शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:09 IST

दिवाळीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यात ज्वारी व कपाशीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देआज पंचनामे पूर्ण होणारज्वारी, कपाशी पिकांच्या नुकसानीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात दिवाळीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यात ज्वारी व कपाशीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.दिवाळी होताच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात यावे, असा आदेश शासनाने दिल्यानंतर महसूल व कृषी विभागाने तालुक्यात पंचनामे करण्यास प्रारंभ केला. ९ नोव्हेंबरपर्यंत तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे, तर अद्याप पाचशे-सहाशे हेक्टरवरील शेतांमधील पंचनामे बाकी आहेत.तालुक्यात बागायत कपाशी एक हजार ५०० हेक्टर, जिरायत कपाशी ११ हजार हेक्टर, ज्वारी सात हजार हेक्टर, सोयाबीन दोन हजार २०० हेक्टर, मका एक हजार ८००, तर कांदा ३३० हेक्टर असे नुकसान झाले आहे. एकूण २४ हजार हेक्टरवर पंचनामे करण्यात आले आहे.दरम्यान, शासनाच्या आदेशानंतरही कुºहे (पानाचे) येथील तलाठी मेश्राम यांनी कार्यालयात बसून पंचनामे करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार शेतकºयांनी हाणून पाडला, तर वांजोळा येथील ज्वारी, सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे एका शेतकºयाने ज्वारीच्या गंजीला आग लावून संताप व्यक्त केला.यावर्षी जून महिन्यात २० तारखेनंतर पेरण्यांना प्रारंभ झाला. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीनही महिन्यात तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिकेही समाधानकारक होती. मात्र पोळा सणाच्या दरम्यान सततच्या पावसाने उडीद व मूग शेतकºयांच्या हातचे गेले. मात्र ज्वारी, कपाशी, मका, सोयाबीन आदी पिके समाधानकारक दिसत होती. दोन वर्षाच्या दुष्काळानंतर हिरवी पिके पाहून शेतकरी सुखावला होता. मात्र दिवाळीतही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे १५ दिवसांच्या कालावधीत कापलेल्या ज्वारी व मक्याला जमिनीवरच कोंब आले, तर वेचणीला आलेल्या कपाशीच्या बोंडामधूनही अंकूर बाहेर आले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीत शासनाकडून तरी काही नुकसान भरपाई मिळणार का, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे.

टॅग्स :RainपाऊसBhusawalभुसावळ