शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भुसावळ तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:09 IST

दिवाळीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यात ज्वारी व कपाशीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देआज पंचनामे पूर्ण होणारज्वारी, कपाशी पिकांच्या नुकसानीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात दिवाळीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यात ज्वारी व कपाशीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.दिवाळी होताच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात यावे, असा आदेश शासनाने दिल्यानंतर महसूल व कृषी विभागाने तालुक्यात पंचनामे करण्यास प्रारंभ केला. ९ नोव्हेंबरपर्यंत तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे, तर अद्याप पाचशे-सहाशे हेक्टरवरील शेतांमधील पंचनामे बाकी आहेत.तालुक्यात बागायत कपाशी एक हजार ५०० हेक्टर, जिरायत कपाशी ११ हजार हेक्टर, ज्वारी सात हजार हेक्टर, सोयाबीन दोन हजार २०० हेक्टर, मका एक हजार ८००, तर कांदा ३३० हेक्टर असे नुकसान झाले आहे. एकूण २४ हजार हेक्टरवर पंचनामे करण्यात आले आहे.दरम्यान, शासनाच्या आदेशानंतरही कुºहे (पानाचे) येथील तलाठी मेश्राम यांनी कार्यालयात बसून पंचनामे करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार शेतकºयांनी हाणून पाडला, तर वांजोळा येथील ज्वारी, सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे एका शेतकºयाने ज्वारीच्या गंजीला आग लावून संताप व्यक्त केला.यावर्षी जून महिन्यात २० तारखेनंतर पेरण्यांना प्रारंभ झाला. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीनही महिन्यात तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिकेही समाधानकारक होती. मात्र पोळा सणाच्या दरम्यान सततच्या पावसाने उडीद व मूग शेतकºयांच्या हातचे गेले. मात्र ज्वारी, कपाशी, मका, सोयाबीन आदी पिके समाधानकारक दिसत होती. दोन वर्षाच्या दुष्काळानंतर हिरवी पिके पाहून शेतकरी सुखावला होता. मात्र दिवाळीतही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे १५ दिवसांच्या कालावधीत कापलेल्या ज्वारी व मक्याला जमिनीवरच कोंब आले, तर वेचणीला आलेल्या कपाशीच्या बोंडामधूनही अंकूर बाहेर आले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीत शासनाकडून तरी काही नुकसान भरपाई मिळणार का, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे.

टॅग्स :RainपाऊसBhusawalभुसावळ