शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ‘योग्य वेळ’ एकनाथराव खडसेंनी ठोकरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:01 PM

जळगावात नाराजी व्यक्त होताच गुंडाळली पत्रपरिषद

ठळक मुद्देदानवे म्हणाले, योग्य वेळ आल्यावर खडसेंना न्याय मिळेलखडसे म्हणाले, तशी योग्य वेळ येणारच नाही

जळगाव- मनपा निवडणुकीनिमित्त आयोजित भाजपाच्या पत्रपरिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, योग्य वेळ आल्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना नक्कीच न्याय दिला जाईल. परंतु दानवे यांच्या या उत्तरानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांंनी लगेच सांगितले की, तशी योग्य वेळ येणारच नाही... खडसे यांच्या वक्तव्यातून जाहीरपणे नाराजी व्यक्त झाल्याने पत्रपरिषद आटोपती घेण्यात आली.शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीत दानवे यांच्या हस्ते भाजपाच्या मनपा निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशनही झाले. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे आदींची मुख्य उपस्थिती होती.याचबरोबर सध्या मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु आहे का? असे विचारले असता दानवे यांनी असे कोणतेही वारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करीत आहेत, असे स्पष्टीकरण दिले. तर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेत खडसे यांचे पुनर्वसन केले जाईल अशीही चर्चा असल्याचे पत्रकारांनी सांगितल्यावर या प्रश्नांची उत्तरे देणे मी जरुरी समजत नाही, असे सांगून दानवे यांनी पत्रपरिषद गुंडाळली.तत्पूर्वी खडसे समर्थकांनी दानवे यांना खडसे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना घेरले. त्यांचे म्हणणे दानवे यांनी समजून घेतले.खडसे यांच्यावरील गैरव्यवहाराच्या आरोपानंतर भाजपाने त्यांना मंत्रीपदावरुन दूर केले. दरम्यानच्या काळात अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो आणि चौकशी समितीचीही क्लीन चिट खडसे यांना मिळाली. यानंतरही मात्र खडसे यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही. पक्षातर्फे नेहमीच सांगण्यात आले की, योग्य वेळी खडसेंना संधी दिली जाईल.. न्याय दिला जाईल... परंतु न्याय मिळालाच नाही. आणि आजही तेच उत्तर मिळाल्याने खडसे यांनी नाराजीने ‘ती’ वेळ कधीच येणार नाही, असे स्पष्टपणे पत्र परिषदेतच वक्तव्य केले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव