शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"ओबीसी समाजावर मोठा अन्याय, राज्य सरकारने दिरंगाई दाखविली", रक्षा खडसेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 13:15 IST

Raksha Khadse : आरक्षण ओबीसी समाजाला अपेक्षित आहे, कारण ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व कोण करणार आहे. राज्य सरकारने यामध्ये दिरंगाई दाखविली आहे, अशा शब्दांत रक्षा खडसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

जळगाव : ओबीसीच्या मुद्दा गंभीर आहे. ओबीसी समाज महाराष्ट्रात मोठा आहे. आरक्षण ओबीसी समाजाला अपेक्षित आहे, कारण ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व कोण करणार आहे, असे म्हणत भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या ओबीसी (OBC) सुनावणी दरम्यान पुढील १५ दिवसांत राज्यातील निवडणुकीचे वेळापत्रक आयोगाला जाहीर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. यावरून रक्षा खडसे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 

ओबीसी आरक्षाणाबाबत पाच-सहा महिन्यांपूर्वी सुनावणी झाल्यावर देखील राज्य सरकारने काहीच काम केले नाही आणि याच्यामुळेच ओबीसी समाजाला फार मोठा फटका बसणार आहे. स्थानिक स्वराज्यमध्ये ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे जर कोणी नसेल, तर हा ओबीसी समाजावर मोठा अन्याय आहे. ओबीसीच्या मुद्दा गंभीर आहे. ओबीसी समाज महाराष्ट्रात मोठा आहे. आरक्षण ओबीसी समाजाला अपेक्षित आहे, कारण ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व कोण करणार आहे. राज्य सरकारने यामध्ये दिरंगाई दाखविली आहे, अशा शब्दांत रक्षा खडसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्राच्यावतीने  कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मोबाईल व्हॅनद्वारे कॅन्सल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे शुभारंभ रावेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, नरेंद्र पाटील, संजय श्रावगी, रवी मराठी, भरत सोनगिरे, भरत बाविस्कर, डॉक्टर विकी सनेर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोज पाटील उपस्थित होते.

...तर कदाचित हा धक्का बसला नसता - प्रीतम मुंडेओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकार बाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात व्यवस्थित मांडली असती तर कदाचित हा धक्का बसला नसता, असे म्हणत प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. माहितीची पूर्तता न केल्यामुळेच आजचा हा दिवस उजाडला असल्याचा गंभीर आरोप खासदार मुंडे यांनी राज्य सरकारवर केला आहे. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalgaonजळगावState Governmentराज्य सरकारCourtन्यायालय