी माती मोल भावाने विक्री करावी लागत आहे. केळीला किमान आठशे रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र पाचशे ते सहाशेही भाव सध्या मिळत नाही. केळी नाशवंत असल्याने नाईलाजाने मातीमोल भावाने विकावी लागत आहे. अशा स्थितीत रावेर तालुक्यात केळीवर प्रक्रीया प्रकल्प उभारणे गजरेचे असून केळीला फाळाचा दर्जा मिळवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार कडे मागणी करण्यासाठी केळी उत्पादक शेकºयांचे शिष्टमंडळ राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची लवकरच भेट घेणार आहे, असे कोचुरचे केळी उत्पादक कमलाकर रमेश पाटील यांनी सांगितले.आमदारद्वयी करणार प्रयत्नसंचारबंदीच्या सुरुवातीच्या काळात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून केळी वाहतूक नियमित सुरू झाली आहे. परंतु नव्याने येणाºया अडचणी सोडवण्यासाठी अधिकाºयांना सूचना केल्या आहेत. तसेच काही ट्रक परप्रांतात अडविल्या जात असल्याने एकूणच सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाईल, असे आमदार शिरीष चौधरी व आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.टोल नसल्याने भाडे कमी घ्यावेजळगाव जिल्ह्यात देखील मोठया प्रमाणात मालवाहतूक करणाºया ट्रक उपलब्ध आहेत. परराज्यात केळी वाहतुकीसाठी जळगाव जिल्ह्यातीलच ट्रकचा उपयोग करावा, जेणेकरून केळी वाहतूकदारांचा प्रश्न मिटेल व स्थानिक मालट्रक धारकांना उत्पन्नही मिळेल. देशातील सर्व टोलही बंद असल्यामुळे ट्रक चालकांना याचा फायदा होत आहे. त्यामुळे किमान दहा हजार रुपयांची बचत होते. त्याचा फायदा शेतकºयांसाठी करून द्यावा व त्या प्रमाणात भाडे कमी करावे, अशी मागणी देखील यावेळी शेतकºयांकडून करण्यात आली.