शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

"ओबीसी समाजावर मोठा अन्याय, राज्य सरकारने दिरंगाई दाखविली", रक्षा खडसेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 13:15 IST

Raksha Khadse : आरक्षण ओबीसी समाजाला अपेक्षित आहे, कारण ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व कोण करणार आहे. राज्य सरकारने यामध्ये दिरंगाई दाखविली आहे, अशा शब्दांत रक्षा खडसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

जळगाव : ओबीसीच्या मुद्दा गंभीर आहे. ओबीसी समाज महाराष्ट्रात मोठा आहे. आरक्षण ओबीसी समाजाला अपेक्षित आहे, कारण ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व कोण करणार आहे, असे म्हणत भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या ओबीसी (OBC) सुनावणी दरम्यान पुढील १५ दिवसांत राज्यातील निवडणुकीचे वेळापत्रक आयोगाला जाहीर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. यावरून रक्षा खडसे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 

ओबीसी आरक्षाणाबाबत पाच-सहा महिन्यांपूर्वी सुनावणी झाल्यावर देखील राज्य सरकारने काहीच काम केले नाही आणि याच्यामुळेच ओबीसी समाजाला फार मोठा फटका बसणार आहे. स्थानिक स्वराज्यमध्ये ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे जर कोणी नसेल, तर हा ओबीसी समाजावर मोठा अन्याय आहे. ओबीसीच्या मुद्दा गंभीर आहे. ओबीसी समाज महाराष्ट्रात मोठा आहे. आरक्षण ओबीसी समाजाला अपेक्षित आहे, कारण ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व कोण करणार आहे. राज्य सरकारने यामध्ये दिरंगाई दाखविली आहे, अशा शब्दांत रक्षा खडसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्राच्यावतीने  कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मोबाईल व्हॅनद्वारे कॅन्सल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे शुभारंभ रावेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, नरेंद्र पाटील, संजय श्रावगी, रवी मराठी, भरत सोनगिरे, भरत बाविस्कर, डॉक्टर विकी सनेर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोज पाटील उपस्थित होते.

...तर कदाचित हा धक्का बसला नसता - प्रीतम मुंडेओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकार बाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात व्यवस्थित मांडली असती तर कदाचित हा धक्का बसला नसता, असे म्हणत प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. माहितीची पूर्तता न केल्यामुळेच आजचा हा दिवस उजाडला असल्याचा गंभीर आरोप खासदार मुंडे यांनी राज्य सरकारवर केला आहे. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalgaonजळगावState Governmentराज्य सरकारCourtन्यायालय