शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST

सुनील पाटील जळगाव : वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर, अनेकवेळा लायसन्सचे निलंबनही ...

सुनील पाटील

जळगाव : वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर, अनेकवेळा लायसन्सचे निलंबनही केले जाते. जळगाव शहर वाहतूक पोलिसांनी २०१८ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत नियम तोडणाऱ्या ४४ जणांचे लायसन्स रद्द केले आहे. त्याशिवाय आणखी काही प्रस्ताव आरटीओ कार्यालयाकडे पाठविलेले आहेत. त्यामुळे दंड भरून सुटका होते, हा भ्रम वाहनधारकांनी काढून टाकावा, यापुढे आणखी कठोर कारवाई करण्याचा इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी दिला आहे.

परिवहन विभागाने वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून दिली असून ते नियम वाहन चालविणाऱ्या व्यक्तीसह पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी देखील आहेत. अनेक वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन होते. त्यात निष्पाप लोकांचा जीव जातो तर, काही जणांना दुखापत होते. या घटना टाळण्यासाठीच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलीस तसेच आरटीओंकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र एवढ्यावरच पुरेसे नसून वारंवार नियमांना तोडणाऱ्यांचे नाइलाजास्तव लायसन्सही वाहतूक नियंत्रण शाखेकडून निलंबन तसेच रद्द केले जातात. वाहनधारकांनी स्वत:चा तसेच इतरांच्या जीवाचा विचार करता वाहतूक नियमांचे पालन करावे. शक्यतो मद्याच्या नशेत, भरधाव वेगाने वाहने चालवू नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आलेले आहे.

चार वर्षांत झालेली कारवाई

वर्ष लायसन्स निलंबन

२०१८ १५

२०१९ २२

२०२० ०५

२०२१ (ऑगस्टपर्यंत) ०२

हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन

- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला तसेच अतिवेगात वाहन चालविल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

- मद्यप्राशन, अमली पदार्थांचे सेवन करून तसेच सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

-मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करीत असल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

आधी तीन महिने, नंतर कायमस्वरूपी

एखाद्याकडून नियमांचे वाहतूक नियमाचे उल्लंघन झाल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही वारंवार ती व्यक्ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असेल तर मात्र अशा व्यक्तीला ठरावीक कालवधीसाठी मुदत दिली जाते. मात्र, त्यानंतरही काहीच फरक पडत नसल्यास लायसन्स रद्दचीच कारवाई करावी लागते.

अशी होते कारवाई...

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीला २-३ वेळा दंडात्मक कारवाई करून सोडले जाते. मात्र वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाते. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो. त्यांच्याकडूनच ही कारवाई केली जाते.

नियमांचे पालन करा...

प्रत्येक वाहनधारकाने नियम पाळणे अपेक्षितच आहे. दंड होतो, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा तीच चूक करू नये. ही चूक जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे नियमांचे पालन करूनच नेहमी वाहन चालवावे. सातत्याने नियम तोडले जात असतील, मद्याच्या नशेत वाहन चालविले जात असेल किंवा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहन चालवून प्रवाशांच्या जीवाला धोक निर्माण करणाऱ्यांचे लायसन्स निलंबित केले जाते.

- लीलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा