शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

भुसावळ तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:09 IST

दिवाळीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यात ज्वारी व कपाशीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देआज पंचनामे पूर्ण होणारज्वारी, कपाशी पिकांच्या नुकसानीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात दिवाळीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यात ज्वारी व कपाशीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.दिवाळी होताच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात यावे, असा आदेश शासनाने दिल्यानंतर महसूल व कृषी विभागाने तालुक्यात पंचनामे करण्यास प्रारंभ केला. ९ नोव्हेंबरपर्यंत तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे, तर अद्याप पाचशे-सहाशे हेक्टरवरील शेतांमधील पंचनामे बाकी आहेत.तालुक्यात बागायत कपाशी एक हजार ५०० हेक्टर, जिरायत कपाशी ११ हजार हेक्टर, ज्वारी सात हजार हेक्टर, सोयाबीन दोन हजार २०० हेक्टर, मका एक हजार ८००, तर कांदा ३३० हेक्टर असे नुकसान झाले आहे. एकूण २४ हजार हेक्टरवर पंचनामे करण्यात आले आहे.दरम्यान, शासनाच्या आदेशानंतरही कुºहे (पानाचे) येथील तलाठी मेश्राम यांनी कार्यालयात बसून पंचनामे करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार शेतकºयांनी हाणून पाडला, तर वांजोळा येथील ज्वारी, सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे एका शेतकºयाने ज्वारीच्या गंजीला आग लावून संताप व्यक्त केला.यावर्षी जून महिन्यात २० तारखेनंतर पेरण्यांना प्रारंभ झाला. जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीनही महिन्यात तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिकेही समाधानकारक होती. मात्र पोळा सणाच्या दरम्यान सततच्या पावसाने उडीद व मूग शेतकºयांच्या हातचे गेले. मात्र ज्वारी, कपाशी, मका, सोयाबीन आदी पिके समाधानकारक दिसत होती. दोन वर्षाच्या दुष्काळानंतर हिरवी पिके पाहून शेतकरी सुखावला होता. मात्र दिवाळीतही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे १५ दिवसांच्या कालावधीत कापलेल्या ज्वारी व मक्याला जमिनीवरच कोंब आले, तर वेचणीला आलेल्या कपाशीच्या बोंडामधूनही अंकूर बाहेर आले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच उद्ध्वस्त झाला. अशा परिस्थितीत शासनाकडून तरी काही नुकसान भरपाई मिळणार का, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे.

टॅग्स :RainपाऊसBhusawalभुसावळ