शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

भाजपकडून जळगावकरांचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 12:36 PM

मिलिंद कुलकर्णी वर्षभरात विकास न करताही भाजपच्या आमदाराला पसंती, दोन वर्षे उलटूनही महापालिकेकडून आश्वासनांची पूर्तता नाही, कणखर, दमदार नेतृत्व ...

मिलिंद कुलकर्णीवर्षभरात विकास न करताही भाजपच्या आमदाराला पसंती, दोन वर्षे उलटूनही महापालिकेकडून आश्वासनांची पूर्तता नाही, कणखर, दमदार नेतृत्व नसल्याने जळगावची स्थिती भकास जळगाव पालिकेतील सुरेशदादा जैन यांची ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आणून गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने संपूर्ण बहुमत मिळवत दोन वर्षांपूर्वी सतरा मजली इमारतीवर झेंडा फडकवला. हे मोठे यश मानले जाते. १७ वर्षांपूर्वी भाजपच्याच एकनाथराव खडसे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत डॉ.के.डी.पाटील यांना निवडून आणले होते. तोदेखील एक इतिहास आहे. पण नगराध्यक्ष भाजपचा आणि सभागृहात बहुमत सुरेशदादा जैन यांचे असे त्रांगडे त्यावेळी होते. म्हणून २०१८ मधील विजय हे संपूर्ण यश होते. संकटमोचक म्हणून नवीन ओळख लाभलेल्या गिरीश महाजन यांचा करिष्मा जळगावात चालला. सुरेशदादा जैन यांच्या आघाडीतील महापौर ललित कोल्हे, सदाशिराव ढेकळे यांच्यासारखे दिग्गज नगरसेवक भाजपने ओढून घेतले. केंद्र व राज्यातील सत्तेचा लाभ मिळवायचा असेल तर जळगाव विधानसभा मतदारसंघ नको, तर महापालिका पण द्या, असे आवाहन महाजन यांनी केले . एक वर्षात विकास करुन दाखवेल, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मते मागायला येणार नाही, या महाजन यांच्या प्रतिज्ञेवर जळगावकरांनी विश्वास ठेवला. आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौर झाल्या. आमदार आणि महापौर एकाच कुटुंबातील असल्याने जळगावचा विकास वर्षभरात होईल, असे जळगावकरांना निश्चितच वाटले. मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यापूर्वी दिलेल्या २५ कोटींचा निधी पडून होता. वर्ष भरात शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु झाले, समांतर रस्त्याविषयी मार्ग निघेल, असे चित्र निर्माण झाले, महापालिकेवरील कर्जाचा प्रश्न सोडविण्यात आला. चांगली सुरुवात आहे. महाजन म्हणाले, तरी वर्षभरात विकास होणे शक्य नाही, हे जळगावकरांनी ताडले आणि सुरेश भोळे यांना पुन्हा निवडून दिले. पण आक्रीत घडले. केंद्रात सत्ता, जळगावात सत्ता, पण राज्यातील सत्ता गेली. आता विकास कामे का झाली नाही, हे सांगायला भाजपला कारण मिळाले. राज्यात आमची सत्ता नाही. जसे गेल्यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आमचा होता, पण बहुमत नव्हते, म्हणून १६ महिन्यात काही झाले नाही, असा युक्तीवाद भाजपचे नेते अजूनही करतात. परंतु, केंद्र सरकारशी निगडीत अनेक कामेसुध्दा भाजपचे खासदार, आमदार व महापौर आणि पदाधिकारी या वर्षभरात करु शकलेले नाही, हे सत्य आहे. भोईटेनगर, असोदा रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाविषयी काहीही हालचाल नाही. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांसाठी १८ हजार घरकुले बांधण्याच्या आश्वासनाचा तर विसर पडलेला आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. महापालिकेने स्वत:च्या अधिकारात करण्याची कामे सुध्दा या दोन वर्षांत झालेली नाही. गाळेप्रश्न रखडलेला आहे. गाळ्यांची मुदत वाढवून करार करु, कायदा करु, असे निवडणुकीतील आश्वासन कधीच हवेत विरले. शहर बससेवा, महापालिकेच्या अत्याधुनिक शाळा, घनकचरा प्रकल्प ही कामे सुध्दा झालेली नाही. व्हीजन, प्लान, अ‍ॅक्शन, इम्प्लीमेंट, पॉवर ही पंचसुत्री वापरुन जळगावचा विकास करण्याचे आश्वासन देणाºया भाजपने दोन वर्षात काय केले हे जळगावकर अनुभवत आहे. रस्त्यातील खड्डे, पहाटे ४ वाजता येणारे पाणी, कचºयाचे ढिग अशा समस्यांची उजळणी करण्याची गरज नाही. महाजन हे निवडणूक जिंकून देऊ शकतात, पण विकास करु शकत नाही, हे मात्र जळगावकरांना कळून चुकले आहे. त्यामुळे कणखर, विकासाभिमुख व दमदार नेतृत्वाच्या प्रतिक्षेत जळगाव आता आहे. दिल्ली, मुंबईत सत्ता आहे, मात्र जळगाव महापालिकेत सत्ता नसल्याने ४३१ कोटी रुपयांचा निधी देऊनही शहराचा विकास होऊ शकला नाही; सत्ता द्या, एक वर्षात विकास करुन दाखवू. अन्यथा विधानसभेत मते मागायला येणार नाही.गिरीश महाजन यांचे दोन वर्षांपूर्वीचे हे वक्तव्य. संपूर्ण बहुमतासह भाजपला सत्ता देऊनदेखील गाळेप्रश्न, बससेवा, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, घनकचरा प्रकल्प, अमृत पाणीयोजना, रस्तेविकास, एमआयडीसीचा विस्तार हे प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. वर्षभरात विकास न होताही जळगावकरांनी भाजपच्या आमदाराला पुन्हा निवडून दिले. पण भाजपने विश्वासघाताशिवाय काय केले?
टॅग्स :Jalgaonजळगाव